शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मोखाड्यात टंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी मायलेकींची मैलोन्मैल पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 23:11 IST

तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही.

- रविंद्र साळवे मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधींकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याने आदिवासीची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजुन ही थांबलेली नाही. नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या २४ नळ पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना आदींमुळे टँकर मुक्त गावाची संख्या वर्ष निहाय वाढत चालली आहे. लांबच लांब पायपिट करुन हंडाभर पाणी मिळत असल्याने हाताला काम नको, खायला अन्न नको पण प्यायला पाणी द्या अशी आर्त हाक येथील आदिवासी गावकऱ्यांनी दिली आहे.तालुक्यात जवळपास ५ मोठी धरणे असुन तेथून १२० किलो मीटर अंतरावर असणाऱ्या मुबंई शहराला पाणी पुरवठा होत आहे. मात्र, स्थानिक गाव पाडे पाण्याविना तहानलेलिच आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील ४६ गाव पाड्यात पाणी बाणीचे संकट निर्माण झाले असून दिवसाआड टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना १५ टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या गावातून टॅँकर मागणीचे प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे येऊन धडकत असल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडत आहे.उन्हाळ्याच्या सुरवातीला दरवर्षी उद्भवणाºया परिस्थिती वर कायम स्वरु पी तोडगा काढण्याचे शहाणपण मात्र कोणालाच सुचत नसल्याने गाव पाडे वासियांकडुन रोष व्यक्त केला जात आहे. गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाºय विहिरींपासुन टंचाई ग्रस्त गाव पाडे २०-२५ किलो मीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे.महत्त्वाची बाब म्हणजे टंचाई ग्रस्त नागरिकांना हातातली कामे सोडुन देऊन घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे तर टँकर चालु असलेल्या गाव पाड्यांतील जनतेला चातक पक्षा प्रमाणे टँकर ची दिवसभर वाट बघावी लागत असुन मोलमजुरी करु न पोटाची खळगी भरणार्या आदिवासी बांधवाची मोठी अडचण झाली आहे.दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने संताप : राज्य शासनाने जव्हार मोखाडा हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. टंचाईग्रस्त गावपाड्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु असे असताना देखील तालुक्यातील कीनिस्ते, शेलमपाडा, धामोडी, पाथर्डी, डोंगर वाडी, वशिंद या गावपाड्यांना दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने येथील आदिवासीची पाण्यासाठी होणारी पायपीट आणखी वाढली आहेपुढाऱ्यांवर रोषआगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून विजयाची गणिते जुळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून कंबर कसली जाणार आहे. परंतु गेल्या अनेक निवडणुकांच्या आश्वासनात येथील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. भूमिपुत्रांचेच्या हक्काचे पाणी मुबंईला पुरवले जाते परंतु स्थानिक पाणी टंचाई भोगत आहेत.धरना लगत असलेल्या गावांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना नकरता टँकर लॉबीच्या घशात कोट्यवधी रु पये घालण्याचा वाझोटा प्रयत्न दरवर्षीच प्रशासनाकडून केला जात आहे. यामुळे पाण्याच्या प्रश्नावरु न पुढाºयांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई