शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी बदलांना शिवसैनिकांकडून होणार विरोध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:54 IST

चिंतामण वनगांच्या आकस्मिक मृत्यूनंतर लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलाला श्रीनिवास यांना उद्धव ठाकरे यांनी सेनेकडून उमेदवारी देत भाजपला शह देण्याचा डाव रचला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी चांगले जनमत असलेल्या काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना भाजपची उमेदवारी देत जागाही जिंकून घेतली.

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी बदलण्याचे संकेत मिळत असून पालघरला अमित घोडा यांच्या जागी श्रीनिवास वनगा तर बोईसरला बविआचे आमदार विलास तरे यांचा शिवसेनेत प्रवेश होत त्यांना बोईसरची उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. या दोन्ही बदलांना शिवसैनिक,पदाधिकाऱ्यांमधून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चिंतामण वनगांच्या आकस्मिक मृत्यूनंतर लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलाला श्रीनिवास यांना उद्धव ठाकरे यांनी सेनेकडून उमेदवारी देत भाजपला शह देण्याचा डाव रचला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी चांगले जनमत असलेल्या काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना भाजपची उमेदवारी देत जागाही जिंकून घेतली. त्यानंतरच्या २०१८ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभेची जागा आपल्या पदरात पाडून घेतल्याने श्रीनिवासलाच पुन्हा उमेदवारी मिळेल असे वाटत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपमधून राजेंद्र गावितांना सेनेत प्रवेश देत जागाही जिंकून घेतली. त्यामुळे पुन्हा श्रीनिवास यांना हात चोळत बसावे लागले होते.

उद्धव यांनी बोलताना श्रीनिवासवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे जाहीर वक्तव्य केल्याने त्याच्या पुनर्वसनाचा पेच उद्धव यांच्यापुढे असून जनमानसात आपल्यावरचा विश्वास ढळू न देता श्रीनिवासचे योग्य पुनर्वसन करावे लागणार आहे.त्यामुळे पालघर विधानसभेचे तिकीट श्रीनिवासला देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिक,पदाधिकाऱ्यांचा विरोध होत आहे.श्रीनिवास यांना पालघरची उमेदवारी दिल्यास आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहू, मात्र मतदारसंघात प्रचाराचे कुठलेच काम न करता शांत राहण्याची भूमिका स्वीकारू असे आपले नाव न छापण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ पदाधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.

बोईसर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून जगदीश धोडी यांचे प्रयत्न सुरू असले तरी त्यांना माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांच्यासह अनेकांचा विरोध आहे. या वादामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वास वळवी यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर आपल्याला उमेदवारी मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मी एक शिवसैनिक असून पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखविल्यास आपण लढण्यास तयार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. त्यांचे शिवसेनेतील अनेक वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. तर दुसºया बाजूने बहुजन विकास आघाडी पक्षाच्या जोरावर दोन वेळा निवडून आलेले आमदार तरे यांना यावर्षी बविआकडून उमेदवारी मिळणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेकडून बोईसर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न चालविले आहेत. परंतु आपल्या कारकिर्दीत आपल्या जवळच्या लोकांना कामाचे कंत्राट देणे, आपल्या आमदारकीच्या जोरावर विशिष्ट लोकांचीच कामे करून देणे, महामार्गासाठी शेतजमिनी संपादित करण्याविरोधातील आंदोलनात त्यांचा सहभाग नसणे, सूर्याचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी व जनतेला पिण्यासाठी मिळावे या आंदोलनातही ते कुठे दिसलेच नाहीत.तरे अनेक महिन्यांपासून सेनेच्या संपर्कातबविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार म्हणून आ. तरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जनमतावर विशेष प्रभाव निर्माण केलेला नसल्याने त्यांना यावर्षी बविआकडून उमेदवारी नाकारण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे तरे शिवसेनेच्या संपर्कात होते.बविआला झटके बसण्याची चिन्हेउद्या मुंबईत त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती असून या विधानसभा निवडणुकीत बविआ पक्षाला अनेक झटके बसण्याची शक्यता असून दुसरीकडे माजी राज्यमंत्री व बविआच्या पालघर विधानसभेच्या उमेदवार मनीषा निमकर याही अन्य पक्षांच्या पर्यायाची चाचपणी करत असल्याने पालघर लोकसभेच्या कार्यक्षेत्रात येत्या आठवडाभरात पक्षांतराची मोठी उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :palgharपालघरShiv Senaशिवसेना