शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

राजस्थानच्या लग्नवारीने कोरोना रुग्णांमध्ये वाढ, आणखी २२ जण बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:29 IST

जयपूर येथे विमानाने  गेलेल्या १८० वऱ्हाडींपैकी प्रथम तीन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले होते.

पालघर : पालघर पूर्वेकडील बिल्डर कीर्ती बाफना यांच्या मुलाच्या लग्नासाठीराजस्थानमधील जयपूर येथे विमानाने  गेलेल्या वऱ्हाड्यांच्या बाधित संख्येत वाढ झाली आहे. या वऱ्हाड्यांपैकी  एकूण २२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.जयपूर येथे विमानाने  गेलेल्या १८० वऱ्हाडींपैकी प्रथम तीन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वर पित्याला सर्व वऱ्हाड्यांची कोरोना तपासणी करून घेण्याच्या आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता. पालघर तालुक्यातील डॉक्टर, वकील, बिल्डर, कारखानदार, मोठे व्यावसायिक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आदी १८० हून अधिक जण ८ व ९ मार्च रोजी जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला गेले होते. विवाह आटोपून हे सर्व जण  १० मार्च रोजी  पालघरला परतल्यानंतर त्यापैकी तीन जणांना कोरोना बाधा झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे उर्वरित सर्वांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यानुसार १३ मार्च रोजी ४७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ७ जणाना संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे, तर दि. १५ मार्च रोजी ५६ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये १२ जणांना लागण झाल्याचा अहवाल आला आहे. या लग्नकार्यात उपस्थित असलेल्यांपैकी एकूण २२ जण बाधित आढळले आहेत. 

कुटुंबीयांचीही चाचणी राजस्थानला लग्नासाठी गेलेल्या उर्वरित ७७ जणांची आणि पॉझिटिव्ह आलेल्यांच्या कुटुंबीयांची चाचणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान, बाधित आलेल्यांच्या नातलगांनी विवाह समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानmarriageलग्न