शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

तानसा नदीवरील मेढे, पांढरतारा पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:36 IST

१२ गावांचा संपर्क तुटला : नदीकाठच्या गावांना धोका

पारोळ : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. या नदीवरील मेढे आणि पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने वसई पूर्वेकडील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच हे पूल पाण्याखाली गेले आहेत.

दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने वसई-विरार शहरांसह वसईच्या ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत. तानसा नदीच्या पात्राने अद्याप धोक्याची पातळी सोडलेली नाही. मात्र, नदीकिनारी किंवा ज्या सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे, नागरिकांना तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.वसई पूर्व परिसरातून वाहणाऱ्या तानसा नदीचे पात्र बुधवारी दुथडी भरून वाहत होते. नदीवर असलेल्या मेढे व पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने भाताणे, नवसई, आडणे, भिनार, आंबिडे मेढे, वडघर, कळभोंण लेंडी, थळ्याचापाडा, हत्तीपाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक वर्षांपासून या दोन या पुलांची उंची वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. तर, मेढे येथे तानसा नदीवर नवीन पुलाच्या कामाचा दोन वेळा नारळ फुटूनही दोन वर्षांपासून या नवीन पुलाचे काम बंद आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जुन्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस