शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

पालघर जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:03 IST

ग्रामीण भागात परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे निर्देश : ३० नोव्हेंबरपर्यंत पालकांची संमती घेण्याच्या सूचना

हितेंन नाईक/अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील नववी ते बारावी इयत्तांच्या शाळा उघडण्याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानुसार जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत आणि पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असलेल्या गावांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील शाळांनी ३० नोव्हेंबरपर्यंत पालकांचे संमती पत्रक घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार शाळा उघडण्याचे निर्देश दिले आहेत.

पालघरच्या शेजारी असलेल्या मुंबई, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांतील शाळा २३ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शाळा उघडण्याबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांप्रमाणेच नागरिकांमध्येही साशंकता होती. रविवारी जिल्हा प्रशासनाने शाळा उघडण्याबाबत पुढील आदेशाची वाट पाहण्याचे निर्देश शैक्षणिक संस्थांना दिले होते. त्यामुळे विद्यार्थी-पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शाळा उघडण्याबाबत तूर्तास थांबण्याचे कळविण्यात आले. त्यामुळे सोमवारी शाळांची दारे विद्यार्थ्यांकरिता उघडली नाहीत, मात्र शाळा कधी उघडणार याबाबत उत्सुकता वाढलेली दिसली.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार आढावा बैठक घेऊन शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या १० नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार चर्चा करण्यात आली. त्याकरिता पालघरचे खासदार राजेंद्र गावित, सहा मतदारसंघातील आमदार आणि वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. भौगोलिक परिसर आणि सध्याची कोविडची स्थिती याअनुषंगाने वसई-विरार महापालिका क्षेत्र, पालघर, डहाणू, जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड या नगरपंचायती क्षेत्र आणि बोईसर, तारापूर या औद्योगिक परिसराच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तूर्तास शाळा बंदच राहणार आहेत. 

चाचण्या थांबवल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत शाळेला संमतीपत्रकाद्वारे पाल्याला शाळेत पाठविण्याची सहमती कळवायची आहे. दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने तालुकस्तरावर शिक्षकांच्या कोविड चाचणीस प्रारंभ केला आहे. अशा चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारच्या बैठकीत नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 

...तर अँटिजेन चाचणी ज्या भागात शाळा सुरू होणार असतील, तेथील शिक्षकांनी नजीकच्या आरोग्य उपकेंद्रात व सीसीसी सेंटरवर जाऊन आरटीपीसीआर चाचणी करायची आहे. ज्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यापूर्वी चाचणी केली आहे, त्यांना तूर्तास चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मात्र ज्या शिक्षकांमध्ये लक्षणे आढळली असल्यास त्यांना अँटिजेन चाचणी करावी लागणार असून अहवाल निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार