शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बेवारसांच्या अंत्यविधीचा भुर्दंड रेल्वे पोलिसांना

By admin | Updated: September 25, 2016 03:55 IST

रेल्वे अपघातात मृत झालेल्या बेवारस व्यक्तींच्या अंतिमसंंस्कारासाठी वसई रेल्वे पोलीसांना दरवर्षी लाखोंचा भुर्दंड सोसावा लागतो आहे.

- संजू पवार, विरार

रेल्वे अपघातात मृत झालेल्या बेवारस व्यक्तींच्या अंतिमसंंस्कारासाठी वसई रेल्वे पोलीसांना दरवर्षी लाखोंचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. प्रत्येक बेवारस पार्थिवाच्या अंतिम संंस्कारासाठी रेल्वेकडून एक हजार रुपये दिले जातात. प्रत्यक्षात खर्च २ हजार २५० रुपये येत असल्याने पोलिसांनी स्वत:च्या खिशातून प्रत्येक वेळी १ हजार २५० रुपे खर्च करावे लागत आहे. याप्रकरणी पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारकडून वाढीव रक्कम दिली जात नसल्याने रेल्वे पोलिसांना हा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. रेल्वेत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. यातील अनेक मृत व्यक्तींच्या ओळख पटत नाही. त्यामुळे अशा बेवारस व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांकडे देण्यात आली आहे. रुग्णवाहिका आणि अंत्यविधीसाठीचा खर्च दरवर्षी वाढत असताना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ होत नसल्याने पोलिसांवर आर्थिक ताण पडत आहे. वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वैतरणा ते मीरा रोडपर्यंतीची रेल्वे स्टेशन्स येतात. रूळ ओलांडणे,गाडीतून पडणे,नैसर्गिक मृत्यू,चढत असताना पडणे, टपावरून प्रवास करताना शॉक लागणे,गर्दीच्या वेळी लटकून प्रवास करताना पोलला धडकून पडणे यासारख्या घटनांमध्ये प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर बळी जात आहेत. यात वसई,नालासोपारा,आणि विरार रेल्वे स्थानकात सर्वाधिक अपघात घडत आहेत. २०१५ मध्ये मीरा रोड ते वैतरणा या दरम्यान ३५ कि.मी.च्या अंतरादरम्यान मिरारोड-२०,भायंदर-४३,नायगाव-११,वसई-५५,नालासोपारा-५७,विरार-७३,वैतरणा-४ असे एकूण मिळून २६४ जणांचे प्राण गेले आहेत. यामधील १९१ मृतांची ओळख पटली आहे. तर ७३ मृतांची ओळख पटली नाही.जानेवारी ते जुलै २०१६ मध्ये मिरारोड-१४,भायंदर-२३,नायगाव-७,वसई-१४,नालासोपारा-२३,विरार-४७,वैतरणा-३ असे मिळून एकूण १३१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यातील ८७ मृतांची ओळख पटली आहे. तर ४४ मृतांची ओळखच्या पटली नाही. १९ महिन्यांच्या कालावधीत मृतांमध्ये ११७ बेवारस होते. त्यांच्या अंतिमसंस्कारासाठी पोलिसांना २ लाख ६३ हजार २५० रुपे खर्च करावे लागले. रेल्वेकडून फक्त १ लाख १७ हजार रुपे मदत दिली गेली. परिणामी पोलिसांना स्वत:च्या खिशातून तब्बल १ लाख ४६ हजार २५० रुपये खर्च करावे लागले आहेत. लोहमार्ग पोलीस ठाण्यांत आधीच मनुष्यबळ कमी आहे. कामाचा प्रचंड ताण ,अतिरिक्त कार्यभार असल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात वाढत्या अपघातामुळे बेवारस मृतांच्या अंतिमसंस्कारासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असल्याने पोलिसही त्रस्त झाले आहेत. बेवारस मृतांचे अंत्यविधी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद कमी आहे. त्यामुळे अंत्यविधी आणि रुग्णवाहिकेचा खर्च पोलिसांना करावा लागत आहे. या गंभीर विषयावर वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. - महेश बागवे, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, वसई.