शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

तानसा नदीवरील मेढे, पांढरतारा पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:36 IST

१२ गावांचा संपर्क तुटला : नदीकाठच्या गावांना धोका

पारोळ : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. या नदीवरील मेढे आणि पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने वसई पूर्वेकडील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच हे पूल पाण्याखाली गेले आहेत.

दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने वसई-विरार शहरांसह वसईच्या ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत. तानसा नदीच्या पात्राने अद्याप धोक्याची पातळी सोडलेली नाही. मात्र, नदीकिनारी किंवा ज्या सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे, नागरिकांना तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.वसई पूर्व परिसरातून वाहणाऱ्या तानसा नदीचे पात्र बुधवारी दुथडी भरून वाहत होते. नदीवर असलेल्या मेढे व पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने भाताणे, नवसई, आडणे, भिनार, आंबिडे मेढे, वडघर, कळभोंण लेंडी, थळ्याचापाडा, हत्तीपाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक वर्षांपासून या दोन या पुलांची उंची वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. तर, मेढे येथे तानसा नदीवर नवीन पुलाच्या कामाचा दोन वेळा नारळ फुटूनही दोन वर्षांपासून या नवीन पुलाचे काम बंद आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जुन्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस