शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

बेवारसांच्या अंत्यविधीचा भुर्दंड रेल्वे पोलिसांना

By admin | Updated: September 25, 2016 03:55 IST

रेल्वे अपघातात मृत झालेल्या बेवारस व्यक्तींच्या अंतिमसंंस्कारासाठी वसई रेल्वे पोलीसांना दरवर्षी लाखोंचा भुर्दंड सोसावा लागतो आहे.

- संजू पवार, विरार

रेल्वे अपघातात मृत झालेल्या बेवारस व्यक्तींच्या अंतिमसंंस्कारासाठी वसई रेल्वे पोलीसांना दरवर्षी लाखोंचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. प्रत्येक बेवारस पार्थिवाच्या अंतिम संंस्कारासाठी रेल्वेकडून एक हजार रुपये दिले जातात. प्रत्यक्षात खर्च २ हजार २५० रुपये येत असल्याने पोलिसांनी स्वत:च्या खिशातून प्रत्येक वेळी १ हजार २५० रुपे खर्च करावे लागत आहे. याप्रकरणी पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारकडून वाढीव रक्कम दिली जात नसल्याने रेल्वे पोलिसांना हा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. रेल्वेत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. यातील अनेक मृत व्यक्तींच्या ओळख पटत नाही. त्यामुळे अशा बेवारस व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांकडे देण्यात आली आहे. रुग्णवाहिका आणि अंत्यविधीसाठीचा खर्च दरवर्षी वाढत असताना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ होत नसल्याने पोलिसांवर आर्थिक ताण पडत आहे. वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वैतरणा ते मीरा रोडपर्यंतीची रेल्वे स्टेशन्स येतात. रूळ ओलांडणे,गाडीतून पडणे,नैसर्गिक मृत्यू,चढत असताना पडणे, टपावरून प्रवास करताना शॉक लागणे,गर्दीच्या वेळी लटकून प्रवास करताना पोलला धडकून पडणे यासारख्या घटनांमध्ये प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर बळी जात आहेत. यात वसई,नालासोपारा,आणि विरार रेल्वे स्थानकात सर्वाधिक अपघात घडत आहेत. २०१५ मध्ये मीरा रोड ते वैतरणा या दरम्यान ३५ कि.मी.च्या अंतरादरम्यान मिरारोड-२०,भायंदर-४३,नायगाव-११,वसई-५५,नालासोपारा-५७,विरार-७३,वैतरणा-४ असे एकूण मिळून २६४ जणांचे प्राण गेले आहेत. यामधील १९१ मृतांची ओळख पटली आहे. तर ७३ मृतांची ओळख पटली नाही.जानेवारी ते जुलै २०१६ मध्ये मिरारोड-१४,भायंदर-२३,नायगाव-७,वसई-१४,नालासोपारा-२३,विरार-४७,वैतरणा-३ असे मिळून एकूण १३१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यातील ८७ मृतांची ओळख पटली आहे. तर ४४ मृतांची ओळखच्या पटली नाही. १९ महिन्यांच्या कालावधीत मृतांमध्ये ११७ बेवारस होते. त्यांच्या अंतिमसंस्कारासाठी पोलिसांना २ लाख ६३ हजार २५० रुपे खर्च करावे लागले. रेल्वेकडून फक्त १ लाख १७ हजार रुपे मदत दिली गेली. परिणामी पोलिसांना स्वत:च्या खिशातून तब्बल १ लाख ४६ हजार २५० रुपये खर्च करावे लागले आहेत. लोहमार्ग पोलीस ठाण्यांत आधीच मनुष्यबळ कमी आहे. कामाचा प्रचंड ताण ,अतिरिक्त कार्यभार असल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात वाढत्या अपघातामुळे बेवारस मृतांच्या अंतिमसंस्कारासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असल्याने पोलिसही त्रस्त झाले आहेत. बेवारस मृतांचे अंत्यविधी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद कमी आहे. त्यामुळे अंत्यविधी आणि रुग्णवाहिकेचा खर्च पोलिसांना करावा लागत आहे. या गंभीर विषयावर वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. - महेश बागवे, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, वसई.