शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

रस्ता रुंदीकरणाने वाढला जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:07 IST

नागरिकांना फायदा शून्य : भार्इंदर पूर्वेला अतिक्रमणाचा विळखा, प्रदूषणात झाली वाढ

भाईंदर : महापालिकेने भार्इंदर पूर्वेला रेल्वेस्थानकासमोर मोठा गाजावाजा करत केलेल्या रस्ता रुंदीकरणाचा नागरिकांना फायदा तर झाला नाहीच, उलट जाच वाढला आहे. बेकायदा लागणाऱ्या रिक्षा व हातगाड्या तसेच पार्किंगमुळे वाहतूककोंडी, ध्वनी, वायुप्रदूषण वाढले आहे.

भार्इंदर पूर्वेत रेल्वेस्थानकासमोरील समांतर रस्ता अरुंद असून जुन्या इमारतींमुळे संपूर्ण रुंदीकरण रखडले आहे. तर, बंदरवाडीनाका व प्रशांत हॉटेलजवळील नाका तेथील बांधकामे तोडून पालिकेने रुंद केली होती. या रुंदीकरणाला विरोध झाला, तसेच राजकीय श्रेय लाटण्याचा खटाटोपही झाला. परंतु, रस्त्याच्या दोन्ही टोकाला झालेल्या रुंदीकरणामुळे समस्या सुटली नाही. उलट, जाच वाढला आहे.या ठिकाणी फेरीवाल्यांच्या हातगाड्या तसेच टपºया वाढल्या असून भररस्ता व पदपथावर अतिक्रमण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असताना सर्रास न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत. फेरीवाल्यांच्या हातगाड्या व टपऱ्यांपेक्षा जास्त मुजोरी रिक्षाचालकांची सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त रिक्षा या भागात उभ्या केल्या जातात. त्यातच रिक्षातळ सोडून भररस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जातात. भाडे घेण्यासाठी बेकायदा उभ्या राहणाºया रिक्षाचालकांवर कारवाई अजिबात केली जात नाही. बसस्थानकावरही रिक्षाचालकांचा विळखा असल्याने प्रवाशांना रस्त्यात थांबावे लागते. दुचाकी आणि खाजगी वाहनांचे बेकायदा पार्किंग या त्रासात आणखी भर टाकते.फेरीवाल्यांच्या हातगाड्या, टपºया, खाजगी बेकायदा पार्किंग आणि रिक्षाचालकांच्या मस्तवालपणामुळे भार्इंदर पूर्वेला रेल्वेस्थानक समांतर मार्ग व नाके प्रचंड वाहतूककोंडीने ग्रासले आहेत. वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण प्रचंड वाढले आहे. धूर व धुळीमुळे वायुप्रदूषण वाढले आहे.नागरिकांना तर पदपथ व रस्त्यावरून चालणेही जिकिरीचे झाले आहे. रस्ता ओलांडतानाही कोंडीमधून मार्ग काढणे जाचक ठरत आहे. यातून किरकोळ अपघात व गाडी लागल्याने भांडणेही नेहमीचीच झाली आहेत. प्रशांत हॉटेलनाका परिसर जॅम झाला की, रेल्वेस्थानक समांतर मार्गासह बाळाराम पाटील मार्ग व महात्मा फुले मार्गावर रांगा लागतात. सकाळपासून रात्रीपर्यंत कोंडी, रिक्षा-हातगाड्यांच्या अतिक्रमणाची स्थिती कायम असते.यंत्रणा देतीलका लक्ष?च्या जटिल समस्येकडे स्थानिक नगरसेवकांसह महापालिका, वाहतूक शाखा व नवघर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.च्सोयीच्या गोष्टींसाठी धावणाºया या यंत्रणा भार्इंदर पूर्वेच्या रेल्वेस्थानकासमोरील या गंभीर बनलेल्या समस्येवर सातत्याने ठोस कारवाई व उपाययोजना करण्यास मात्र उदासीन असल्याने नागरिकांना या जाचातून सुटका मिळणे अवघड झाले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार