शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांची मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांना सोडू नये!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:40 IST

सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांची मागणी

डहाणू : डहाणू तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया लहान मोठ्या अशा दहा ते बारा ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामसेवकाच्या बदल्या नुकत्याच जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या आहेत. परंतु काही ठिकाणी नवीन ग्रामसेवक हजर झाले असले तरी अद्याप मोठ-मोठ्या ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी रुजू झाले नसल्याने जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत जुन्या ग्रामविकास अधिकाºयाला कार्यमुक्त करू नये, अशी मागणी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने डहाणूचे गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे यांना केली आहे.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात १७४ महसूल गावे असून ९६० लहान-मोठे पाडे आहेत. डहाणूच्या जंगलपट्टी तसेच बंदरपट्टी भागातील दोन-तीन ग्रामपंचायतीचा कारोभार एका ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने डहाणूतील दुर्गम भागातील असंख्य गावांचा विकास खुंटला आहे. शिवाय शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी, तसेच ना हरकत इत्यादी ग्रमपंचायतीचा दाखला घेण्यासाठी ग्रामस्थांना दिवसभर लांब पल्ल्यांवर असलेल्या ग्रामपंचायतीत जावून ग्रामविकास अधिकाºयांना शोधावे लागते. त्यामुळे गावाचा विकासासाठी पूर्णवेळ ग्रामसेवक गरजेचे आहे.पालघर जिल्हा परिषद प्रशासनाने पालघर लोकसभेच्या निवडणुकीनंतर डहाणूतील बावडा, गुंगवाडा, रायतळी, वाढववण बरोबरच माडेगाव, चिंचणी, वरोर, आशागड, दाशोमी इत्यादी सारख्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयाच्या बदल्या केल्या. एक-दोन ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी संबंधित ग्रामपंचायतीला हजर झाले असले तरी आधीच बहुसंख्य पंचायतील प्रशासकीय अधिकारी हजर झालेले नाहीत. त्यातच पालघर जिल्हा परिषदेने १७ जूनच्या एका आदेशान्वये बदली झालेल्या ग्रामविकास अधिकाºयांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.ग्रामविकास अधिकाºयाविना ग्रामपंचायत चालणार कशी? केव्हा मिळणार प्रशासकीय अधिकारी असा प्रश्न ग्रामस्थ करीत असून जोपर्यंत नवीन प्रशासकीय अधिकारी संबंधित ग्रामपंचायतीत हजर होत नाही तोपर्यंत विद्यमान अधिकाºयाला कार्यमुक्त करू नये, अशी मागणी तालुक्याभराूतन होऊ लागली आहे.