शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

पालघर जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:03 IST

ग्रामीण भागात परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे निर्देश : ३० नोव्हेंबरपर्यंत पालकांची संमती घेण्याच्या सूचना

हितेंन नाईक/अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील नववी ते बारावी इयत्तांच्या शाळा उघडण्याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानुसार जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत आणि पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असलेल्या गावांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील शाळांनी ३० नोव्हेंबरपर्यंत पालकांचे संमती पत्रक घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार शाळा उघडण्याचे निर्देश दिले आहेत.

पालघरच्या शेजारी असलेल्या मुंबई, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांतील शाळा २३ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शाळा उघडण्याबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांप्रमाणेच नागरिकांमध्येही साशंकता होती. रविवारी जिल्हा प्रशासनाने शाळा उघडण्याबाबत पुढील आदेशाची वाट पाहण्याचे निर्देश शैक्षणिक संस्थांना दिले होते. त्यामुळे विद्यार्थी-पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शाळा उघडण्याबाबत तूर्तास थांबण्याचे कळविण्यात आले. त्यामुळे सोमवारी शाळांची दारे विद्यार्थ्यांकरिता उघडली नाहीत, मात्र शाळा कधी उघडणार याबाबत उत्सुकता वाढलेली दिसली.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार आढावा बैठक घेऊन शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या १० नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार चर्चा करण्यात आली. त्याकरिता पालघरचे खासदार राजेंद्र गावित, सहा मतदारसंघातील आमदार आणि वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. भौगोलिक परिसर आणि सध्याची कोविडची स्थिती याअनुषंगाने वसई-विरार महापालिका क्षेत्र, पालघर, डहाणू, जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड या नगरपंचायती क्षेत्र आणि बोईसर, तारापूर या औद्योगिक परिसराच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तूर्तास शाळा बंदच राहणार आहेत. 

चाचण्या थांबवल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत शाळेला संमतीपत्रकाद्वारे पाल्याला शाळेत पाठविण्याची सहमती कळवायची आहे. दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने तालुकस्तरावर शिक्षकांच्या कोविड चाचणीस प्रारंभ केला आहे. अशा चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारच्या बैठकीत नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 

...तर अँटिजेन चाचणी ज्या भागात शाळा सुरू होणार असतील, तेथील शिक्षकांनी नजीकच्या आरोग्य उपकेंद्रात व सीसीसी सेंटरवर जाऊन आरटीपीसीआर चाचणी करायची आहे. ज्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यापूर्वी चाचणी केली आहे, त्यांना तूर्तास चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मात्र ज्या शिक्षकांमध्ये लक्षणे आढळली असल्यास त्यांना अँटिजेन चाचणी करावी लागणार असून अहवाल निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार