शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

भगिनी समाज : महिलांची एक आदर्श शैक्षणिक संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:56 IST

१३०० विद्यार्थ्यांना केले जाते ज्ञानदान

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : स्वातंत्र्यपूर्व काळात महिला या चार भिंतीत अडकलेल्या असताना कै. बाबासाहेब दांडेकर त्यांच्या पत्नी रमाबाई दांडेकर तसेच भागीरथीबाई दांडेकर, जानकीदेवी बजाज यांनी उभारलेल्या भगिनी समाज संस्थेच्या रोपट्याचे महाकाय डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील १ हजार ३०० विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य आजही महिला पदाधिकारी, शिक्षिका करीत आहेत.

पालघरमध्ये सन १९३० या स्वातंत्र्यपूर्व काळात भगिनी समाज संस्थेची स्थापना झाली. तेव्हा स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. घराच्या बाहेर पडून एकत्र येऊन काही समाजोपयोगी कार्य करणे ही कल्पनाच नवीन होती. अशा विपरीत परिस्थितीत अनेक महिलांनी एकत्र येत भगिनी समाज संस्थेची स्थापना केली. भगिनींना एकत्र करीत त्यांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक उन्नती करणे, त्यांच्या कलाशक्तीचा उपयोग समाजाच्या सेवांसाठी करून घेणे, एवढाच प्राथमिक उद्देश होता. कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न न राहता फक्त समाजोपयोगी कार्य स्त्रियांकडून करून घेणे व ते करताना कुठलेही धर्मभेद, जातिभेद, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब असा कुठलाच भेद पाळला जात नाही. आजही अनेक समाजोपयोगी उपक्रम तालुका व जिल्ह्यातील महिलांसाठी राबविले जातात. पालघरसारख्या एका खेडेगावात आधुनिक शिक्षण देणाऱ्या बालमंदिराची स्थापना १ एप्रिल १९४९ रोजी ताराबाई मोडक यांच्या हस्ते करण्यात आली. पालघरच्या पंचक्रोशीतील पालकांच्या आग्रहास्तव बालमंदिरातून मुले मोठी झाल्यावर शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता शकुंतला दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सन १९७० साली प्राथमिक शाळेची स्थापना केली. काळानुरूप शाळेबद्दलची विश्वासार्हता वाढू लागल्याने पालक आपली मुले शाळेमध्ये पाठवू लागले. २००५ साली भाग्यश्री दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली. आजघडीला भगिनी समाज संस्थेच्या बालमंदिर, प्राथमिक व माध्यमिक विभागात जवळपास तेराशे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

संस्थेच्या अध्यक्षा माधुरीताई परुळेकर, उपाध्यक्षा तसेच शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा जयश्री सत्तीकर, सेक्रेटरी दीपिका सावले, सल्लागार व मार्गदर्शक वसुमती चित्रे व सदस्य आशा पुरंदरे, भाग्यश्री दांडेकर, अंजली दीक्षित, उषा माळी, दीपा लोखंडे ,नीता प्रभू, वैशाली रहाळकर, अश्विनी कुलकर्णी, निर्मला वर्तक, प्रभावती सामंत आदी भगिनी समाज संस्थेची धुरा सांभाळत आहेत. तसेच बालमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका राजश्री दांडेकर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रीती वर्तक आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तक यांच्या सहकार्याने शाळेची यशस्वी वाटचाल चालू आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार