शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

विरारमधील एकाच कुटुंबातील सहा जण अचानक झालेत बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 12:38 IST

विरारमधील शर्मा कुटुंबातील सहा जण 15 ऑक्टोबरपासून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.  

वसई - विरारमधील शर्मा कुटुंबातील सहा जण 15 ऑक्टोबरपासून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.  सुरेंद्र शर्मा ( वय 50), मालती शर्मा (वय 52), वरूण शर्मा (वय 29) प्रियांका शर्मा (वय 16), अश्विनी शर्मा (वय 3), अनिता शर्मा (वय 60 ) अशी शर्मा कुटुंबातील बेपत्तांची नावं आहेत.  विरार पश्‍चिम येथील ग्लोबल सिटीमध्ये हे राहत होते. दरम्यान, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शर्मा कुटुंबातील सून संगीता शर्मा या अमरावती येथे राहतात. त्या जून महिन्यात बाळंतपणासाठी आईकडे गेल्या होत्या. संगीता या वरुण शर्मा यांच्या पत्नी आहेत. 

बाळंतपणापासून संगीता या अमरावतीमध्येच राहत आहेत. 15 जूनला त्यांनी एका मुलीला जन्म दिला. 14 ऑक्टोबरपर्यंत त्यांचा पती वरुणसोबत संपर्क झाला होता. पण त्यानंतर कुटुंबातील कोणाचाही संपर्क होत नसल्याने त्यांनी गुगलवरुन अर्नाळा पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक मिळवला व मेलद्वारे शर्मा कुटुंबीयांची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली.  दरम्यान, पोलिसांना शर्मा कुटुंब राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व कुटुंबीय पहाटेच्या सुमारास समान घेऊन एका कारमधून निघून गेल्याचे दिसून आले आहे. त्यांचे मोबाइलचे लोकेशन सुरुवातीला नाशिक व त्यानंतर सुरत असे दाखवले जात होते. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाइल बंदच आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत, मात्र ठोस अशी माहिती त्यांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही

टॅग्स :Vasai Virarवसई विरार