शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

उमेदवारी बदलांना शिवसैनिकांकडून होणार विरोध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:54 IST

चिंतामण वनगांच्या आकस्मिक मृत्यूनंतर लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलाला श्रीनिवास यांना उद्धव ठाकरे यांनी सेनेकडून उमेदवारी देत भाजपला शह देण्याचा डाव रचला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी चांगले जनमत असलेल्या काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना भाजपची उमेदवारी देत जागाही जिंकून घेतली.

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी बदलण्याचे संकेत मिळत असून पालघरला अमित घोडा यांच्या जागी श्रीनिवास वनगा तर बोईसरला बविआचे आमदार विलास तरे यांचा शिवसेनेत प्रवेश होत त्यांना बोईसरची उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. या दोन्ही बदलांना शिवसैनिक,पदाधिकाऱ्यांमधून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चिंतामण वनगांच्या आकस्मिक मृत्यूनंतर लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलाला श्रीनिवास यांना उद्धव ठाकरे यांनी सेनेकडून उमेदवारी देत भाजपला शह देण्याचा डाव रचला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी चांगले जनमत असलेल्या काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना भाजपची उमेदवारी देत जागाही जिंकून घेतली. त्यानंतरच्या २०१८ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभेची जागा आपल्या पदरात पाडून घेतल्याने श्रीनिवासलाच पुन्हा उमेदवारी मिळेल असे वाटत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपमधून राजेंद्र गावितांना सेनेत प्रवेश देत जागाही जिंकून घेतली. त्यामुळे पुन्हा श्रीनिवास यांना हात चोळत बसावे लागले होते.

उद्धव यांनी बोलताना श्रीनिवासवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे जाहीर वक्तव्य केल्याने त्याच्या पुनर्वसनाचा पेच उद्धव यांच्यापुढे असून जनमानसात आपल्यावरचा विश्वास ढळू न देता श्रीनिवासचे योग्य पुनर्वसन करावे लागणार आहे.त्यामुळे पालघर विधानसभेचे तिकीट श्रीनिवासला देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिक,पदाधिकाऱ्यांचा विरोध होत आहे.श्रीनिवास यांना पालघरची उमेदवारी दिल्यास आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहू, मात्र मतदारसंघात प्रचाराचे कुठलेच काम न करता शांत राहण्याची भूमिका स्वीकारू असे आपले नाव न छापण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ पदाधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.

बोईसर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून जगदीश धोडी यांचे प्रयत्न सुरू असले तरी त्यांना माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांच्यासह अनेकांचा विरोध आहे. या वादामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वास वळवी यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर आपल्याला उमेदवारी मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मी एक शिवसैनिक असून पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखविल्यास आपण लढण्यास तयार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. त्यांचे शिवसेनेतील अनेक वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. तर दुसºया बाजूने बहुजन विकास आघाडी पक्षाच्या जोरावर दोन वेळा निवडून आलेले आमदार तरे यांना यावर्षी बविआकडून उमेदवारी मिळणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेकडून बोईसर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न चालविले आहेत. परंतु आपल्या कारकिर्दीत आपल्या जवळच्या लोकांना कामाचे कंत्राट देणे, आपल्या आमदारकीच्या जोरावर विशिष्ट लोकांचीच कामे करून देणे, महामार्गासाठी शेतजमिनी संपादित करण्याविरोधातील आंदोलनात त्यांचा सहभाग नसणे, सूर्याचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी व जनतेला पिण्यासाठी मिळावे या आंदोलनातही ते कुठे दिसलेच नाहीत.तरे अनेक महिन्यांपासून सेनेच्या संपर्कातबविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार म्हणून आ. तरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जनमतावर विशेष प्रभाव निर्माण केलेला नसल्याने त्यांना यावर्षी बविआकडून उमेदवारी नाकारण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे तरे शिवसेनेच्या संपर्कात होते.बविआला झटके बसण्याची चिन्हेउद्या मुंबईत त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती असून या विधानसभा निवडणुकीत बविआ पक्षाला अनेक झटके बसण्याची शक्यता असून दुसरीकडे माजी राज्यमंत्री व बविआच्या पालघर विधानसभेच्या उमेदवार मनीषा निमकर याही अन्य पक्षांच्या पर्यायाची चाचपणी करत असल्याने पालघर लोकसभेच्या कार्यक्षेत्रात येत्या आठवडाभरात पक्षांतराची मोठी उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :palgharपालघरShiv Senaशिवसेना