शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पालघरमधील खाड्यांचे रसायनामुळे पुन्हा प्रदूषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 00:39 IST

लॉकडाऊन शिथिल केल्याने पुन्हा प्रदूषित रसायनाचे प्रमाण वाढू लागल्याने पानेरी नदी आणि दांडी-नवापूरच्या खाड्यांतील मासे मरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हितेन नाईक पालघर : लॉकडाऊनमुळे कारखाने बंद असल्याने काही कारखान्यांतून समुद्र-खाड्यांमध्ये सोडले जाणारे प्रदूषित पाणी बंद होते. परंतु आता लॉकडाऊन शिथिल केल्याने पुन्हा प्रदूषित रसायनाचे प्रमाण वाढू लागल्याने पानेरी नदी आणि दांडी-नवापूरच्या खाड्यांतील मासे मरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.तारापूर औद्योगिक वसाहती-मधील कारखान्यांतून निर्माण होणारे प्रदूषित रासायनिक पाणी एमआयडीसीच्या मालकीच्या ज्या सीईटीपी प्रक्रिया केंद्रात जमा केले जायचे, त्याची क्षमता आजही कमी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त जमलेले प्रदूषित पाणी नि:संकोचपणे परिसरातल्या नदी, नाले, खाड्या आणि शेतात सोडले जात आहे. या वाढत्या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात याचिका दाखल केल्याने काही कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे.दुसरीकडे माहीमवासीयांनी पानेरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या लढ्यानंतर प्रांताधिकारी पातळीवरून अनेक बैठका पार पडल्यानंतरही पानेरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आजही सुटलेला नाही. २२ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊननंतर पालघरमधील कारखाने बंद ठेवण्यात आल्याने पानेरी नदी प्रदूषणमुक्त होत पुन्हा नदीला गतवैभव प्राप्त झाले होते.सामाजिक कार्यकर्ते नीलेश म्हात्रे, दीपक भंडारी, अभिनय मोरे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रारी करूनही कारवाईची पावले उचलली जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. १७ फेब्रुवारी रोजी आमदार श्रीनिवास वणगा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, पानेरी प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत पत्र दिल्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यानंतर पानेरी नदीमधील प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कुठलीही ठोस भूमिका घेण्यात न आल्याने काही कारखानदारांनी छुप्या मार्गाने आपले प्रदूषित पाणी पुन्हा पानेरीमध्ये सोडण्यास सुरुवात केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे पानेरीच्या पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा घटून मासे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.