शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

'सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांची मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांना सोडू नये!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:40 IST

सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांची मागणी

डहाणू : डहाणू तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया लहान मोठ्या अशा दहा ते बारा ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामसेवकाच्या बदल्या नुकत्याच जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या आहेत. परंतु काही ठिकाणी नवीन ग्रामसेवक हजर झाले असले तरी अद्याप मोठ-मोठ्या ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी रुजू झाले नसल्याने जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत जुन्या ग्रामविकास अधिकाºयाला कार्यमुक्त करू नये, अशी मागणी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने डहाणूचे गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे यांना केली आहे.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात १७४ महसूल गावे असून ९६० लहान-मोठे पाडे आहेत. डहाणूच्या जंगलपट्टी तसेच बंदरपट्टी भागातील दोन-तीन ग्रामपंचायतीचा कारोभार एका ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने डहाणूतील दुर्गम भागातील असंख्य गावांचा विकास खुंटला आहे. शिवाय शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी, तसेच ना हरकत इत्यादी ग्रमपंचायतीचा दाखला घेण्यासाठी ग्रामस्थांना दिवसभर लांब पल्ल्यांवर असलेल्या ग्रामपंचायतीत जावून ग्रामविकास अधिकाºयांना शोधावे लागते. त्यामुळे गावाचा विकासासाठी पूर्णवेळ ग्रामसेवक गरजेचे आहे.पालघर जिल्हा परिषद प्रशासनाने पालघर लोकसभेच्या निवडणुकीनंतर डहाणूतील बावडा, गुंगवाडा, रायतळी, वाढववण बरोबरच माडेगाव, चिंचणी, वरोर, आशागड, दाशोमी इत्यादी सारख्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयाच्या बदल्या केल्या. एक-दोन ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी संबंधित ग्रामपंचायतीला हजर झाले असले तरी आधीच बहुसंख्य पंचायतील प्रशासकीय अधिकारी हजर झालेले नाहीत. त्यातच पालघर जिल्हा परिषदेने १७ जूनच्या एका आदेशान्वये बदली झालेल्या ग्रामविकास अधिकाºयांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.ग्रामविकास अधिकाºयाविना ग्रामपंचायत चालणार कशी? केव्हा मिळणार प्रशासकीय अधिकारी असा प्रश्न ग्रामस्थ करीत असून जोपर्यंत नवीन प्रशासकीय अधिकारी संबंधित ग्रामपंचायतीत हजर होत नाही तोपर्यंत विद्यमान अधिकाºयाला कार्यमुक्त करू नये, अशी मागणी तालुक्याभराूतन होऊ लागली आहे.