शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

जनसुनावणी रद्द नाही, मात्र अन्य मुद्द्यांबाबत न्यायालय सकारात्मक, याचिका उशिरा दाखल केल्याचे कारण : अहवालाबाबत पुन्हा विचाराचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 1:28 PM

बंदरामुळे प्रभावित गावानजीक जनसुनावणी ठेवण्याऐवजी ही जनसुनावणी वाढवण बंदर पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल हा मूळ इंग्रजीत देण्याऐवजी स्थानिक मराठी भाषेत देणे बंधनकारक असताना गुगल रेकॉर्डिंगचा आधार घेत चुकीच्या पद्धतीने बनवून वाटप करण्यात आला.

- हितेन नाईक

पालघर : वाढवणपासून दूर ३० किमी अंतरावर ठेवलेली जनसुनावणी, स्थानिक भाषेत पुरविण्यात आलेला अहवाल व अनुषंगिक कागदपत्रे मराठीत योग्यरीत्या भाषांतर केली नसल्याचे कारण देत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दाखल केलेली याचिका उशिरा दाखल झाल्याने या याचिकेवर जनसुनावणी स्थगित करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे जनसुनावणी होणार असली मराठीतील अहवाल व अन्य बाबींवर पुन्हा विचार करण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत.

बंदरामुळे प्रभावित गावानजीक जनसुनावणी ठेवण्याऐवजी ही जनसुनावणी वाढवण बंदर पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल हा मूळ इंग्रजीत देण्याऐवजी स्थानिक मराठी भाषेत देणे बंधनकारक असताना गुगल रेकॉर्डिंगचा आधार घेत चुकीच्या पद्धतीने बनवून वाटप करण्यात आला. यामुळे शुक्रवारची जनसुनावणी रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका उशिराने आल्याचे कारण देत सुनावणी रद्द करता येणार नाही, असा निर्णय दिला. त्यामुळे वाढवण बंदरविरोधातील स्थानिकांच्या लढ्याबाबत एकत्र येऊन लढण्याच्या उणिवा यातून अधोरेखित झाल्या आहेत. यातून बोध घेत मच्छीमार संघटनांसह स्थानिकांना पुढची लढाई आता एकजुटीने लढण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाढवण बंदर पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल इंग्रजी भाषेत न देता तो मराठी भाषेतून देणे बंधनकारक असल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्यानंतर त्यांच्या आदेशाने २२ डिसेंबर रोजी होणारी जनसुनावणी उद्या १९ जानेवारी रोजी पालघरच्या क्रीडा संकुलाच्या मैदानात होत आहे. या अहवालात अनेक तांत्रिक चुका असल्याची बाब वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान, पालघर पोलिस अधीक्षक अंतर्गत १६ पोलिस ठाण्यांतील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अन्य जिल्ह्यातील पोलिस कुमक मागविली आहे. वसई-विरार, मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयातील बॅरिकेड्स, वज्र, वरुण यासारख्या गाड्याही मागविण्यात आल्या आहेत. 

मागणी मान्य न केल्यास पुन्हा दाखल होणार याचिका    अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, लोकप्रहार सेना, युवा संघर्ष समिती आणि समुद्र बचाव मंच या संघटनांनी उच्च न्यायालयात जनसुनावणी रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली होती.    या याचिकेसंदर्भात गुरुवारी दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर जनसुनावणीसाठी जेएनपीएने कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याने आणि याचिका उशिराने दाखल केल्याचे कारण देत शुक्रवारची जनसुनावणी रद्द करण्याबाबत न्यायालयाने असमर्थता दाखवली.    जनसुनावणीमध्ये याबाबत आक्षेप नोंदविल्यानंतर त्या आधारे एमपीसीबीकडे पुन्हा अर्ज करून नव्याने जनसुनावणी घेण्याबाबत मागणी करावी. त्यांनी मागणी मान्य न केल्यास पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करता येऊ शकेल, असे मत न्यायालयाने नोंदविल्याची माहिती याचिकाकर्ते आणि कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी ‘लोकमत’ला दिली. 

४० गावे बाधितज्या ठिकाणी बंदर होणार आहे, त्याच परिसरात जनसुनावणी घेणे कायद्याला धरून असल्याचे मान्य करून या बंदरामुळे प्रभावित होणाऱ्या ४० गावांतील लोकांना जनसुनावणीच्या ठिकाणी नेण्यासाठी आणि आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :palgharपालघर