शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

बाजारावरील मंदीचे सावट पौषासह सरले

By admin | Updated: February 24, 2016 02:56 IST

२१ व्या शतकात समाजावरील शुभ-अशुभतेचा पगडा तसूभरही कमी झालेला नाही. किंबहुना त्याच मानसिकतेतून पौष महिन्यात मंगलकार्य करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे माघ महिन्याला

बोर्डी : २१ व्या शतकात समाजावरील शुभ-अशुभतेचा पगडा तसूभरही कमी झालेला नाही. किंबहुना त्याच मानसिकतेतून पौष महिन्यात मंगलकार्य करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे माघ महिन्याला प्रारंभ झाल्यानंतर ठिकठिकाणी गृहशांती, सत्यनारायण पूजा, साखरपुडा तसेच लग्नकार्य पार पाडण्याची घाई केली जात असल्याने बाजारातील मंदीचे सावट निवळले आहे.हिंदु धर्मात व्रत वैकल्यांना महत्वाचे स्थान असून पुजाविधी, मंगलकार्य कोणत्या महिन्यात करावे अथवा करू नये या बाबत धार्मिक संकल्पना आहेत. त्यानुसार चैत्र, श्रावण, भाद्रपद इ. महिन्यात सर्वाधिक पूजाविधी पार पाडले जातात. तर पौष महिन्यात कोणतेही धार्मिक कार्य केले जात नाही. मात्र त्याला शास्त्राधार नसल्याचे पुरोहितांचे म्हणणे आहे. या शुभ -अशुभतेचा परिणाम माणसांच्या जीवनावर कितपत होतो हा संशोधनाचा विषय असला तरी बाजारातील आर्थिक उलाढालीवर नक्कीच होताना दिसून येतो. मंगलकार्याविना फुल ेव फळे बाजार, सोने व कपडे खरेदी, मंडप, डेकोरेशन, कॅटरींग, बॅन्जो, हॉल, व्हिडीओ शुटींग इ.वर मंदीच असते. दरम्यान माघ महिन्याला प्रारंभ झाल्यापासून गृहशांती, सत्यनारायण पूजा, साखरपुडा, लग्नकार्य इ. ची धावपळ सुरू झाली आहे. एखाद्या मुहूर्तासाठी भटजीकडे अडून बसणारे, तगादा लावणारे मनासारखा मुहूर्त वा तारीख न मिळाल्यास खट्टू होणारे महाभाग याच काळात दृष्टीस पडतात. विविध मंगलकार्यांना प्रारंभ झाला असून त्यामुळे बाजारात तेजी दिसून येत आहे. पुरोहितांची धावपळ सुरू असून मला वेळ नाही, दुसरा कुणीतरी पहा असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (वार्ताहर) पौष महिन्यात मंगलकार्य पार न पाडण्याला कोणताच शास्त्रीय आधार नाही हे नागरीकांना पटवून दिले जाते. परंतु धार्मिक पगडा जबरदस्त असल्याने या महिन्यात धार्मिक विधी सहसा केले जात नाहीत.- धनंजय पंडीत, पुरोहीत डहाणू, आगारपौष महिना सरल्यानंतर माघ महिन्यात पूजाविधी, साखरपुडा, लग्नकार्य इ. करीता मंडप, रोषणाई, डेकोरेशन इ. मागणी वाढली आहे.- हसमुख किणी, मंडप व्यवसायीक, चिखले