शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

बेवारसांच्या अंत्यविधीचा भुर्दंड रेल्वे पोलिसांना

By admin | Updated: September 25, 2016 03:55 IST

रेल्वे अपघातात मृत झालेल्या बेवारस व्यक्तींच्या अंतिमसंंस्कारासाठी वसई रेल्वे पोलीसांना दरवर्षी लाखोंचा भुर्दंड सोसावा लागतो आहे.

- संजू पवार, विरार

रेल्वे अपघातात मृत झालेल्या बेवारस व्यक्तींच्या अंतिमसंंस्कारासाठी वसई रेल्वे पोलीसांना दरवर्षी लाखोंचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. प्रत्येक बेवारस पार्थिवाच्या अंतिम संंस्कारासाठी रेल्वेकडून एक हजार रुपये दिले जातात. प्रत्यक्षात खर्च २ हजार २५० रुपये येत असल्याने पोलिसांनी स्वत:च्या खिशातून प्रत्येक वेळी १ हजार २५० रुपे खर्च करावे लागत आहे. याप्रकरणी पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारकडून वाढीव रक्कम दिली जात नसल्याने रेल्वे पोलिसांना हा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. रेल्वेत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. यातील अनेक मृत व्यक्तींच्या ओळख पटत नाही. त्यामुळे अशा बेवारस व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांकडे देण्यात आली आहे. रुग्णवाहिका आणि अंत्यविधीसाठीचा खर्च दरवर्षी वाढत असताना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ होत नसल्याने पोलिसांवर आर्थिक ताण पडत आहे. वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वैतरणा ते मीरा रोडपर्यंतीची रेल्वे स्टेशन्स येतात. रूळ ओलांडणे,गाडीतून पडणे,नैसर्गिक मृत्यू,चढत असताना पडणे, टपावरून प्रवास करताना शॉक लागणे,गर्दीच्या वेळी लटकून प्रवास करताना पोलला धडकून पडणे यासारख्या घटनांमध्ये प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर बळी जात आहेत. यात वसई,नालासोपारा,आणि विरार रेल्वे स्थानकात सर्वाधिक अपघात घडत आहेत. २०१५ मध्ये मीरा रोड ते वैतरणा या दरम्यान ३५ कि.मी.च्या अंतरादरम्यान मिरारोड-२०,भायंदर-४३,नायगाव-११,वसई-५५,नालासोपारा-५७,विरार-७३,वैतरणा-४ असे एकूण मिळून २६४ जणांचे प्राण गेले आहेत. यामधील १९१ मृतांची ओळख पटली आहे. तर ७३ मृतांची ओळख पटली नाही.जानेवारी ते जुलै २०१६ मध्ये मिरारोड-१४,भायंदर-२३,नायगाव-७,वसई-१४,नालासोपारा-२३,विरार-४७,वैतरणा-३ असे मिळून एकूण १३१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यातील ८७ मृतांची ओळख पटली आहे. तर ४४ मृतांची ओळखच्या पटली नाही. १९ महिन्यांच्या कालावधीत मृतांमध्ये ११७ बेवारस होते. त्यांच्या अंतिमसंस्कारासाठी पोलिसांना २ लाख ६३ हजार २५० रुपे खर्च करावे लागले. रेल्वेकडून फक्त १ लाख १७ हजार रुपे मदत दिली गेली. परिणामी पोलिसांना स्वत:च्या खिशातून तब्बल १ लाख ४६ हजार २५० रुपये खर्च करावे लागले आहेत. लोहमार्ग पोलीस ठाण्यांत आधीच मनुष्यबळ कमी आहे. कामाचा प्रचंड ताण ,अतिरिक्त कार्यभार असल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात वाढत्या अपघातामुळे बेवारस मृतांच्या अंतिमसंस्कारासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असल्याने पोलिसही त्रस्त झाले आहेत. बेवारस मृतांचे अंत्यविधी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद कमी आहे. त्यामुळे अंत्यविधी आणि रुग्णवाहिकेचा खर्च पोलिसांना करावा लागत आहे. या गंभीर विषयावर वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. - महेश बागवे, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, वसई.