शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

नेटिझन्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 01:13 IST

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्तास्थापनेची खलबते अंतिम टप्प्यात आली असतानाच शनिवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला.

- सुनील घरतपारोळ : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्तास्थापनेची खलबते अंतिम टप्प्यात आली असतानाच शनिवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राजभवनात सकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने मोठा राजकीय भूकंप घडून सर्व राजकीय गणिते चुकीची ठरवत सत्ता स्थापन केली. या राजकीय भूकंपाचे हादरे मात्र दिवसभर सोशल मीडियावर बसत होते. शनिवार, रविवार सोशल मीडियावर मेसेजचा पूर आल्याने दूरचित्रवाणीवरून त्याच ब्रेकिंग पाहून वैतागलेल्या नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले.राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यात महाविकासआघाडी काही अंशी यशस्वी होण्याची चिन्हे असतानाच सकाळी - सकाळीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची बातमी येऊन थडकली आणि अनेकांची झोप उडाली. सकाळी आठ वाजल्यापासूनच सोशल मीडियावर नेटिझनसच्या पोस्ट झळकू लागल्या.एकीकडे ‘मी पुन्हा येईन’ असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच समर्थकांनी आनंद व्यक्त केला असला तरी दुसरीकडे राष्ट्रवादीबरोबर घरोबा केल्याने ‘पारदर्शक भ्रष्टाचार’ असे म्हणत नेटिझन्सनी नाराजीचा सूरही आळवला. ‘शपथविधी होता की, दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी - सकाळी आटोपला’, अशा शब्दात या घटनेची खिल्ली उडविण्यात आली. ‘भंडारा चल रहा था, अंदर गए तो हलवा खत्म, बहार आए तो चप्पल गायब’, ‘चिटिंग करताय तू...बेचारा सो रहा था मैं, सपने देख रहा थे मैं’ अशा विविध प्रकारच्या पोस्टही टाकण्यात आल्या. तर, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असे म्हणणाºया फडणवीसांना, ...पण एवढ्या सकाळी याल असं वाटलं नव्हतं’, असा खोचक टोलाही लगावला.‘पळून जाऊन राजभवनात दोघांचे लग्न’ अशा आशयाखाली नवरदेव देवेंद्र आणि वधू अजितदादा तर राज्यपाल भटजी अशा कल्पकतेच्या पोस्टमधून अनेकांचे मनोरंजन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांकडे हात दाखवत म्हणत आहेत ‘हे कधी काय करेल काही सांगता येत नाही’ हे सूचक विधानही खूप काही सांगून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात शेती प्रश्नांवर जी एक तास चर्चा झाली, त्याचंच हे पीक आज आलेले आहे’ अशी कॉमेंट करण्यातही नेटिझन्स मागे नव्हते.तर माध्यमांना मिळालेल्या खात्रीलायक सूत्रांनुसार हा शब्द इतका प्रसिद्ध झाला की, अखेर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांनाही माहिती नव्हती असा मेसेज करून माध्यमांनाही लक्ष्यकरण्यात आले.या राजकीय भूकंपाचे हादरे मात्र दिवसभर सोशल मीडियावर बसत होते. शनिवार, रविवार सोशल मीडियावर मेसेजचा पूर आल्याने दूरचित्रवाणीवरून त्याच ब्रेकिंग पाहून वैतागलेल्या नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले. सकाळी आठ वाजल्यापासूनच सोशल मीडियावर नेटिझनसच्या पोस्ट झळकू लागल्या.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारण