शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

शाळकरी मुलांच्या बॅगेत चॉकलेटऐवजी सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:22 IST

कोरोनाची भीती कायम

- शशिकांत ठाकूरकासा : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने  गेल्या दोन महिन्यांपासून शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले, तर २७ जानेवारीपासून  इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे पालघर जिल्ह्यातही सदर वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाची अद्याप  भीती कायम असल्याने व दक्षता म्हणून एरव्ही चॉकलेट, खाऊ बॅगेत ठेवणारे विद्यार्थी आता बॅगेत सॅनिटायझरही आवर्जून  ठेवत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. मात्र, तब्बल  नऊ महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची घटणारी संख्या व  कोरोनावर लस सापडली असून आता लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे  ग्रामीण भागात ८० ते ९० टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार झाले आहेत. जिल्ह्यातील शहरी भागांतील शाळाही सुरू झाल्या असून तिथेही ६० ते ७० टक्के पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दर्शवली आहे. यामध्ये  बोर्ड परीक्षा विचारात घेऊन १० वीची विद्यार्थीसंख्या शाळांना जास्त उपस्थिती दिसते.शासनाच्या आदेशानुसार आता  तीन ते चार तास शाळा भरवली जाते आणि सलग मध्ये कोणतीही सुट्टी नसते. त्यामुळे विद्यार्थी घरूनच जेवून येतात. विद्यार्थ्यांनी स्वतःची पाणीबॉटल  आणावी. शाळा परिसरात  कोणत्याही इतर बाहेरच्या व्यक्तीला परवानगी नाही, अशा सूचना आहेत. दरम्यान, गेल्या १० महिन्यांपासून कोरोनामुळे पालक मुलांना बाहेरील वस्तू खाण्यास देत नाहीत. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्या, तरी मुले कोरोनाच्या भीतीने बाहेरील वस्तू सहसा खात नाहीत. बऱ्याच महिन्यांपासून बाहेरील वस्तू मिळत नसल्याने मुलांनाही त्याची जाणीव होऊ लागली आहे. पालकही या बाबतीत मुलांना सूचना देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एरव्ही चॉकलेट व इतर खाऊ बॅगेत आणणारे विद्यार्थी आता आणत नाहीत. मात्र, कोरोना खबरदारी उपाय म्हणून सॅनिटायझर बॅगेतून आणत आहेत. प्रवासात व शाळेत कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही सॅनिटायझर वापरतो. - राज वाघ, इयत्ता ६ वी.शाळेत आल्यावर काही वस्तूंना स्पर्श होतो. त्यामुळे कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून बॅगेत सॅनिटायझर ठेवतो.- प्रणय चौरे, इयत्ता १० वी शाळा सुरू झाली आहे, तरी अजूनही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे आमच्याजवळ सॅनिटायझर ठेवतो.- श्रेयस ठाकूर, इयत्ता ६ वी आपले हात स्वच्छ राहावे.  त्यामुळे कोरोना खबरदारी म्हणून आम्ही बॅगेत सॅनिटायझर घेऊन येतो.- मनस्वी पाटील, इयत्ता १० वी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या