शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

भर उन्हात शेतकऱ्यांच्या भात बियाण्यांसाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 01:22 IST

भर उन्हात तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. तर बियाणे न मिळाल्याने असंख्य शेतकरी रिकाम्या हाताने परतले.

वाडा : बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम पंचायत समिती कृषी विभागाकडून हाती घेण्यात आला होता. मंगळवारी संध्याकाळी होणाºया या वाटपासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच रांगा लावल्याचे दिसून येत होते. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी, कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि अपुºया कर्मचाºयांमुळे शेतकºयांना भर उन्हात तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. तर बियाणे न मिळाल्याने असंख्य शेतकरी रिकाम्या हाताने परतले.

तालुक्यातील शेतकºयांसाठी पंचायत समितीकडून भात बियाणे वाटप करणार असल्याचे पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून कळवण्यात आले होते. या भात बियाण्यांचे टोकन वाड्यातील जिल्हा परिषद शाळा-१ मध्ये दिले जात होते. तर भात बियाणांचे प्रत्यक्ष वाटप पंचायत समितीसमोरील शासकीय गोदामात करण्यात येत होते. हे भात बियाणे घेण्यासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

एकीकडे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकºयांना बांधावर बियाणे तसेच खते, औषधे पुरवावीत अशा सूचना प्रशासनाला केल्या. तरीही शेतकºयांना उन्हातान्हात रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र या वेळी दिसले.

पंचायत समितीकडून तालुक्यातील शेतकºयांसाठी ४२० क्विंटल भात बियाण्यांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात अवघे १९० क्विंटलच भातबियाणे प्राप्त झाल्याने तालुक्यातील केवळ ७०० शेतकºयांनाच हे भात बियाणे मिळाले. त्यामुळे उपस्थित उर्वरित हजारो शेतकºयांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार