शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेमुळे गावपाड्यांतील जीवन होत आहे प्रकाशमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 00:44 IST

पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, प्रतियुनिट वाढणारे भाव आणि वेगवेगळ्या कारणास्तव घेतले जाणारे शटडाऊन यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. भौगोलिक रचनेमुळे अनेक ठिकाणी अद्याप वीज पोहोचलेली नाही. अशा ठिकाणी ग्रामपंचायतींनी शासकीय निधीतून सौरऊर्जेवरील पथदिवे बसवून अंधकार दूर केला आहे. काही ग्रामपंचायतींनी विकास आराखड्यात अंतर्भाव केला आहे. पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.औष्णिक, अणू, जल आणि पवनविद्युत हे ऊर्जानिर्मितीचे प्रमुख प्रकार आहेत. पवनऊर्जावगळता उर्वरित पर्यायांचा वापर होताना दिसतो. मात्र, वाढती लोकसंख्या आणि उद्योगनिर्मितीसाठी विजेची मागणी वाढत आहे. पर्यावरण, प्रदूषण आणि जमीन अधिग्रहण अशा विविध मुद्यांवरून नवीन प्रकल्प हाती घेताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे आगामी काळात सौरऊर्जेचा वापर हा उत्तम पर्याय असून भारता त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिता शासनातर्फे विविध योजना सुरू आहेत. ग्रामीण भागात त्याचा प्रचार-प्रसार आवश्यक आहे.पालघरमध्ये अद्याप काही भागांत वीज पोहोचली नसल्याने तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, सौरऊर्जेचा वापर वरदान ठरणार आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असल्याने त्यासाठी पाणीउपसा करण्यासाठी वीजपुरवठा गरजेचा आहे. लोडशेडिंगमुळे पिकांना पाण्याच्या पाळ्या देता न आल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणीउपसा यंत्राची उपयुक्तता सिद्ध होते. महावितरणकडून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून पाच एकरपेक्षा कमी क्षेत्रासाठी तीन एच.पी. आणि त्यावरील क्षेत्रासाठी पाच एच.पी.चा लाभ दिला जातो. या योजनेबाबत बºयाच शेतकऱ्यांना माहिती नाही.दरम्यान, ग्रामपंचायतींनी सुरू केलेला सौरऊर्जेचा वापर सुखावह आहे; मात्र टक्केवारी आणि भ्रष्टाचारामुळे कमी प्रतीची सामग्री वापरल्याने अनेक गावांतील सौरपथदिव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही प्रकरणांत या सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीचे प्रकार घडूनही त्याविरु द्ध कायदेशीर कारवाई न होणे, या यंत्रणेचा देखभाल- दुरुस्तीचा खर्च अधिक असल्याने हा स्तुत्य उपक्र म बासनात गुंडाळण्याची वेळ ओढावली आहे.।वीजबिलाची कटकट नसल्याने ग्रामस्थांकडून स्वागतजिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सार्वजनिक कूपनलिका आणि विहिरींवर सौरऊर्जेवर मोटारपंप चालवण्याची लघु नळपाणीपुरवठा योजना ठक्कर बाप्पा योजनेतून राबवण्यात येत आहे. डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्र मगड या तालुक्यांतील डोंगरीपट्ट्यात ही योजना लाभदायक ठरत आहे. या पट्ट्यात वीज खंडित होत असल्याने त्याचे महत्त्व ग्रामीण महिलांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. शिवाय, वीजबिल भरण्याची कटकट नसल्याने जिल्हावासीयांकडून त्याचे स्वागत होत आहे. शासकीय वसतिगृह, कार्यालये, टूमदार बंगले आणि मोठ्या कंपन्यांनी सौरऊर्जा वापरण्यास अवलंब केल्याने ही सकारात्मक बाब आहे.