शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

राजस्थानच्या लग्नवारीने कोरोना रुग्णांमध्ये वाढ, आणखी २२ जण बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:29 IST

जयपूर येथे विमानाने  गेलेल्या १८० वऱ्हाडींपैकी प्रथम तीन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले होते.

पालघर : पालघर पूर्वेकडील बिल्डर कीर्ती बाफना यांच्या मुलाच्या लग्नासाठीराजस्थानमधील जयपूर येथे विमानाने  गेलेल्या वऱ्हाड्यांच्या बाधित संख्येत वाढ झाली आहे. या वऱ्हाड्यांपैकी  एकूण २२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.जयपूर येथे विमानाने  गेलेल्या १८० वऱ्हाडींपैकी प्रथम तीन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वर पित्याला सर्व वऱ्हाड्यांची कोरोना तपासणी करून घेण्याच्या आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता. पालघर तालुक्यातील डॉक्टर, वकील, बिल्डर, कारखानदार, मोठे व्यावसायिक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आदी १८० हून अधिक जण ८ व ९ मार्च रोजी जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला गेले होते. विवाह आटोपून हे सर्व जण  १० मार्च रोजी  पालघरला परतल्यानंतर त्यापैकी तीन जणांना कोरोना बाधा झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे उर्वरित सर्वांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यानुसार १३ मार्च रोजी ४७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ७ जणाना संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे, तर दि. १५ मार्च रोजी ५६ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये १२ जणांना लागण झाल्याचा अहवाल आला आहे. या लग्नकार्यात उपस्थित असलेल्यांपैकी एकूण २२ जण बाधित आढळले आहेत. 

कुटुंबीयांचीही चाचणी राजस्थानला लग्नासाठी गेलेल्या उर्वरित ७७ जणांची आणि पॉझिटिव्ह आलेल्यांच्या कुटुंबीयांची चाचणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान, बाधित आलेल्यांच्या नातलगांनी विवाह समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानmarriageलग्न