शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

तळीरामांवर पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 07:45 IST

३१ डिसेंबरला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वसई विरार परिसरात पोलिसांनी शुक्रवारपासूनच नाकाबंदी सुरु केली आहे. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, बीट मार्शल, दामिनी पथकांसह साध्या वेषातील पोलीस आणि राज्य राखीव पोलील दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

वसई : ३१ डिसेंबरला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वसई विरार परिसरात पोलिसांनी शुक्रवारपासूनच नाकाबंदी सुरु केली आहे. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, बीट मार्शल, दामिनी पथकांसह साध्या वेषातील पोलीस आणि राज्य राखीव पोलील दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.वसई विरार परिसरात ६५ पोलीस अधिकारी आणि ४५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या, बीट मार्शल आणि दामिनी पथकांची गस्त जारी केली आहे. वाहतूक पोलिसांनी तर शुक्रवारपासून तळीरामांच्या तपासणीला सुरुवात केली आहे. सहा ब्रीथ अ‍ॅनलायझरच्या साहय्याने मद्यपींची तपासणी केली जाणार असून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी लगेचच गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली. स्थानिक पोलिसांच्या सोबतीला वाहतूक पोलिसांनी हायवे, आगाशी येथील ओलांडा नाका, बाभोळा नाका, वसंत नगरी सर्कल, साईनाथ नगर विरार, बोळींज नाका याप्रमुख स्थानी नाकाबंदी केली आहे. याठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रिसॉर्ट, हॉटेल्स, मॉल परिसरावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. विना परवाना पार्टी सुरु असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सर्वच पार्ट्यांना डीजे नाकारण्यात आला आहे.डीजेच्या तालावर मस्ती करणाºयांना चाप लावण्यात येणार आहे. पार्टीच्या आयोजकांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.समुद्रकिनारी खुलेआम मद्यप्राशन करणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. मुलींची छेडछाड आणि चोºया रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेषातील पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत.पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनाअनिरु द्ध पाटीलबोर्डी : ३१ डिसेंबेर तसेच नववर्षाच्या अनुषंगाने डहाणूला येणाºया पर्यटक आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्याचे डहाणू उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी लोकमतला सांगितले.या कार्यालयाच्या क्षेत्रात डहाणू, घोलवड आणि तलासरी या तीन पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. त्यापैकी डहाणू आणि घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गतचा परिसर सागरी आहे. ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागताला येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. या वर्षी शनिवारपासून येथील हॉटेल आणि रेस्टॉरंट फुल्ल झाली आहेत. त्या अनुषंगाने वाहतूककोंडी आणि सुरक्षात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी तीन दिवसांपूर्वीच हॉटेल व्यवसायिकांची बैठक बोलावून त्यांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय रस्ते सुरक्षेला विशेष महत्व देण्यात आले असून तपासणी नाके आणि पेट्रोलिंगवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना टाळण्यासाठी संशयित वाहनचालकांची ब्रीथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे. शिवाय सागरी पर्यटनासाठी येणाºयांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.स्थानिक विरु द्ध परगावतील पर्यटक यांच्यात वाहतूक कोंडी आणि पार्किंगवरून वाद उद्भवू नये याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. पंधरा अधिकारी आणि ७५ पोलिसांंसह दुचाकी तसेच चारचाकी वाहने असतील. गैरप्रकार आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र