शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

बुलेट ट्रेनविरोधात पुन्हा उद्रेक; सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 07:12 IST

पाचव्यांदा जावे लागले माघारी

हितेन नाईकपालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनविरोधातील स्थानिकांचा उद्रेक अद्यापही शमला नसून नंडोरे ते कल्लाळे येथे पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करू न देताच स्थानिक आणि आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पिटाळून लावले. दरम्यान, जमीन सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांना पाचव्यांदा रिकाम्या हाताने माघारी जाण्याची नामुष्की ओढवल्याचे सांगण्यात आले.

विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर जबरदस्तीने केला जात असल्याने आदिवासी बेदखल होत आहे. त्यामुळे सरकारने आदिवासी समाजाला सुरक्षितता प्रदान करावी, त्यांना घटनेच्या पाचव्या अनुसूचीने, त्यांच्या ग्रामसभांना अधिकार देऊन आदिवासीने संरक्षण दिले आहे. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने जिथे जिथे आदिवासी समाज राहतो, तिथे त्यांच्यावर सरकार आणि उद्योगपतीकडून अन्याय केला जात असल्याची खंत छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके यांनी नुकत्याच पालघर येथे झालेल्या आदिवासी एकता महासंमेलनात व्यक्त केली होती. राज्यपाल हे आदिवासी समाजाचे संरक्षक असून संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकारान्वये त्यांना न्याय देण्याचे काम राज्यपालांचे असल्याचे मतही राज्यपाल उईके यांनी व्यक्त केले होते.

जिल्ह्यातील वसईपासून ते बोईसरदरम्यानच्या पूर्व पट्टीतील जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अधिग्रहण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यातील १८७ हेक्टर जमीन संपादनापैकी अवघ्या १० हेक्टर जमिनीचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले आहे. तर ७१ गावांपैकी ६ गावांचे सर्वेक्षण करणे आजही बाकी असल्याचे उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांनी सांगितले. जमीन संपादन करताना कुणावरही जबरदस्ती केली जाणार नसून शासकीय दराप्रमाणे मूल्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र या भागातील बहुतांशी शेतकºयांनी आपल्या जमिनी या प्रकल्पाला देण्यास एकजुटीने विरोध दर्शवला आहे. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ग्रामसभांमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात ठराव घेऊन हे ठराव जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, राज्यपाल यांना देऊनही आजही आदिवासी व इतर समाजाच्या जमिनी जबरदस्तीने संपादन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या तक्र ारी एकता परिषदेने दिलेल्या आहेत.

बुलेट ट्रेनसाठी लागणारी जमीन संपादन करण्यासाठी संबंधित गावात ग्रामसभा लावायची तर दुसरीकडे बाधित शेतकºयांना कुठलीही पूर्वकल्पना न देता जनसुनावणी आयोजित करायची, ही शासनाने प्रशासनाला हाती धरून चालविलेली खेळी ही आदिवासी एकता परिषद व स्थानिक शेतकºयांनी एकत्र येत उधळून लावल्याचे प्रकार घडले आहेत. तर वैद्यकीय सेवा पुरवणे, बालवाडी उभारणी आदी नानाविध सुविधा पुरविण्याच्या नावाखाली अनेक आमिषे पुरविली जाण्याचा प्रकारही एकता परिषदेने रोखून धरला आहे.प्रकल्प नकोचनंडोरे-पडघा-कल्लाळे या भागात बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणासाठी काही अधिकारी फौजफाट्यासह शुक्रवारी आले होते. या वेळी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, शशी सोनवणे, नीता काटकर, भास्कर दळवी, मोरेश्वर दौडा, संतोष मानकर आदी कार्यकर्त्यांशी अधिकाºयांनी चर्चा केली. बुलेट ट्रेनला आमचा विरोध असून आमच्या जमिनी कुठल्याही परिस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाला देणार नसल्याचे स्पष्टपणे ठणकावून सांगितले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन