शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

शिवसेनेच्या राजकारणाला राष्ट्रवादी बळी पडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 23:05 IST

विकासकामांना पाठिंबा । जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण

ठाणे : महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या वादाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. शिवसेनेने आयुक्तांचा वापर करून घेतला असून आता त्यांच्या मर्जीप्रमाणे कामे होत नसल्यानेच त्यांनी आयुक्तांविरोधात भूमिका घेतली असल्याचा धक्कादायक आरोप राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केला. त्यामुळे शिवसेनेच्या या घाणेरड्या राजकारणाचा बळी आम्ही होणार नसल्याचे स्पष्ट करून आमचा पाठिंबा हा यापूर्वीही विकासाला होता आणि यापुढेही तो राहील, असे सांगून शिवसेनेची कोंडी केली.दोन दिवसांपासून आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असा वाद सुरू आहे. आयुक्तांना हटवण्यासाठी अविश्वास ठरावही मंजूर केला. परंतु, त्यानंतर आता राष्टÑवादीने अचानक आपली भूमिका बदलून थेट सत्ताधारी शिवसेनाच याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वीसुद्धा आम्ही खाडीतील शुद्ध पाण्याचा प्रकल्प, संकरा नेत्रालयाला विरोध केला होता, जे प्रस्ताव योग्य नाहीत, अशा सर्वच प्रस्तावांना आमचा कालही विरोध होता, तो आजही तसाच कायम असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. वरिष्ठांकडून आलेले चुकीचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यात सेनेला अडचणी आल्यानेच त्यांनी आयुक्तांवरच निशाणा साधल्याचे ते म्हणाले. आयुक्तांना शिवसेना चालवत असून त्यांचा चुकीच्या कामांमध्ये उपयोग होत नसल्याने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होतो आहे असा आरोप केला. स्थायी, स्वीकृतच्या निवडणुकीतही त्यांनी आयुक्तांना बाजूने बोलण्यास भाग पाडल्याचेही त्यांनी सांगितले.‘ते’ गरज पडल्यास आयुक्तांच्या पाया पडतातनामंजूर केलेल्या विषयांना पाठिंबा त्यांच्या पक्षातील नगरसेवकांनी दिला आहे. आव्हाड हे त्यांच्या नगरसेवकांच्या बाजूने आहेत की विरोधात, हे स्पष्ट करावे. पक्षाची गळती आधी रोखावी, मग शिवसेना काय करते आणि काय नाही करत, याचा विचार करावा. एखादा प्रस्ताव मंजूर करायचा असेल, तर त्यासाठी आमच्याकडे संपूर्ण बहुमत आहे. आव्हाडांच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही. - नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपाशिवसेना एका भूमिकेवर आजपर्यंत केव्हाच ठाम राहिलेली नाही. गरज पडली तर ते आयुक्तांचे पायही धरतात आणि गरज सरली की, ते त्यांच्याविरोधातही बोलतात. ज्युपिटरच्या प्रस्तावाबाबत कोण कोणाला भेटले, कुठे कोणत्या प्रस्तावावर चर्चा झाली, याची सर्व माहिती आम्हाला आहे, वेळ आली की ती दिली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सहासहा दिवस एक महासभा सुरू ठेवण्यामागे आपली प्रकरणे मंजूर करून घेणे हा हेतू असतो. एखाद्या प्रकरणात खोडा आला, तर महासभा लांबवली जात असल्याचा आरोप राष्टÑवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. महासभेत केवळ अधिकाऱ्यांनी आपल्या बाजूने खोटे बोलावे, पण रेटून बोलावे, एवढीच अपेक्षा शिवसेनेची असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :vasai-acवसईVasai Virarवसई विरारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड