शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
3
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
4
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
5
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
6
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
7
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
8
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
9
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
10
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
11
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
12
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
13
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
14
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
15
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
16
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
17
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
18
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
19
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
20
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...

पालघरमधील खाड्यांचे रसायनामुळे पुन्हा प्रदूषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 00:39 IST

लॉकडाऊन शिथिल केल्याने पुन्हा प्रदूषित रसायनाचे प्रमाण वाढू लागल्याने पानेरी नदी आणि दांडी-नवापूरच्या खाड्यांतील मासे मरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हितेन नाईक पालघर : लॉकडाऊनमुळे कारखाने बंद असल्याने काही कारखान्यांतून समुद्र-खाड्यांमध्ये सोडले जाणारे प्रदूषित पाणी बंद होते. परंतु आता लॉकडाऊन शिथिल केल्याने पुन्हा प्रदूषित रसायनाचे प्रमाण वाढू लागल्याने पानेरी नदी आणि दांडी-नवापूरच्या खाड्यांतील मासे मरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.तारापूर औद्योगिक वसाहती-मधील कारखान्यांतून निर्माण होणारे प्रदूषित रासायनिक पाणी एमआयडीसीच्या मालकीच्या ज्या सीईटीपी प्रक्रिया केंद्रात जमा केले जायचे, त्याची क्षमता आजही कमी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त जमलेले प्रदूषित पाणी नि:संकोचपणे परिसरातल्या नदी, नाले, खाड्या आणि शेतात सोडले जात आहे. या वाढत्या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात याचिका दाखल केल्याने काही कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे.दुसरीकडे माहीमवासीयांनी पानेरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या लढ्यानंतर प्रांताधिकारी पातळीवरून अनेक बैठका पार पडल्यानंतरही पानेरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आजही सुटलेला नाही. २२ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊननंतर पालघरमधील कारखाने बंद ठेवण्यात आल्याने पानेरी नदी प्रदूषणमुक्त होत पुन्हा नदीला गतवैभव प्राप्त झाले होते.सामाजिक कार्यकर्ते नीलेश म्हात्रे, दीपक भंडारी, अभिनय मोरे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रारी करूनही कारवाईची पावले उचलली जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. १७ फेब्रुवारी रोजी आमदार श्रीनिवास वणगा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, पानेरी प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत पत्र दिल्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यानंतर पानेरी नदीमधील प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कुठलीही ठोस भूमिका घेण्यात न आल्याने काही कारखानदारांनी छुप्या मार्गाने आपले प्रदूषित पाणी पुन्हा पानेरीमध्ये सोडण्यास सुरुवात केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे पानेरीच्या पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा घटून मासे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.