शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सौरऊर्जेमुळे गावपाड्यांतील जीवन होत आहे प्रकाशमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 00:44 IST

पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, प्रतियुनिट वाढणारे भाव आणि वेगवेगळ्या कारणास्तव घेतले जाणारे शटडाऊन यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. भौगोलिक रचनेमुळे अनेक ठिकाणी अद्याप वीज पोहोचलेली नाही. अशा ठिकाणी ग्रामपंचायतींनी शासकीय निधीतून सौरऊर्जेवरील पथदिवे बसवून अंधकार दूर केला आहे. काही ग्रामपंचायतींनी विकास आराखड्यात अंतर्भाव केला आहे. पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.औष्णिक, अणू, जल आणि पवनविद्युत हे ऊर्जानिर्मितीचे प्रमुख प्रकार आहेत. पवनऊर्जावगळता उर्वरित पर्यायांचा वापर होताना दिसतो. मात्र, वाढती लोकसंख्या आणि उद्योगनिर्मितीसाठी विजेची मागणी वाढत आहे. पर्यावरण, प्रदूषण आणि जमीन अधिग्रहण अशा विविध मुद्यांवरून नवीन प्रकल्प हाती घेताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे आगामी काळात सौरऊर्जेचा वापर हा उत्तम पर्याय असून भारता त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिता शासनातर्फे विविध योजना सुरू आहेत. ग्रामीण भागात त्याचा प्रचार-प्रसार आवश्यक आहे.पालघरमध्ये अद्याप काही भागांत वीज पोहोचली नसल्याने तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, सौरऊर्जेचा वापर वरदान ठरणार आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असल्याने त्यासाठी पाणीउपसा करण्यासाठी वीजपुरवठा गरजेचा आहे. लोडशेडिंगमुळे पिकांना पाण्याच्या पाळ्या देता न आल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणीउपसा यंत्राची उपयुक्तता सिद्ध होते. महावितरणकडून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून पाच एकरपेक्षा कमी क्षेत्रासाठी तीन एच.पी. आणि त्यावरील क्षेत्रासाठी पाच एच.पी.चा लाभ दिला जातो. या योजनेबाबत बºयाच शेतकऱ्यांना माहिती नाही.दरम्यान, ग्रामपंचायतींनी सुरू केलेला सौरऊर्जेचा वापर सुखावह आहे; मात्र टक्केवारी आणि भ्रष्टाचारामुळे कमी प्रतीची सामग्री वापरल्याने अनेक गावांतील सौरपथदिव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही प्रकरणांत या सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीचे प्रकार घडूनही त्याविरु द्ध कायदेशीर कारवाई न होणे, या यंत्रणेचा देखभाल- दुरुस्तीचा खर्च अधिक असल्याने हा स्तुत्य उपक्र म बासनात गुंडाळण्याची वेळ ओढावली आहे.।वीजबिलाची कटकट नसल्याने ग्रामस्थांकडून स्वागतजिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सार्वजनिक कूपनलिका आणि विहिरींवर सौरऊर्जेवर मोटारपंप चालवण्याची लघु नळपाणीपुरवठा योजना ठक्कर बाप्पा योजनेतून राबवण्यात येत आहे. डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्र मगड या तालुक्यांतील डोंगरीपट्ट्यात ही योजना लाभदायक ठरत आहे. या पट्ट्यात वीज खंडित होत असल्याने त्याचे महत्त्व ग्रामीण महिलांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. शिवाय, वीजबिल भरण्याची कटकट नसल्याने जिल्हावासीयांकडून त्याचे स्वागत होत आहे. शासकीय वसतिगृह, कार्यालये, टूमदार बंगले आणि मोठ्या कंपन्यांनी सौरऊर्जा वापरण्यास अवलंब केल्याने ही सकारात्मक बाब आहे.