शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

आवाहनानंतरही लोकांचा चाचणी करण्यास नकार; कोरोनाबाधितांची संख्या वाढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 00:31 IST

आरोग्य यंत्रणेवर दबाव

हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात कोविड-१९ ने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून जर मृत्यूदर कमी करायचा असेल तर संशियत रुग्णांनी लवकर चाचणी करून इस्पितळात दाखल व्हावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असले तरी आपली चाचणी करण्यास लोक नकार देत असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा दबाव वाढत चालला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २३,१२८ इतकी वाढली असून ४७१ रुणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लक्षणे अंगात असतानाही योग्य उपचार न घेता आजार बळावल्यानंतर उपचारासाठी धावाधाव करणाºया अनेक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांचे बहुतांश मृत्यू याच कारणामुळे झाल्याचे आरोग्य यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. मृत्यू झालेले अनेक रु ग्ण हे कोरोनासदृश आजाराने बाधित झाल्याचे माहिती पुढे येत असताना त्यांच्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारादरम्यान अनेक नातेवाईक त्या मृतदेहाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात येत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेकदा कुटुंबियांकडूनच माहिती लपवली जात आहे.

पालघर जिल्ह्यात वसई-विरार महापालिकेत ८ मे रोजी १८९ बाधित रुग्ण आणि ८ मृत्यू असा आकडा होता. ग्रामीण भागात २७ बाधित आणि २ मृत्यू नोंद होते.एका महिन्यानंतर ९ जून रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३०१ तर मृत्यू ४१ होते. वसई-विरार महानगरपालिकेत ६ पटीने रुग्णसंख्या वाढून बाधित रु ग्ण ११०८ तर ३८ मृत्यू झाले. तर ग्रामीणमध्ये ८२ बाधित आणि ३ मृत्यू इतकी संख्या होती. ८ जुलै रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या आठ पटीने वाढून ८ हजार १४१ तर मृत्यू १४९ झाले. वसई-विरार महापालिकेत बाधित रुग्ण ६५९९, मृत्यू १३० तर ग्रामीणमध्ये बाधित १७५ आणि मृत्यू १९ अशी संख्या होती. ८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या दुप्पटीने वाढून १७ हजार २०० तर मृत्यू ३३९ इतकी झाली होती. महानगरपालिकेत रुग्ण संख्या १६ हजार ०७७ आणि मृत्यू ३४२ तर ग्रामीणमध्ये बाधित ७,०५१ आणि १२९ मृत्यू अशी संख्या वाढली आहे. वसई-विरार महापालिकेने कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यात बºयापैकी यश मिळविल्याचे दिसून आले. आरोग्य यंत्रणेला सक्षम करताना आरोग्य सेवेतील सुमारे १ हजार रिक्त पदे भरताना डॉक्टर, नर्स आदी महत्त्वपूर्ण पदे भरण्याचे काम केले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ हजार १२८ इतकी झालेली आहे. ग्रामीण भागातील ७ तालुक्यातून पालघर तालुका सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला असून ३ हजार ८३३ रु ग्ण बाधित असून ६७ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. त्यानंतर डहाणू तालुक्यात ९९९ बाधित रु ग्ण तर २१ बाधित रु ग्णांचे मृत्यू झाले आहेत. सर्वाधिक कमी संख्या मोखाडा तालुक्यात १०५ बाधित आहेत, तर मृत्यू एकही नाही. लॉकडाऊन उठविल्यानंतर बोईसर, पालघरमधील कारखाने पुन्हा सुरू झाल्याने बाधितांची संख्या वाढली आहे. लोकसंख्येच्या मानाने ग्रामपंचायत क्षेत्रात आरोग्य यंत्रणा आणि सुखसोयीची कमतरता असल्याने बोईसरमध्ये बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.लक्षणे दिसूनही लपवली जाते माहिती : पोलीस बळाचा वापर होणारमार्च-एप्रिलमध्ये कोरोनाबाबत जनतेला समजावून सांगितल्यावर आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांना सहकार्य करीत कोरोना तपासणी आणि विलगीकरणासाठी लोक पुढे येत होते. मात्र सोशल मीडियावरील चुकीच्या मेसेज बरोबरच विलगीकरण कक्षात मिळणारे निकृष्ट जेवण आणि व्यवस्था आदी कारणांमुळे अनेक रुग्ण कोरोनाची लक्षणे दिसूनही ते माहिती दडवून ठेवत आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबधितांची संख्या वाढू लागली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेले कुटुंबीय, इतर व्यक्तींची नावे पोलिसांना कळविली जाणार आहेत. लोक आपली चाचणी करून घेण्यास नकार देत आरोग्य कर्मचाºयांना हाकलून देत आहेत. अशा परिस्थितीत आपण काम कसे करायचे? असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत.जिल्ह्यातील रिक्त पदेजिल्ह्यात एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ३१२ उपकेंद्रे आहेत. दररोज साधारणपणे आरोग्य केंद्रात ५० हजार रु ग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी नोंद करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत एकूण १७१२ मंजूर पदापैकी १२१५ पदे भरण्यात आली असून ४९७ पदे रिक्त आहेत. पैकी सहायक जिल्हा अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी आदी पदांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार