शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकऱ्यांना सौर विद्युत पंपाचा पर्याय उपलब्ध

By admin | Updated: February 26, 2017 02:25 IST

लोडशेडींगची कटकट. भरमसाठ वीज बिलाचा बोजा. शेती-वाडीच्या पाणी पुरवठ्याची चिंंता. या सर्वांतून बागायतदार आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा सौर उर्जेवरील

- शशी करपे,  वसईलोडशेडींगची कटकट. भरमसाठ वीज बिलाचा बोजा. शेती-वाडीच्या पाणी पुरवठ्याची चिंंता. या सर्वांतून बागायतदार आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा सौर उर्जेवरील विद्युत पंप वसईतील शनी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विजेची बचत, लोडशेडींगमधून सुटका, वीज बिलाची डोकेदुखी नाही, मेंटेनन्सही नाही उलट घरगुती वापरासाठीही वीज निर्मिती होऊ शकते अशा अनेक कारणास्तव उपयुक्त असा पंप शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दहा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे एकदाच गुंतवणूक केल्यानंतर त्यांना वर्षाेनुवर्षे दमडाही न मोजता शेतीसह घरगुती वापरासाठीही वीज निर्मिती करता येणार आहे. लोडशेडींगमुळे वसई तालुक्यायातील बागायतदार आणि शेतकऱ्यांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. त्यातच भरमसाठ वीज बिलाची डोकेदुखीही असतेच. अनेकदा पाणी मुबलक असतांनाही वीजेअभावी शेतीला हव्या त्या प्रमाणात पाणी देता येत नसल्यामुळे उन्हाळी शेती करणे जड होऊन बसले आहे. वेळी अवेळी जाणाऱ्या विजेमुळे विद्युत मोटर बंद पडल्यामुळे शेतीवाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी वसईतील शनि मंदिर ट्रस्टने हा प्रयोग केला. विशेष म्हणजे हा सौरउर्जा संच शेतीवाडीतील मोकळ्या माळरानावर,घराच्या गच्चीवर आपण लावू शकतो.तसेच या सौरउर्जेसाठी लावण्यात येणाऱ्या पँनलद्वारे तयार होणारी अतिरीक्त विज सहा बँटऱ्यांद्वारे स्टोर करून रात्रीच्या वेळी घरातही वापरू शकतो. गेली काही वर्षे सौरउर्जेवर आधारीत अनेक उपक्रम राबवले जात असतात. पर्यावरणासाठी महत्वाचे ठरणाऱ्या लाखो झाडांचे वाटप या करण्यात आले आहे. दर शनिवारी प्रसादाच्या रूपात वनौषधी रोपांचे वाटप केले जाते. वसईतील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे जी ९ या संकरीत टिश्श्यूकल्चर केळींच्या रोपांचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. झाडे लावा व झाडे जगवा यासाठी वसईतील शेतकऱ्यांकरीता वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही केले जाते. पर्यावरणमित्र हा सह्याद्री फाऊंडेशनचा पुरस्कार प्राप्त झालेले जयवंत नाईक यांनी शेतकऱ्यांना विजेअभावी शेतीला पाणी देण्यासाठी या सौरउर्जेवर आधारीत विज जनित्र संचाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन केले आहे.अशी केली साकारणी- सौरउर्जेवर आधारित वीज जनित्र संच प्रायोगिक तत्वावर शेतजमीनीवरील विहीरींवर लावले आहेत. या सौरउर्जा संचात सोलर पॅनलचा वापर करण्यात आलेला असून, त्याद्वारे तयार होत असलेल्या विजेचा विहीरीवरील मोटर्सला पुरवठा केला जातो. या संचासाठी २०० वॅटचे ९ पॅनल लावण्यात आलेले आहेत. ३ पॅनलच्या एका सिरीजद्वारे प्रति सेकंद ७२ वँट विजनिर्मीती होत असते.