शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी भाजपामध्ये बंडाळीची स्थिती, कार्यकर्ते नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:05 IST

पालघर लोकसभा मतदार संघात भाजपाचे वर्चस्व असतांना तो युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला देण्याच्या निर्णया विरोधात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या राजीनामा सत्रा नंतर आता...

- हितेन नाईकपालघर  - पालघर लोकसभा मतदार संघात भाजपाचे वर्चस्व असतांना तो युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला देण्याच्या निर्णया विरोधात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या राजीनामा सत्रा नंतर आता तलासरीतील प्रसिद्धी प्रमुख लुईस काकड यांनी लोकसभेत कमळ चिन्हाचा उमेदवार उभा ना राहिल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्षाना पाठविले आहे.लोकसभा पुनर्रचने पूर्वी पासून या भागात राम नाईकांच्या रूपाने भाजप चे वर्चस्व राहिले होते. त्यांच्या सोबत दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांनी तलासरी भागातील सिपीएम पक्षाशी एक हाती झुंज देत विक्र मगड, जव्हार, मोखाडा भागात पक्षाच्या बळकटीसाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले होते.या जिल्ह्यात भाजप चे दोन आमदार, आदिवासी विकासमंत्री, जिल्हा परिषद, नगरपालिकेवर भाजपा ची सत्ता असतांना भाजप- सेना युतीच्या चर्चेत पालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेला देण्यात आल्याचे कळविण्यात आले. केंद्रात नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणून सत्ता मिळवून देण्यासाठी एक एक खासदार महत्वाचा असल्याचे कारण देत आपला परंपरागत मतदार संघ आपण सेनेला देत असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्या पालघरच्या भेटीत दिले होते.या निर्णया विरोधात जिल्ह्यातील सर्व बूथ अध्यक्षा सह अनेक पदाधिकाऱ्यांंनी आपले राजीनामे वरिष्ठांकडे पाठवल्या नंतरही वरिष्ठां कडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. तलासरीचे आदिवासी आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख लुईस काकड यांनी पक्षाच्या या निर्णया विरोधात बंडाचा झेंडा रोवला असून तलासरी मध्ये १९९२ पासून पक्षाचे काम करीत असल्याचा राग मनात धरून सिपीएम ने माझे घरदार उध्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले.‘कुठल्याही परिस्थितीमध्ये सेनेचे काम करणार नाही’तलासरी येथे जिल्हाध्यक्ष पास्क ल धनारे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत जिप, पस, ग्राप सदस्यांनी शिवसेनेला उमेदवारी देण्याच्या निर्णयाचा ठामपणे विरोध केल्याने सेनाही संभ्रमात आहे.आम्ही कुठल्याही परिस्थितीत सेनेचे काम करणार नसल्याचे सांगून एवढेच होते तर पक्षाने या पूर्वीच श्रीनिवासला उमेदवारी दिली असती तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता असे काकड यांनी लोकमत ला सांगितले.आम्ही आयुष्यभर सिपीएमशी संघर्ष केला. आता शिवसेनेशी संघर्ष करून एकमेकांची डोकी फोडतच बसायचे का? वरिष्ठांनी कार्यकर्त्यांचा सन्मान राखून ही जागा सेनेला देऊ नये.- लुईस काकड,प्रसिद्धी प्रमुख 

टॅग्स :BJPभाजपाpalgharपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक