शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

तानसा नदीवरील मेढे, पांढरतारा पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:36 IST

१२ गावांचा संपर्क तुटला : नदीकाठच्या गावांना धोका

पारोळ : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. या नदीवरील मेढे आणि पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने वसई पूर्वेकडील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच हे पूल पाण्याखाली गेले आहेत.

दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने वसई-विरार शहरांसह वसईच्या ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत. तानसा नदीच्या पात्राने अद्याप धोक्याची पातळी सोडलेली नाही. मात्र, नदीकिनारी किंवा ज्या सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे, नागरिकांना तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.वसई पूर्व परिसरातून वाहणाऱ्या तानसा नदीचे पात्र बुधवारी दुथडी भरून वाहत होते. नदीवर असलेल्या मेढे व पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने भाताणे, नवसई, आडणे, भिनार, आंबिडे मेढे, वडघर, कळभोंण लेंडी, थळ्याचापाडा, हत्तीपाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक वर्षांपासून या दोन या पुलांची उंची वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. तर, मेढे येथे तानसा नदीवर नवीन पुलाच्या कामाचा दोन वेळा नारळ फुटूनही दोन वर्षांपासून या नवीन पुलाचे काम बंद आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जुन्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस