शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

कोकणात गणपतीसाठी जाण्याचे दर गगनाला भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 02:29 IST

रेल्वे, एस.टी. बंद : प्रतिव्यक्ती दोन-अडीच हजार रुपये, चाकरमानी त्रस्त

नालासोपारा : वसई-विरारमधील हजारोच्या संख्येने कोकणातील चाकरमानी राहतात. हे चाकरमानी आराध्य दैवत असलेल्या गणपती उत्सवासाठी कोकणात जातात, मात्र या वेळी कोरोनाचे मोठे संकट असल्याने लॉकडाऊनमुळे ट्रेन, एस.टी. बंद आहेत. या फायदा ट्रॅव्हल्सवाल्यांनी उठवला असून तिकिटाचे दर गगनाला भिडले आहेत. एका व्यक्तीकडून दोन ते अडीच हजार रुपये तिकिटांसाठी आकारले जात असल्यामुळे चाकरमानी त्रस्त झाले आहेत.

मुंबई आणि उपनगरांतील शहरांतून दरवर्षी लाखो प्रवासी गणपती उत्सवासाठी कोकणात जातात. पण, या वर्षी त्यांना गावी जाण्यासाठी तिप्पट भाडे मोजावे लागणार आहे. खाजगी बससेवा चालवणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी सणासुदीच्या काळात आपले दर अव्वाच्या सव्वा वाढविल्याने नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यांच्या भाडे आकारणीवर सध्या कुणाचेच नियंत्रण नसल्याने प्रवाशांची लूट सुरू आहे. ज्यांचे स्वत:चे वाहन असेल तर ई-पास काढण्याची अट राज्य सरकारने घातलेली आहे, तर ज्यांच्याकडे स्वत:ची वाहने नाहीत, त्यांना खाजगी ट्रॅव्हल्समधून गाव गाठून गणपती उत्सव साजरा करायचा आहे. या होणाºया गर्दीमुळे चाकरमान्यांचे हाल होत असून काहींना तिकीट सुद्धा मिळत नसल्याने गावाला जाण्यास मुकावे लागणार आहे. अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट गाड्या प्रवाशांची लूट करत आहे.गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या सणात मुंबई आणि उपनगरातील शहरातून रहिवासी उत्सवासाठी आपल्या गावी जातातच. पण सध्या कोरोना वातावणामुळे शासनाने लावलेल्या अटी-शर्तीने ही संख्या घटली असली तरी अजूनही काही लोक गावी जात आहेत. पण त्यांना गावी जाण्यासाठी तिप्पट भाडे मोजावे लागत आहे. आधीच कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडले असता केवळ प्रवासासाठी एका प्रवाशाला दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. आधी हेच भाडे केवळ पाचशे ते सातशे रु पये होते. पण आता दर ट्रॅव्हल्सवाल्यांनी दर वाढविल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ट्रॅव्हल्सवाले कोरोनामुळे लागू असलेल्या टाळेबंदीमुळे व्यवसायात मोठा तोटा झाल्याचे कारण सांगत भाडेवाढ केल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे कोकणात जाण्यासाठी रेल्वे आणि शासकीय बससेवा नसल्याने नागरिकांना खाजगी बससेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. इतकेच नाही तर येथून गावी गेल्यावर त्यांना १४ दिवस अलगीकरणात राहावे लागणार आहे. वाढलेले प्रवास दर सामान्यांना परवडत नसतानाही त्यांना नाइलाजाने पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे शासनाने शासकीय प्रवास सेवा गणपतीसाठी निदान सुरू करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

ई-पासेस आॅनलाइन मिळणार सांगितले जाते, पण ते अद्याप मिळत नाहीत. कागदपत्रांची पूर्तता करूनही वेटिंग म्हणून मेसेज येत आहे. अव्वाच्या सव्वा पैसे दिले की, हेच ई-पासेस एजंट लोकांना कसे काय मिळतात?- सचिन निवळकर, संतप्त प्रवासी

कोरोनामुळे तीन महिन्यांपासून कामावर नाही आणि गावी जाण्यासाठी ट्रेन किंवा बसेसची सुविधाही नाही. ई-पासेससाठीही हजारो रु पये मोजावे लागत आहे. त्यातच खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी दोन हजार ते अडीच हजार एकाचे तिकीट केले आहे. यामुळे हिरमोड झाला आहे.- प्रथमेश गोगरकर, संतप्त प्रवासी

शासनाने आम्हाला केवळ २१ प्रवासी घेऊन जाण्याची मुभा दिली आहे. त्यातही प्रवाशांचे परमिट, ई-पास, डिझेलचा खर्च, चालकाचा पगार या सर्व बाबींवरचा खर्च वाढला आहे. तर येताना बस रिकामी आणावी लागत असल्याने मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर नियमात कर भरावे लागणार आहेत.- बाजीराव दुखते, ट्रॅव्हल्स व्यावसायिक 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीrailwayरेल्वे