शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

भगिनी समाज : महिलांची एक आदर्श शैक्षणिक संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:56 IST

१३०० विद्यार्थ्यांना केले जाते ज्ञानदान

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : स्वातंत्र्यपूर्व काळात महिला या चार भिंतीत अडकलेल्या असताना कै. बाबासाहेब दांडेकर त्यांच्या पत्नी रमाबाई दांडेकर तसेच भागीरथीबाई दांडेकर, जानकीदेवी बजाज यांनी उभारलेल्या भगिनी समाज संस्थेच्या रोपट्याचे महाकाय डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील १ हजार ३०० विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य आजही महिला पदाधिकारी, शिक्षिका करीत आहेत.

पालघरमध्ये सन १९३० या स्वातंत्र्यपूर्व काळात भगिनी समाज संस्थेची स्थापना झाली. तेव्हा स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. घराच्या बाहेर पडून एकत्र येऊन काही समाजोपयोगी कार्य करणे ही कल्पनाच नवीन होती. अशा विपरीत परिस्थितीत अनेक महिलांनी एकत्र येत भगिनी समाज संस्थेची स्थापना केली. भगिनींना एकत्र करीत त्यांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक उन्नती करणे, त्यांच्या कलाशक्तीचा उपयोग समाजाच्या सेवांसाठी करून घेणे, एवढाच प्राथमिक उद्देश होता. कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न न राहता फक्त समाजोपयोगी कार्य स्त्रियांकडून करून घेणे व ते करताना कुठलेही धर्मभेद, जातिभेद, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब असा कुठलाच भेद पाळला जात नाही. आजही अनेक समाजोपयोगी उपक्रम तालुका व जिल्ह्यातील महिलांसाठी राबविले जातात. पालघरसारख्या एका खेडेगावात आधुनिक शिक्षण देणाऱ्या बालमंदिराची स्थापना १ एप्रिल १९४९ रोजी ताराबाई मोडक यांच्या हस्ते करण्यात आली. पालघरच्या पंचक्रोशीतील पालकांच्या आग्रहास्तव बालमंदिरातून मुले मोठी झाल्यावर शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता शकुंतला दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सन १९७० साली प्राथमिक शाळेची स्थापना केली. काळानुरूप शाळेबद्दलची विश्वासार्हता वाढू लागल्याने पालक आपली मुले शाळेमध्ये पाठवू लागले. २००५ साली भाग्यश्री दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली. आजघडीला भगिनी समाज संस्थेच्या बालमंदिर, प्राथमिक व माध्यमिक विभागात जवळपास तेराशे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

संस्थेच्या अध्यक्षा माधुरीताई परुळेकर, उपाध्यक्षा तसेच शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा जयश्री सत्तीकर, सेक्रेटरी दीपिका सावले, सल्लागार व मार्गदर्शक वसुमती चित्रे व सदस्य आशा पुरंदरे, भाग्यश्री दांडेकर, अंजली दीक्षित, उषा माळी, दीपा लोखंडे ,नीता प्रभू, वैशाली रहाळकर, अश्विनी कुलकर्णी, निर्मला वर्तक, प्रभावती सामंत आदी भगिनी समाज संस्थेची धुरा सांभाळत आहेत. तसेच बालमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका राजश्री दांडेकर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रीती वर्तक आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तक यांच्या सहकार्याने शाळेची यशस्वी वाटचाल चालू आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार