शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

पोलीस आयुक्तालयाची घोषणा फक्त कागदावरच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:18 IST

भाजप सरकारची घोषणा हवेत । महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष

नालासोपारा : सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यामधील वसई तालुक्यात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून गुन्हेगारांवर कायद्याचा धाक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आॅगस्ट महिन्यात भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तालयाच्या स्थापनेची घोषणा केली होती. मात्र निवडणुका झाल्यानंतर भाजपचे सरकार सत्तेवर न आल्याने ही घोषणा हवेत विरण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवीन महाविकास आघाडी सरकार याबाबत काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वसई परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी एक अप्पर पोलीस अधीक्षक आणि तीन उपविभागीय पोलीस अधिकारी देण्यात आले आहेत. मात्र वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यात तक्र ार घेऊन गेलेल्या लोकांना न्यायासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक वेळा पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे लोकांचा पोलिसांवरच विश्वास उडाला आहे. नालासोपारा शहरातील टाकी रोड, संतोष भवन, धानिवबाग, गाला नगर या पट्ट्यातील झोपडपट्टीमध्ये युपी, बिहारवरून आलेले अनेक तडिपार आणि गुन्हेगारी स्वरूपाचे लोक राहत असल्याची चर्चा आहे. पण त्यांची कोणतीही माहिती पोलिसांकडे नाही. विरारमध्ये वाळू माफियांनी हैदोस घातला होता. अनेक तक्र ारी येत होत्या, पण पोलीस काही त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे शेवटी पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना मैदानात उतरावे लागले आणि त्यांनी अडीच कोटींचा मुद्देमाल पकडला होता.वसई-विरार शहर आणि मिरा-भार्इंदर शहरासाठी २६ पोलीस ठाण्यांचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याच्या हालचालींना यंदाच्या आॅगस्ट महिन्याआधी जोर वाढला होता. १५ आॅगस्ट रोजी या आयुक्तालयाची अधिकृत घोषणादेखील शासनस्तरावरून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आयुक्तालयाच्या उभारणीला सुरुवात झालेली नाही. वसई-विरार शहराची वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेता सध्या या परिसराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची नितांत गरज आहे. एकदा आयुक्तालयाची स्थापना झाल्यास पालघर पोलीस अधीक्षकांच्या कार्यकक्षेतून वसई-विरार परिसर विभक्त होऊन तो वसई-विरार, मिरा-भार्इंदर शहर पोलीस आयुक्तालयाशी जोडण्यात येईल. २६ पोलीस ठाण्यांच्या मर्यादित कार्य सीमेमुळे वसई-विरारमधील वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र सद्यस्थितीत या महत्त्वाकांक्षी आयुक्तालयाची अधिकृत घोषणा होऊन प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात न झाल्याने या प्रस्तावाला विलंबाचा सूर लागला आहे. आयुक्तालयाची निर्मिती झाल्यास वसई-विरारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल.कसे असेल नवीन पोलीस आयुक्तालय?मध्यंतरी नव्याने आकारास येणाºया स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला वसई-भार्इंदर पोलीस आयुक्तालय असे नाव देण्याचेही ठरले होते. सदरच्या आयुक्तालयास आयुक्त म्हणून प्रशांत बुरडे किंवा बिपीन सिंग लाभणार असल्याची जोरदार चर्चाही होती. मात्र आयुक्तालयाच्या उभारणीलाच विलंबाचा सूर लागला आहे.वसई-विरार, मीरा-भार्इंदर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करताना २६ पोलीस ठाणी उभारण्याची संकल्पना आहे. नव्याने उभारण्यात येणाºया आयुक्तालयात १ आयुक्त, १ अप्पर आयुक्त, ५ उपायुक्त, १२ सहाय्यक पोलीस आयुक्त, ७२ पोलीस निरीक्षक, १०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २२३ पोलीस उपनिरीक्षक अशी नेमणूक होणार असून प्रत्येक सहाय्यक आयुक्तांच्या अखत्यारीत एक किंवा दोन,पोलीस स्टेशन देण्याची योजना तयार करण्यातयेत आहे. ठाणे जिल्ह्यातून ९८७ पोलीस अधिकारीतर पालघर जिल्ह्यातून ११४७ पोलीस अधिकारी नवीन आयुक्तालयातवर्ग करण्यात येणारआहेत.स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाबाबत आमच्या कार्यालयात काहीही माहिती नसून याबाबतची माहिती डीजी किंवा अ‍ॅडिशनल डीजी कार्यालयाशी संपर्क साधल्यावर मिळू शकेल. तिथेच जी काही माहिती हवी आहे ती मिळेल.- निकेत कौशिक, आयजी, कोकण विभाग

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार