शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वसई-विरार पालिका हद्दीतील रस्ते खड्ड्यांत; प्रशासन घेणार नागरिकांचा बळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 00:29 IST

प्रशासन ढिम्म : जीवितहानीची भीती

विरार : यंदाच्या लॉकडाऊन काळात नागरिक जितके कोरोना आपत्तीमुळे कंटाळलेले आहेत, त्याहून जास्त आता ते वसईतील मुख्य रस्त्यांत पडलेल्या खड्ड्यांना वैतागले आहेत. वाहने चालवणाऱ्या चालकांना तर वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाच्या अतिप्रमाणामुळे वसई शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

अनेक रस्त्यांत मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांना नुकसान होऊ लागले आहे. वाहनातून प्रवास करणाºया नागरिकांनाही रस्त्यांतील खड्ड्यांमुळे वेदनादायी प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येते. रस्त्यांची अवस्था पाहता वसईतील मुख्य रस्तेच खड्ड्यात गेल्याचे दिसून येते.

लॉकडाऊन काळात उपासमारीच्या कळा सोसणाºया नागरिकांनी आता महापालिका प्रशासनाला रस्त्यांतील खड्ड्यांवरून टीकेचे धनी केले आहे. पालिका हद्दीत फोफावत असलेल्या कोरोना प्रादुर्भावावर महापालिकेला नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे तर आता नागरिकांना रस्त्यांतील खड्ड्यांची डोकेदुखी भेडसावू लागली आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता वसईतील जे रस्ते खड्डेमय झाले आहेत ते तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.श्री गणरायांच्या आगमनानिमित्त वसईतील खड्डे बुजवण्याचे साधे कष्ट महापालिका प्रशासनाकडून घेतले गेले नाहीत. रस्त्यात पडलेले खड्डे इतके खोलगट झालेत की रात्रीच्या वेळी किंवा दिवसादेखील दुचाकी वाहनचालक त्यात आपटून गंभीररीत्या जखमी होण्याचा धोका संभवतो. वसई पूर्वेतील एव्हरशाईन गेट व पुढे नवजीवन परिसरात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात नागरिकांनी लाकडाच्या पाट्या लावून वाहनचालकांना अपघात होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे.

पालिका प्रशासनाला मात्र अद्याप जाग आली नसल्याने वाहनचालक आणि नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गणरायांचे आगम खड्डेमय रस्त्यांत झाल्यानंतर आता रोजच्या वाहतुकीवर खड्ड्यांचे विघ्न उभे ठाकले आहे. मध्यंतरी महापालिका प्रशासनाने रस्त्यांतील खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु खड्ड्यांत बारीक रिटपावडर, बारीक खडी, दगड भरून लेप देण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांत भरलेली बारीक खडी रस्त्यावर इतस्तत: विखुरली आहे. विखुरलेल्या बारीक खडीमुळे दुचाकीचालक घसरून पडण्याची शक्यता आहे. अपघाताचा धोका असताना महापालिका प्रशासनाने हातावर हात ठेवून स्वस्थ बसू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.वसई पूर्वेतील एव्हरशाइन सिटी, रेंजनाका, चिंचपाडा, गोलानी, वालीव, नवजीवन, वसईफाटा या परिसरात मुख्य रस्त्यांत मोठमोठे हातभर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत रोज वाहने आदळतात. दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा सर्वाधिक धोका आहे. खड्ड्यात आपटून दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्यास मोठा अपघात होऊ शकतो. यात वाहनचालक गंभीररीत्या जखमी होऊ शकतो.

 

टॅग्स :Potholeखड्डे