शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

विरारमधील एकाच कुटुंबातील सहा जण अचानक झालेत बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 12:38 IST

विरारमधील शर्मा कुटुंबातील सहा जण 15 ऑक्टोबरपासून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.  

वसई - विरारमधील शर्मा कुटुंबातील सहा जण 15 ऑक्टोबरपासून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.  सुरेंद्र शर्मा ( वय 50), मालती शर्मा (वय 52), वरूण शर्मा (वय 29) प्रियांका शर्मा (वय 16), अश्विनी शर्मा (वय 3), अनिता शर्मा (वय 60 ) अशी शर्मा कुटुंबातील बेपत्तांची नावं आहेत.  विरार पश्‍चिम येथील ग्लोबल सिटीमध्ये हे राहत होते. दरम्यान, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शर्मा कुटुंबातील सून संगीता शर्मा या अमरावती येथे राहतात. त्या जून महिन्यात बाळंतपणासाठी आईकडे गेल्या होत्या. संगीता या वरुण शर्मा यांच्या पत्नी आहेत. 

बाळंतपणापासून संगीता या अमरावतीमध्येच राहत आहेत. 15 जूनला त्यांनी एका मुलीला जन्म दिला. 14 ऑक्टोबरपर्यंत त्यांचा पती वरुणसोबत संपर्क झाला होता. पण त्यानंतर कुटुंबातील कोणाचाही संपर्क होत नसल्याने त्यांनी गुगलवरुन अर्नाळा पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक मिळवला व मेलद्वारे शर्मा कुटुंबीयांची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली.  दरम्यान, पोलिसांना शर्मा कुटुंब राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व कुटुंबीय पहाटेच्या सुमारास समान घेऊन एका कारमधून निघून गेल्याचे दिसून आले आहे. त्यांचे मोबाइलचे लोकेशन सुरुवातीला नाशिक व त्यानंतर सुरत असे दाखवले जात होते. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाइल बंदच आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत, मात्र ठोस अशी माहिती त्यांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही

टॅग्स :Vasai Virarवसई विरार