शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पालिका भूखंड बीओटी तत्त्वावर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 22:59 IST

निविदा काढल्या, समाजबांधवांमध्ये नाराजी

मीरा रोड : आगरी समाजासाठी आगरी समाज उन्नती संस्थेला भाईंदरच्या आझादनगरजवळील सांस्कृतिक भवनाचा आरक्षित सहा हजार चौ.मी.चा भूखंड देण्याचा महासभेने ठराव केला आहे. मात्र, आता महापालिकेनेच हा भूखंड बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर देण्यासाठी खुल्या निविदा मागवल्या आहेत.आरक्षण क्र. १२२ हे सामाजिक वनीकरण आणि खेळाच्या मैदानासाठी असताना महापालिका, लोकप्रतिनिधी यांनी मात्र ते विकसित करण्यास कमालीची टाळटाळ चालवली आहे. टीडीआर देऊनही आरक्षणाच्या काही जागेत अतिक्रमण झाले आहे. मूळ आरक्षण विकसित केले जात नसतानाच सरकार, महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी मात्र आधी या आरक्षणात बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालन मंजूर केले. त्यापाठोपाठ याच जागेत आणखी एक सांस्कृतिक भवनचे १२२ अ हे सहा हजार चौ.मी.चे नवे आरक्षण अस्तित्वात आणले. परंतु, आगरी भवन म्हणून मंजुरीस सरकारने नकार दिला. त्यानंतर, महासभेने आगरी समाज उन्नती मंडळास आगरी समाजासाठी आरक्षणाची जागा नाममात्र वार्षिक १२ हजार रुपये भाड्याने देण्याचा ठराव केला.महासभेचा ठराव आयुक्त बालाजी खतगावकर यांनी नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला. संस्थेला भाड्यात सवलत मिळावी म्हणून महापालिका नियमांचा संदर्भ दिला. भूखंड नाममात्र भाड्यात द्यायचा असेल, तर वैद्यकीय आणि शैक्षणिक कार्यासाठीच देता येतो. त्यामुळे अडचणीत आलेल्या आयुक्तांनी नगरविकास विभागास सुधारित पत्र पाठवून भाड्याचा उल्लेखच काढून टाकला. लोकलेखा समितीच्या अहवालानुसार बाजारभावाने जागा भाड्याने देण्याच्या परिपत्रकाचे महासभा व आयुक्तांनी उल्लंघन केले. या भूखंडाची किंमत रेडीरेकनरनुसार १९ कोटी पाच लाख इतकी होत असल्याने सरकारी नियमानुसार जागा मूल्याच्या साडेपाच टक्के वार्षिक भाडे एक कोटी चार लाख इतके होत आहे. सरकारने अजूनही आयुक्तांनी पाठवलेल्या महासभेच्या प्रस्तावावर मंजुरी दिली नसताना दुसरीकडे महापालिकेनेच निविदा सूचना प्रसिद्ध केली आहे. सांस्कृतिक भवनचे आरक्षण विकसित करण्यासाठी संस्था, कंपनी आदींकडून जाहीर निविदा मागवल्या आहेत.आगरी समाजाची राजकीय फायद्यासाठी फसवणूक व फरफट चालवली आहे. आम्ही सतत संस्थेला समाजाची नाचक्की आणि नुकसान करू नका म्हणून विनवणी करत आहोत. आगरी समाज भवन हे समाजाचा स्वाभिमान असताना सांस्कृतिक भवनसाठी राजकीय नेत्याच्या दावणीला समाज बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे.- अ‍ॅड. सुशांत पाटील, सामाजिक कार्यकर्तेमहासभेने आगरी समाज उन्नती संस्थेचा केलेला ठराव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यावर, अजून कोणते निर्देश आलेले नाहीत. परंतु, नगरविकास विभागाशी चर्चा केल्यानंतर सांस्कृतिक भवनसाठी निविदा मागवल्या आहेत. - बालाजी खतगावकर, आयुक्त

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक