शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

रेतीमाफियांची टेहळणी, अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पगारी नोकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 03:28 IST

जिल्ह्यातील रेती माफियांच्या नाड्या आखडून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अनेक उपाय आखल्या असल्या तरी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी रेतीमाफीयानी नाक्यांनाक्यावर तरुणांची एक टीम कार्यरत ठेवली आहे.

पालघर - जिल्ह्यातील रेती माफियांच्या नाड्या आखडून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अनेक उपाय आखल्या असल्या तरी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी रेतीमाफीयानी नाक्यांनाक्यावर तरु णांची एक टीम कार्यरत ठेवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रत्येक अधिकाºयांच्या हालचाली वर लक्ष ठेवले जात असल्याचे पुरावे पत्रकार हेमेंद्र पाटील यांनी सोशल मीडियासह सर्व महत्वपूर्ण अधिकाºयांना पाठविले असून कारवाईचे आव्हानच पोलीस महासंचालकाना दिले आहे.पालघर जिल्हा निर्मिती नंतर मोठ्या प्रमाणात सर्वत्र रहिवास संकुलाच्या उभारणीचे काम जोरात सुरू झाले आहे.मात्र या बांधकामांना लागणाºया रेतीवर बंदी असल्याने रेतीचा तुटवडा सर्वत्र भासत आहे. ७ ते ८ हजार रु पये ट्रक मिळणाºया रेतील आज १२ ते १५ हजाराचा भाव आकारला जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार रेती उत्खननाला बंदी असल्याने सर्वत्र रेती वाहतुकीलाही बंदी आहे. चोरट्या रेती वाहतुकीला आळा बसविण्यासाठी सुमारे ९९ हजाराचा दंड एका ट्रक मागे महसूल विभागाकडून वसूल केला जातो. मात्र, तरीही रेतीला मोठी मागणी असल्याने चोरट्या पद्धतीने रेतीची वाहतूक सुरूच आहे.सुर्या-वैतरणा नद्यांमध्ये उच्चप्रतिची रेती असल्याने तीरावर वसलेल्या काही गावाना माठ्या प्रमाणात रेतीचा व्यवसायातून उत्पन्नाचे साधन मिळाले असले तरी अधिक पैश्याच्या हव्यासापोटी मागील काही वर्षात सक्शन पंपाद्वारे नदीतून काढलेल्या रेती साठ्यामुळे नदी किनाºयावरील शेती-बागायती नदीपात्रात धडाधड कोसळू लागल्या आहेत. पालघर, बोईसर, मुरबे,मासवन, सफाळे, चहाडे, तांदुळवाडी, नावझे, बहाडोली, नारिंगी, वैतरणा आदी अनेक रेती बंदरातून मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असल्याने सर्व रेती बंदरात सीसीटीव्ही कॅमेरे सह पोलीस, शासकीय अधिकारी- कर्मचाºयांच्या टीम, आरटीओ पथके तैनात करण्यात आल्या आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी रेती माफियांना चांगलाच वचक बसविला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात हा वाचक हळूहळू सैल होताना दिसत आहेत. रेती चोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाºयांवर हल्ले होत असून त्यांच्यावर दगडफेक करण्या इतपत धाडस रेतीचोरा मध्ये निर्माण झाले आहे.रेती माफीया व गौणखनीज वाहतूक करणाºयांंनी महसूल व आरटीओ विभागावर पाळत ठेवण्यासाठी व्हाँटसपवर ग्रुप बनवून त्यावरून संबंध अधिकारी यांच्या मार्गावर पगारी तरु णांची नियुक्ती केली आहे.महसूल अधिकारी यांच्या घरापासून ते त्यांच्या वैयिक्तक गोष्टीवर देखील हे माफिया पाळत ठेवत आहेत. यात धक्कादायक माहिती म्हणून जिल्हाधिकारी यांची गाडी पालघर कार्यालयातून पास झाल्यानंतर त्यांच्या गाडीवर पाळत ठेवण्यात येऊन आरटीओ वसई येथुन आलेल्या अधिकारी यांच्या वर देखील पाळत ठेवण्यात येत आहे. सदर अधिकारी यांची वाहने पास झाल्यावर व्हाँटसप ग्रुप मधुन अँडिओ मार्फत पाठवलेली माहिती पुराव्यासह पत्रकार पाटील ह्यांनी अनेक सोशल मीडिया ग्रुपवर पाठवली आहे.त्यातील संभाषण खात्रीलायक सुत्रा कडुन(नाव नंबरसह) त्यांनी पोलीस महासंचालकाना पाठवली आहेत. ही माहिती सर्वत्र पसरल्यानंतर अनेक ग्रुप बंद झाले असून अनेक रेतीमाफीया उद्योजक या ग्रुपमधुन बाहेर पडले आहेत. जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व पालघर, बोईसर, तारापुर, मनोर, विरार, वसई या पोलिस स्टेशन च्या सर्व अधिकारी यांचे गेल्या दोन वर्षांपूर्वी पासुन आता पर्यंतचे फोन डिटेल्स ची चौकशी आपण सीआयडी मार्फत केली तर रेतीमाफीया यांचे पालघर पोलिसां सोबतचे लागेबांधे उघड होतील असा विश्वास तक्र ारकर्ते पाटील यांनी व्यक्त केला आहे.९९ हजाराच्या दंडाला सुद्धा माफीया जुमानेनाचोरट्या रेती वाहतुकीला आळा बसविण्यासाठी सुमारे ९९ हजाराचा दंड असला तरी महिनाकाठी २५ ते ३० लाख रु पयांचा हप्ता पुरविण्यात येत असल्याची चर्चा असून हा पैसा कोणाच्या खिशात जातो याचे वाटेकरी कोण आहेत. याचा शोध घेणे गरजेचे आहे.जिल्हा खनिकर्म अधिकारी घुले यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्या नंतर ही प्रशासनाला जाग आली नसल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे रेती चोरी विरोधात काम करणाºयाचे खच्चीकरण होत असल्याची भावना कर्मचाºयांमध्ये निर्माण होतात दिसत आहे.अशी रोखा रेतीतस्करीमुरबे खाडीतून मोठ्या प्रमाणात आजही रेती उत्खनन होत असून पालघर मधील चार रस्त्यावरील पोलीस चौकीच्या मागे असणारा अड्डा पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी बंद करून तेथील सीसीटीव्ही ची कार्यक्षमता वाढविल्यास रेतीची चोरटी वाहतूक आणि खाजगी लोकांकडून होणारी वसुली रोखता येईल.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या