शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

एस.टी.ला. अपघात, चालकासह ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:34 IST

बसच्या ड्रायव्हर केबिनचा चक्काचूर; ट्रकने दिली जबरदस्त टक्कर

बोईसर : मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºाा बोईसर-चिल्हार रस्त्यावर आज सकाळी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण टक्करीमध्ये बस चालकासह बसमधून प्रवास करणारे पाच प्रवासी जखमी झाले होते. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे. मात्र या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबून वाहनांच्या तीन ते चार कि.मी.पर्यंत रांगा लागल्या होत्या.या अपघातात बसचालक उध्दव कंठाले यांच्या दोन्ही गुडघ्याला मार लागला होता त्यांना उपचारासाठी नागझरी येथील अधिकारी लाईफ लाईन या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर बसमधील प्रवासी ज्ञानदेव आबाळे व शैला आबाळे, अतळापूर, ता.संगमनेर हे पती-पत्नी तर सुंगधाबाई हापाळे, बदगी- बेलापूर, ता.अकोले, दिगू पंडित, दांडीपाडा, बोईसर व धनंजय पाटील, काटकर पाडा, बोईसर या सर्व जखमींवर बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून सर्वांना घरी पाठविले आहे.बुधवारी (दि.१९) सकाळी ८ वाजता बोईसर आगरातून अहमदनगरकडे जाणारी (एमएच २०, बीएल २८८३) बस गुंदले गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंड उतरून सेंट फ्रान्सिस स्कूलसमोर सव्वा आठच्या सुमारास आली असता बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यावेळी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेच्या नाल्यात जाऊन चालकासह ५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.या अपघातात बसच्या ड्रायव्हर केबिनचा चक्काचूर झाला तर ट्रकचे बॉनेट व दरवाजा तुटून डिझेल टाकी फुटली.अपघात झाल्यानंतर पालघर विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी आशीष चौधरी, बोईसर एस.टी.डेपोचे व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर, बोईसर स्थानक प्रमुख दिनकर राठोड इत्यादी अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना उपचार मिळावे म्हणून प्रयत्न केले त्या नंतर प्रत्येक जखमी ना रू.५०० ची मदत देऊन पुढील उपचारासाठी टी-फॉर्म दिला.बोईसर-चिल्हार हा रस्ता मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडत असल्याने या महत्त्वाच्या रस्त्यावरून दिवस-रात्र प्रचंड अवजड वाहतूक होत असून या रस्त्याचे मागील २ वर्षापासून काम सुरू आहे. या रस्त्यावर आजपर्यंत अनेक अपघात होऊन शेकडो जणांचा जीव गेला असून अजून किती बळी घेणार असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात