शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

भर उन्हात शेतकऱ्यांच्या भात बियाण्यांसाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 01:22 IST

भर उन्हात तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. तर बियाणे न मिळाल्याने असंख्य शेतकरी रिकाम्या हाताने परतले.

वाडा : बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम पंचायत समिती कृषी विभागाकडून हाती घेण्यात आला होता. मंगळवारी संध्याकाळी होणाºया या वाटपासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच रांगा लावल्याचे दिसून येत होते. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी, कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि अपुºया कर्मचाºयांमुळे शेतकºयांना भर उन्हात तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. तर बियाणे न मिळाल्याने असंख्य शेतकरी रिकाम्या हाताने परतले.

तालुक्यातील शेतकºयांसाठी पंचायत समितीकडून भात बियाणे वाटप करणार असल्याचे पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून कळवण्यात आले होते. या भात बियाण्यांचे टोकन वाड्यातील जिल्हा परिषद शाळा-१ मध्ये दिले जात होते. तर भात बियाणांचे प्रत्यक्ष वाटप पंचायत समितीसमोरील शासकीय गोदामात करण्यात येत होते. हे भात बियाणे घेण्यासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

एकीकडे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकºयांना बांधावर बियाणे तसेच खते, औषधे पुरवावीत अशा सूचना प्रशासनाला केल्या. तरीही शेतकºयांना उन्हातान्हात रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र या वेळी दिसले.

पंचायत समितीकडून तालुक्यातील शेतकºयांसाठी ४२० क्विंटल भात बियाण्यांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात अवघे १९० क्विंटलच भातबियाणे प्राप्त झाल्याने तालुक्यातील केवळ ७०० शेतकºयांनाच हे भात बियाणे मिळाले. त्यामुळे उपस्थित उर्वरित हजारो शेतकºयांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार