शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

विरार-विक्रमगडमध्ये पावसाचा शिडकावा, सततच्या 'बत्तीगुल'ने नागरिक घामाघूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 23:41 IST

Virar-Vikramgad : लॉकडाऊननिमित्तची संचारबंदी आणि वाढत्या उन्हाचा मारा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात मंगळवारी मध्यरात्री अनपेक्षित पाऊस झाला.

विरार/विक्रमगड : जिल्ह्यात विरार, विक्रमगडसह काही भागांत मंगळवारी मध्यरात्री पावसाचा शिडकावा झाला. या पावसाचा सुखद अनुभव घेणार तोच यादरम्यान दोन-तीन वेळा 'बत्तीगुल' झाल्याने विरारवासीय घामाघूम झाले. दुसरीकडे एप्रिल महिन्याला सुरुवात होताच उष्णतेतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.लॉकडाऊननिमित्तची संचारबंदी आणि वाढत्या उन्हाचा मारा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात मंगळवारी मध्यरात्री अनपेक्षित पाऊस झाला. या पावसाचा अंथरुणावरूनच सुखद अनुभव विरारवासी घेणार तोच दोन-तीन वेळा 'बत्तीगुल' झाल्याने अंथरुणावरच नागरिक घामाने भिजले. परिणामी, सकाळी तीन-साडेतीनच्या सुमारास हवेसाठी घरादाराच्या खिडक्या उघडताना नागरिक दिसत होते. तास-अर्ध्या तासाने वीज आली तरी १५ मिनिटे झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने गर्मीत अधिकच भर पडली होती. पावसाचा परिणाम म्हणून बुधवारी सकाळीदेखील उष्मा अधिक जाणवत होता. विशेष म्हणजे बुधवारी संध्याकाळपासून पुन्हा एकदा सरकारने 'लॉकडाऊन'साठी कडक निर्बंध लावले असल्याने महावितरणकडून असाच 'वीज खेळखंडोबा' झाल्यास मागील वर्षीसारखा नागरिकांच्या संतापाचा पारा या वर्षीदेखील कायम राहू शकतो.दरम्यान, विक्रमगड तालुक्यात मंगळवारी रात्री आणि पहाटे पावसाने रिपरिप सुरू केली. पुन्हा पहाटे पावसाच्या सर आली तसेच सकाळी ढगाळ वातावरण असल्याने आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कारण आंबा झाडावर सध्या कैऱ्या होऊ लागल्याने ढगाळ वातावरण व पावसामुळे या कैऱ्यांवर परिणाम होणार आहे.

निसर्गाचा लहरीपणा दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेला लहरीपणा त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी पाऊस व त्यामुळे वातावणात होणारा बदल याचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत असून गेल्या काही दिवसांत लांबलेले थंडीचे प्रमाण याचा परिणाम मनुष्यावरच नाही तर निसर्गावरसुद्धा होऊ लागला आहे. 

टॅग्स :Virarविरार