शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

बेवारसांच्या अंत्यविधीचा भुर्दंड रेल्वे पोलिसांना

By admin | Updated: September 25, 2016 03:55 IST

रेल्वे अपघातात मृत झालेल्या बेवारस व्यक्तींच्या अंतिमसंंस्कारासाठी वसई रेल्वे पोलीसांना दरवर्षी लाखोंचा भुर्दंड सोसावा लागतो आहे.

- संजू पवार, विरार

रेल्वे अपघातात मृत झालेल्या बेवारस व्यक्तींच्या अंतिमसंंस्कारासाठी वसई रेल्वे पोलीसांना दरवर्षी लाखोंचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. प्रत्येक बेवारस पार्थिवाच्या अंतिम संंस्कारासाठी रेल्वेकडून एक हजार रुपये दिले जातात. प्रत्यक्षात खर्च २ हजार २५० रुपये येत असल्याने पोलिसांनी स्वत:च्या खिशातून प्रत्येक वेळी १ हजार २५० रुपे खर्च करावे लागत आहे. याप्रकरणी पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारकडून वाढीव रक्कम दिली जात नसल्याने रेल्वे पोलिसांना हा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. रेल्वेत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. यातील अनेक मृत व्यक्तींच्या ओळख पटत नाही. त्यामुळे अशा बेवारस व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांकडे देण्यात आली आहे. रुग्णवाहिका आणि अंत्यविधीसाठीचा खर्च दरवर्षी वाढत असताना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ होत नसल्याने पोलिसांवर आर्थिक ताण पडत आहे. वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वैतरणा ते मीरा रोडपर्यंतीची रेल्वे स्टेशन्स येतात. रूळ ओलांडणे,गाडीतून पडणे,नैसर्गिक मृत्यू,चढत असताना पडणे, टपावरून प्रवास करताना शॉक लागणे,गर्दीच्या वेळी लटकून प्रवास करताना पोलला धडकून पडणे यासारख्या घटनांमध्ये प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर बळी जात आहेत. यात वसई,नालासोपारा,आणि विरार रेल्वे स्थानकात सर्वाधिक अपघात घडत आहेत. २०१५ मध्ये मीरा रोड ते वैतरणा या दरम्यान ३५ कि.मी.च्या अंतरादरम्यान मिरारोड-२०,भायंदर-४३,नायगाव-११,वसई-५५,नालासोपारा-५७,विरार-७३,वैतरणा-४ असे एकूण मिळून २६४ जणांचे प्राण गेले आहेत. यामधील १९१ मृतांची ओळख पटली आहे. तर ७३ मृतांची ओळख पटली नाही.जानेवारी ते जुलै २०१६ मध्ये मिरारोड-१४,भायंदर-२३,नायगाव-७,वसई-१४,नालासोपारा-२३,विरार-४७,वैतरणा-३ असे मिळून एकूण १३१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यातील ८७ मृतांची ओळख पटली आहे. तर ४४ मृतांची ओळखच्या पटली नाही. १९ महिन्यांच्या कालावधीत मृतांमध्ये ११७ बेवारस होते. त्यांच्या अंतिमसंस्कारासाठी पोलिसांना २ लाख ६३ हजार २५० रुपे खर्च करावे लागले. रेल्वेकडून फक्त १ लाख १७ हजार रुपे मदत दिली गेली. परिणामी पोलिसांना स्वत:च्या खिशातून तब्बल १ लाख ४६ हजार २५० रुपये खर्च करावे लागले आहेत. लोहमार्ग पोलीस ठाण्यांत आधीच मनुष्यबळ कमी आहे. कामाचा प्रचंड ताण ,अतिरिक्त कार्यभार असल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात वाढत्या अपघातामुळे बेवारस मृतांच्या अंतिमसंस्कारासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असल्याने पोलिसही त्रस्त झाले आहेत. बेवारस मृतांचे अंत्यविधी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद कमी आहे. त्यामुळे अंत्यविधी आणि रुग्णवाहिकेचा खर्च पोलिसांना करावा लागत आहे. या गंभीर विषयावर वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. - महेश बागवे, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, वसई.