शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
2
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
4
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
5
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
6
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
7
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
8
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
9
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
10
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
11
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
12
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
13
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
14
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
15
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
16
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
17
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
18
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
19
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
20
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?

प्रवासी वाहतुकीचे नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 23:43 IST

वसईमध्ये रिक्षात प्रवाशांची कोंबाकोंब : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष ; कोरोनावाढीला निमंत्रण

मंगेश कराळेनालासोपारा : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यातच नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक केली जात असल्याने चिंता व्यक्त होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून टीका केली जात आहे. वसईत सार्वजनिक प्रवासी सेवा हळूहळू रुळावर येत असली तरी ती अद्याप अपुरी आहे. त्यामुळे वसईकर मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. मात्र दाटीवाटीने होणाऱ्या प्रवासामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका आहे. प्रवासी साधन असलेल्या तीनचाकी रिक्षा, टाटा मॅजिकमधूनही धोकादायक वाहतूक सध्या वसईत सुरू असून त्यावर वाहतूक विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने वसईत कोरोनावाढीला आमंत्रण देण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे. रिक्षामध्ये केवळ दोन प्रवाशांना परवानगी असताना रिक्षाचालकांकडून नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची कोंबाकोंब करण्यात येते.

वसईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा २७ हजारांच्या पार पोहोचला आहे. येथे या आजारामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही ८५३ पर्यंत पोहोचला आहे. कोविड चाचणी केलेल्या नागरिकांची व देखरेखीखाली ठेवलेल्या नागरिकांची संख्या मोठी असतानादेखील वसई-विरारमध्ये सर्रास प्रवासी वाहनांतून सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे व आदेशांचे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने कसोशीने पालन केले पाहिजे. प्रवासी वाहतुकीचा तर अक्षरश: बोजवारा उडाला असून दाटीवाटीने प्रवासी नेण्याचे काम रिक्षाचालक करत आहेत. तीनचाकी रिक्षात केवळ दोनच प्रवाशांना नेण्याची मुभा रिक्षाचालकांना आहे, तर प्रवासी टाटा मॅजिकमध्येही नियमांचे बंधन आहे. परंतु रिक्षाचालक कमाईसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडत असल्याचे दिसते.सध्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक साधने अपुरी असल्याने नागरिकांना कामावर जाण्यासाठी किंवा इच्छित स्थळी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अशा वेळी खासगी रिक्षाचालक रिक्षा पूर्ण भरल्याशिवाय निघत नाहीत. रिक्षाचालकांच्या बेपर्वा वागणुकीमुळे कोरोना संसर्गाचा धोका अजून वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

वसई तालुक्यात सर्रास रिक्षाचालक नियम धाब्यावर बसवून दाटीवाटीने प्रवाशांची वाहतूक करताना दिसत आहेत. देशात आणि राज्यात सध्या समूह संसर्गाचा धोका मोठा असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. अशा प्रसंगी अधिक सावधानता बाळगणे गरजेचे असताना खासगी रिक्षाचालक मात्र कोरोनालाच धाब्यावर बसवून आर्थिक कमाईच्या कामात व्यस्त झाले आहेत. या अवैध कारभारावर वाहतूक विभागाने तत्काळ कारवाईसाठी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगणार. नंतर या बाबीकडे जातीने लक्ष घालून लवकरच या रिक्षांवर आणि चालकांवर कारवाई करणार आहे.- विनोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग, वसई

टॅग्स :vasai-acवसईSchoolशाळा