शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

शेतकऱ्यांना सौर विद्युत पंपाचा पर्याय उपलब्ध

By admin | Updated: February 26, 2017 02:25 IST

लोडशेडींगची कटकट. भरमसाठ वीज बिलाचा बोजा. शेती-वाडीच्या पाणी पुरवठ्याची चिंंता. या सर्वांतून बागायतदार आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा सौर उर्जेवरील

- शशी करपे,  वसईलोडशेडींगची कटकट. भरमसाठ वीज बिलाचा बोजा. शेती-वाडीच्या पाणी पुरवठ्याची चिंंता. या सर्वांतून बागायतदार आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा सौर उर्जेवरील विद्युत पंप वसईतील शनी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विजेची बचत, लोडशेडींगमधून सुटका, वीज बिलाची डोकेदुखी नाही, मेंटेनन्सही नाही उलट घरगुती वापरासाठीही वीज निर्मिती होऊ शकते अशा अनेक कारणास्तव उपयुक्त असा पंप शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दहा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे एकदाच गुंतवणूक केल्यानंतर त्यांना वर्षाेनुवर्षे दमडाही न मोजता शेतीसह घरगुती वापरासाठीही वीज निर्मिती करता येणार आहे. लोडशेडींगमुळे वसई तालुक्यायातील बागायतदार आणि शेतकऱ्यांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. त्यातच भरमसाठ वीज बिलाची डोकेदुखीही असतेच. अनेकदा पाणी मुबलक असतांनाही वीजेअभावी शेतीला हव्या त्या प्रमाणात पाणी देता येत नसल्यामुळे उन्हाळी शेती करणे जड होऊन बसले आहे. वेळी अवेळी जाणाऱ्या विजेमुळे विद्युत मोटर बंद पडल्यामुळे शेतीवाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी वसईतील शनि मंदिर ट्रस्टने हा प्रयोग केला. विशेष म्हणजे हा सौरउर्जा संच शेतीवाडीतील मोकळ्या माळरानावर,घराच्या गच्चीवर आपण लावू शकतो.तसेच या सौरउर्जेसाठी लावण्यात येणाऱ्या पँनलद्वारे तयार होणारी अतिरीक्त विज सहा बँटऱ्यांद्वारे स्टोर करून रात्रीच्या वेळी घरातही वापरू शकतो. गेली काही वर्षे सौरउर्जेवर आधारीत अनेक उपक्रम राबवले जात असतात. पर्यावरणासाठी महत्वाचे ठरणाऱ्या लाखो झाडांचे वाटप या करण्यात आले आहे. दर शनिवारी प्रसादाच्या रूपात वनौषधी रोपांचे वाटप केले जाते. वसईतील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे जी ९ या संकरीत टिश्श्यूकल्चर केळींच्या रोपांचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. झाडे लावा व झाडे जगवा यासाठी वसईतील शेतकऱ्यांकरीता वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही केले जाते. पर्यावरणमित्र हा सह्याद्री फाऊंडेशनचा पुरस्कार प्राप्त झालेले जयवंत नाईक यांनी शेतकऱ्यांना विजेअभावी शेतीला पाणी देण्यासाठी या सौरउर्जेवर आधारीत विज जनित्र संचाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन केले आहे.अशी केली साकारणी- सौरउर्जेवर आधारित वीज जनित्र संच प्रायोगिक तत्वावर शेतजमीनीवरील विहीरींवर लावले आहेत. या सौरउर्जा संचात सोलर पॅनलचा वापर करण्यात आलेला असून, त्याद्वारे तयार होत असलेल्या विजेचा विहीरीवरील मोटर्सला पुरवठा केला जातो. या संचासाठी २०० वॅटचे ९ पॅनल लावण्यात आलेले आहेत. ३ पॅनलच्या एका सिरीजद्वारे प्रति सेकंद ७२ वँट विजनिर्मीती होत असते.