शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेमुळे गावपाड्यांतील जीवन होत आहे प्रकाशमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 00:44 IST

पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, प्रतियुनिट वाढणारे भाव आणि वेगवेगळ्या कारणास्तव घेतले जाणारे शटडाऊन यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. भौगोलिक रचनेमुळे अनेक ठिकाणी अद्याप वीज पोहोचलेली नाही. अशा ठिकाणी ग्रामपंचायतींनी शासकीय निधीतून सौरऊर्जेवरील पथदिवे बसवून अंधकार दूर केला आहे. काही ग्रामपंचायतींनी विकास आराखड्यात अंतर्भाव केला आहे. पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.औष्णिक, अणू, जल आणि पवनविद्युत हे ऊर्जानिर्मितीचे प्रमुख प्रकार आहेत. पवनऊर्जावगळता उर्वरित पर्यायांचा वापर होताना दिसतो. मात्र, वाढती लोकसंख्या आणि उद्योगनिर्मितीसाठी विजेची मागणी वाढत आहे. पर्यावरण, प्रदूषण आणि जमीन अधिग्रहण अशा विविध मुद्यांवरून नवीन प्रकल्प हाती घेताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे आगामी काळात सौरऊर्जेचा वापर हा उत्तम पर्याय असून भारता त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिता शासनातर्फे विविध योजना सुरू आहेत. ग्रामीण भागात त्याचा प्रचार-प्रसार आवश्यक आहे.पालघरमध्ये अद्याप काही भागांत वीज पोहोचली नसल्याने तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, सौरऊर्जेचा वापर वरदान ठरणार आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असल्याने त्यासाठी पाणीउपसा करण्यासाठी वीजपुरवठा गरजेचा आहे. लोडशेडिंगमुळे पिकांना पाण्याच्या पाळ्या देता न आल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणीउपसा यंत्राची उपयुक्तता सिद्ध होते. महावितरणकडून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून पाच एकरपेक्षा कमी क्षेत्रासाठी तीन एच.पी. आणि त्यावरील क्षेत्रासाठी पाच एच.पी.चा लाभ दिला जातो. या योजनेबाबत बºयाच शेतकऱ्यांना माहिती नाही.दरम्यान, ग्रामपंचायतींनी सुरू केलेला सौरऊर्जेचा वापर सुखावह आहे; मात्र टक्केवारी आणि भ्रष्टाचारामुळे कमी प्रतीची सामग्री वापरल्याने अनेक गावांतील सौरपथदिव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही प्रकरणांत या सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीचे प्रकार घडूनही त्याविरु द्ध कायदेशीर कारवाई न होणे, या यंत्रणेचा देखभाल- दुरुस्तीचा खर्च अधिक असल्याने हा स्तुत्य उपक्र म बासनात गुंडाळण्याची वेळ ओढावली आहे.।वीजबिलाची कटकट नसल्याने ग्रामस्थांकडून स्वागतजिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सार्वजनिक कूपनलिका आणि विहिरींवर सौरऊर्जेवर मोटारपंप चालवण्याची लघु नळपाणीपुरवठा योजना ठक्कर बाप्पा योजनेतून राबवण्यात येत आहे. डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्र मगड या तालुक्यांतील डोंगरीपट्ट्यात ही योजना लाभदायक ठरत आहे. या पट्ट्यात वीज खंडित होत असल्याने त्याचे महत्त्व ग्रामीण महिलांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. शिवाय, वीजबिल भरण्याची कटकट नसल्याने जिल्हावासीयांकडून त्याचे स्वागत होत आहे. शासकीय वसतिगृह, कार्यालये, टूमदार बंगले आणि मोठ्या कंपन्यांनी सौरऊर्जा वापरण्यास अवलंब केल्याने ही सकारात्मक बाब आहे.