शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

सौरऊर्जेमुळे गावपाड्यांतील जीवन होत आहे प्रकाशमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 00:44 IST

पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, प्रतियुनिट वाढणारे भाव आणि वेगवेगळ्या कारणास्तव घेतले जाणारे शटडाऊन यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. भौगोलिक रचनेमुळे अनेक ठिकाणी अद्याप वीज पोहोचलेली नाही. अशा ठिकाणी ग्रामपंचायतींनी शासकीय निधीतून सौरऊर्जेवरील पथदिवे बसवून अंधकार दूर केला आहे. काही ग्रामपंचायतींनी विकास आराखड्यात अंतर्भाव केला आहे. पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.औष्णिक, अणू, जल आणि पवनविद्युत हे ऊर्जानिर्मितीचे प्रमुख प्रकार आहेत. पवनऊर्जावगळता उर्वरित पर्यायांचा वापर होताना दिसतो. मात्र, वाढती लोकसंख्या आणि उद्योगनिर्मितीसाठी विजेची मागणी वाढत आहे. पर्यावरण, प्रदूषण आणि जमीन अधिग्रहण अशा विविध मुद्यांवरून नवीन प्रकल्प हाती घेताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे आगामी काळात सौरऊर्जेचा वापर हा उत्तम पर्याय असून भारता त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिता शासनातर्फे विविध योजना सुरू आहेत. ग्रामीण भागात त्याचा प्रचार-प्रसार आवश्यक आहे.पालघरमध्ये अद्याप काही भागांत वीज पोहोचली नसल्याने तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, सौरऊर्जेचा वापर वरदान ठरणार आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असल्याने त्यासाठी पाणीउपसा करण्यासाठी वीजपुरवठा गरजेचा आहे. लोडशेडिंगमुळे पिकांना पाण्याच्या पाळ्या देता न आल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणीउपसा यंत्राची उपयुक्तता सिद्ध होते. महावितरणकडून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून पाच एकरपेक्षा कमी क्षेत्रासाठी तीन एच.पी. आणि त्यावरील क्षेत्रासाठी पाच एच.पी.चा लाभ दिला जातो. या योजनेबाबत बºयाच शेतकऱ्यांना माहिती नाही.दरम्यान, ग्रामपंचायतींनी सुरू केलेला सौरऊर्जेचा वापर सुखावह आहे; मात्र टक्केवारी आणि भ्रष्टाचारामुळे कमी प्रतीची सामग्री वापरल्याने अनेक गावांतील सौरपथदिव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही प्रकरणांत या सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीचे प्रकार घडूनही त्याविरु द्ध कायदेशीर कारवाई न होणे, या यंत्रणेचा देखभाल- दुरुस्तीचा खर्च अधिक असल्याने हा स्तुत्य उपक्र म बासनात गुंडाळण्याची वेळ ओढावली आहे.।वीजबिलाची कटकट नसल्याने ग्रामस्थांकडून स्वागतजिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सार्वजनिक कूपनलिका आणि विहिरींवर सौरऊर्जेवर मोटारपंप चालवण्याची लघु नळपाणीपुरवठा योजना ठक्कर बाप्पा योजनेतून राबवण्यात येत आहे. डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्र मगड या तालुक्यांतील डोंगरीपट्ट्यात ही योजना लाभदायक ठरत आहे. या पट्ट्यात वीज खंडित होत असल्याने त्याचे महत्त्व ग्रामीण महिलांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. शिवाय, वीजबिल भरण्याची कटकट नसल्याने जिल्हावासीयांकडून त्याचे स्वागत होत आहे. शासकीय वसतिगृह, कार्यालये, टूमदार बंगले आणि मोठ्या कंपन्यांनी सौरऊर्जा वापरण्यास अवलंब केल्याने ही सकारात्मक बाब आहे.