शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

मोखाड्यात टंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी मायलेकींची मैलोन्मैल पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 23:11 IST

तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही.

- रविंद्र साळवे मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही. नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या २४ नळ पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना आदींमुळे टँकर मुक्त गावाची संख्या वर्ष निहाय वाढत चालली आहे. लांबच लांब पायपिट करुन हंडाभर पाणी मिळत असल्याने हाताला काम नको, खायला अन्न नको पण प्यायला पाणी द्या अशी आर्त हाक येथील आदिवासी गावकऱ्यांनी दिली आहे.तालुक्यात जवळपास ५ मोठी धरणे असुन तेथून १२० किलो मीटर अंतरावर असणाऱ्या मुबंई शहराला पाणी पुरवठा होत आहे. मात्र, स्थानिक गाव पाडे पाण्याविना तहानलेलिच आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील ४६ गाव पाड्यात पाणी बाणीचे संकट निर्माण झाले असून दिवसाआड टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना १५ टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या गावातून टॅँकर मागणीचे प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे येऊन धडकत असल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडत आहे.उन्हाळ्याच्या सुरवातीला दरवर्षी उद्भवणाºया परिस्थिती वर कायम स्वरु पी तोडगा काढण्याचे शहाणपण मात्र कोणालाच सुचत नसल्याने गाव पाडे वासियांकडुन रोष व्यक्त केला जात आहे. गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाºय विहिरींपासुन टंचाई ग्रस्त गाव पाडे २०-२५ किलो मीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे.महत्त्वाची बाब म्हणजे टंचाई ग्रस्त नागरिकांना हातातली कामे सोडुन देऊन घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे तर टँकर चालु असलेल्या गाव पाड्यांतील जनतेला चातक पक्षा प्रमाणे टँकर ची दिवसभर वाट बघावी लागत असुन मोलमजुरी करु न पोटाची खळगी भरणार्या आदिवासी बांधवाची मोठी अडचण झाली आहे.दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने संताप : राज्य शासनाने जव्हार मोखाडा हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. टंचाईग्रस्त गावपाड्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु असे असताना देखील तालुक्यातील कीनिस्ते, शेलमपाडा, धामोडी, पाथर्डी, डोंगर वाडी, वशिंद या गावपाड्यांना दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने येथील आदिवासीची पाण्यासाठी होणारी पायपीट आणखी वाढली आहेपुढाऱ्यांवर रोषआगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून विजयाची गणिते जुळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून कंबर कसली जाणार आहे. परंतु गेल्या अनेक निवडणुकांच्या आश्वासनात येथील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. भूमिपुत्रांचेच्या हक्काचे पाणी मुबंईला पुरवले जाते परंतु स्थानिक पाणी टंचाई भोगत आहेत.धरना लगत असलेल्या गावांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना नकरता टँकर लॉबीच्या घशात कोट्यवधी रु पये घालण्याचा वाझोटा प्रयत्न दरवर्षीच प्रशासनाकडून केला जात आहे. यामुळे पाण्याच्या प्रश्नावरु न पुढाºयांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई