शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या राजकारणाला राष्ट्रवादी बळी पडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 23:05 IST

विकासकामांना पाठिंबा । जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण

ठाणे : महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या वादाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. शिवसेनेने आयुक्तांचा वापर करून घेतला असून आता त्यांच्या मर्जीप्रमाणे कामे होत नसल्यानेच त्यांनी आयुक्तांविरोधात भूमिका घेतली असल्याचा धक्कादायक आरोप राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केला. त्यामुळे शिवसेनेच्या या घाणेरड्या राजकारणाचा बळी आम्ही होणार नसल्याचे स्पष्ट करून आमचा पाठिंबा हा यापूर्वीही विकासाला होता आणि यापुढेही तो राहील, असे सांगून शिवसेनेची कोंडी केली.दोन दिवसांपासून आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असा वाद सुरू आहे. आयुक्तांना हटवण्यासाठी अविश्वास ठरावही मंजूर केला. परंतु, त्यानंतर आता राष्टÑवादीने अचानक आपली भूमिका बदलून थेट सत्ताधारी शिवसेनाच याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वीसुद्धा आम्ही खाडीतील शुद्ध पाण्याचा प्रकल्प, संकरा नेत्रालयाला विरोध केला होता, जे प्रस्ताव योग्य नाहीत, अशा सर्वच प्रस्तावांना आमचा कालही विरोध होता, तो आजही तसाच कायम असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. वरिष्ठांकडून आलेले चुकीचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यात सेनेला अडचणी आल्यानेच त्यांनी आयुक्तांवरच निशाणा साधल्याचे ते म्हणाले. आयुक्तांना शिवसेना चालवत असून त्यांचा चुकीच्या कामांमध्ये उपयोग होत नसल्याने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होतो आहे असा आरोप केला. स्थायी, स्वीकृतच्या निवडणुकीतही त्यांनी आयुक्तांना बाजूने बोलण्यास भाग पाडल्याचेही त्यांनी सांगितले.‘ते’ गरज पडल्यास आयुक्तांच्या पाया पडतातनामंजूर केलेल्या विषयांना पाठिंबा त्यांच्या पक्षातील नगरसेवकांनी दिला आहे. आव्हाड हे त्यांच्या नगरसेवकांच्या बाजूने आहेत की विरोधात, हे स्पष्ट करावे. पक्षाची गळती आधी रोखावी, मग शिवसेना काय करते आणि काय नाही करत, याचा विचार करावा. एखादा प्रस्ताव मंजूर करायचा असेल, तर त्यासाठी आमच्याकडे संपूर्ण बहुमत आहे. आव्हाडांच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही. - नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपाशिवसेना एका भूमिकेवर आजपर्यंत केव्हाच ठाम राहिलेली नाही. गरज पडली तर ते आयुक्तांचे पायही धरतात आणि गरज सरली की, ते त्यांच्याविरोधातही बोलतात. ज्युपिटरच्या प्रस्तावाबाबत कोण कोणाला भेटले, कुठे कोणत्या प्रस्तावावर चर्चा झाली, याची सर्व माहिती आम्हाला आहे, वेळ आली की ती दिली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सहासहा दिवस एक महासभा सुरू ठेवण्यामागे आपली प्रकरणे मंजूर करून घेणे हा हेतू असतो. एखाद्या प्रकरणात खोडा आला, तर महासभा लांबवली जात असल्याचा आरोप राष्टÑवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. महासभेत केवळ अधिकाऱ्यांनी आपल्या बाजूने खोटे बोलावे, पण रेटून बोलावे, एवढीच अपेक्षा शिवसेनेची असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :vasai-acवसईVasai Virarवसई विरारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड