शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जव्हारमधील आदिवासी भागातील रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 23:58 IST

ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष; विकासासाठी येणारा निधी जातो तरी कुठे?

जव्हार : राज्यात युतीचे सरकार जाऊन आता महाविकास आघाडीचेसरकार आलेले आहे. सरकारे दर पाच वर्षांनी बदलतात, मात्र राज्याची राजधानी मुंबईपासून अवघ्या दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या जव्हार या आदिवासी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आजही जशीच्या तशी कायम आहे. त्यामुळे आदिवासी भागातील रस्त्यांच्या विकासासाठी येणारा निधी जातो तरी कुठे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.जव्हार भागातील गाव-पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी लाखो रुपयांचा निधी मिळूनही रस्त्यांची दुर्दशा आजही कायम आहे. कुठल्याही सरकारकडून ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे होत नसल्याचा आरोप ग्रामीण भागातील नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सरकार कुठलेही असुद्या आमच्या रस्त्यांची कामे होत नाही, अशीच समज ग्रामीण जनतेने करून घेतलेली आहे.जव्हार तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, १०९ महसूल गावे आणि २४५ पाडे आहेत. मात्र या तालुक्याला जोडणाºया रस्त्यांची कामे व्यवस्थितरीत्या होत नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. शासनाकडून ग्रामीण भागासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळत असतो. मात्र तालुक्यातील गावांना जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यांची परिस्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे कुठलेही सरकार असो, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. जव्हार ते मोखाडा नाशिक रस्ता, जव्हार ते वाडा विक्रमगड रस्ता हे तालुक्यातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. तसेच ग्रामीण आदिवासी भागातील देहेरे-मेढा रस्ता, केळीचापाडा साकूर झाप रस्ता, जामसर विनवळ रस्ता हे ग्रामीण भागातील महत्त्वाच्या खेड्यापाड्यांना जोडणारे रस्ते आहेत. मात्र आजही जव्हार तालुक्यातील संपूर्ण रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.बुजवलेले खड्डे वर्षभरातच उखडलेतालुक्यात काही ठिकाणी डांबरीकरण तसेच खड्डे बुजविण्याची कामे झालेली आहेत. परंतु डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते आणि बुजविण्यात आलेले खड्डे वर्षभरातच उखडून निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे वाहनचालक व नागरिक वैतागले आहेत. उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. जव्हार तालुक्यात साकूर, नांदगाव, साखरशेत, जामसर अशा चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णांचा भार अधिक असून यामध्ये गरोदर मातांना जव्हार ग्रामीण रुग्णालयात पोहचवत असताना खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक गरोदर मातांना कुटीर रुग्णालयात पोहचवताना प्रसूती झाल्याचे प्रकार घडले आहेत. वाहन चालक वैतागले असून, मोटारसायकल चालकांना अपघात झालेले आहेत.