शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सेना-भाजपातील श्रेयवाद शमला, प्रशासनावर फोडले खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:24 IST

मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले असताना त्याचे श्रेय घेण्या वरुन शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये पेटलेला वाद अखेर मंगळवारी शमला.

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले असताना त्याचे श्रेय घेण्या वरुन शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये पेटलेला वाद अखेर मंगळवारी शमला. शिवसेनेने धरणे धरत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर पालिकेने पुन्हा कामाला सुरवात केली. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविकेने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सोमवारपासून सुरु केलेले धरणे आंदोलन मागे घेतले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.शांतीनगर सेक्टर दोनच्या जलकुंभातुन परिसरातील सेक्टर १, २, शांती विहार, पुनम सागर कॉम्प्लेक्स आदी भागासाठी ४०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरु झाले आहे. पण सोमवारी दुपारी कामाचे श्रेय घेणे आणि नारळ फोडण्यावरुन प्रभागातील स्थानिक शिवसेना नगरसेविका दिप्ती भट आणि भाजपाचे स्थानिक नगरसेवक दिनेश जैन, अश्विन कासोदरीया व हेतल परमार यांच्यात बिनसले. त्यातून भाजपा नगरसेवकांनी ठेकेदाराला काम बंद करायला लावत मंळवारी सकाळी महापौरांच्या हस्ते भुमिपूजन करुन काम सुरु करण्याचा पावित्रा घेतला.काम बंद झाल्याने शिवसेना नगरसेविका भट यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत जलवाहिनी टाकण्याचे पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. पण पालिका अधिकारी आणि ठेकेदाराकडून काम सुरु केले न गेल्याने भट यांनी कामाच्याच ठिकाणी सोमवारपासून धरणे धरले. रात्रभर आणि मंगळवारी दुपारपर्यंत त्या धरणे धरुन होत्या. खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक आदींनी काम बंद केल्याबद्दल प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला. तर माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, माजी उपमहापपौर प्रवीण पाटील, माजी गटनेत्या नीलम ढवण, माजी विरोधी पक्षनेत लक्ष्मण जंगम, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शंकर वीरकर, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, धनेश पाटील आदींनी भट यांच्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.अखेर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे हे मंगळवारी दुपारी भाजपा नगरसेवक दिनेश जैन व हेतल परमार यांना घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी आले. नगरसेवकांना कामाची माहिती दिली नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच चौघे नगरसेवक एकत्र मिळून नारळ फोडू, अशी सूचना त्यांनी केली. त्यावरुन पुन्हा वादविवाद सुरु झाला. पुन्हा नारळ फोडायची गरज नाही, काम सुरु करा, असा पावित्रा भट आदींनी घेतला. शेवटी जैन व परमार या नगरसेवकांनीही नारळ फोडण्याचा मुद्दा बाजुला ठेवला. अखेर जलवाहिनी टाकण्याच्या कामास पुन्हा सुरवात करण्यात आली आणि भट यांचे धरणे आंदोलन संपुष्टात आले.आधी दोन नगरसेवकांचा प्रभाग होता, तेव्हाही वेगवेगळ््या पक्षाच्या नगरसेवकांचे एकमेकांशी पटत नव्हते. आता चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने वाद जास्तच वाढणार असल्याची ही सुरूवात मानली जाते. नगरसेवकांकडून सामंजस्य दाखवले जाणे आवश्यक असून मुळात प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेमुळे वाद विकोपाला जातील, अशी भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा