शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

प्लास्टिक: कामचुकार स्वच्छता निरीक्षकांना संरक्षण; तर अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले कारवाईचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 7:33 PM

तक्रारी जास्तच झाल्या किंवा वरिष्ठांनी सांगितले तर तेवढ्या पुरती कारवाई स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्या कडून केली जाते .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - प्लास्टिक पिशव्या आदी वस्तूंवर कायद्याने बंदी असताना देखील त्यास संरक्षण देणाऱ्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकांना पाठीशी घालत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जात नाही. तर आता अतिक्रमण विभागास देखील -प्लास्टिक वर कारवाईची जबाबदारी देण्यात आली आहे . 

 राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्या , चमचे , स्ट्रॉ , ग्लास , डिश अश्या एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातलेली आहे . शिवाय केंद्र सरकारने देखील एकल वापराच्या प्लास्टिक ना मनाई केली आहे . परंतु मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक , मुकादम यांच्या कडून कारवाई केली जात नसल्याने शहरात राजरोसपणे प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर , विक्री सुरु आहे . 

तक्रारी जास्तच झाल्या किंवा वरिष्ठांनी सांगितले तर तेवढ्या पुरती कारवाई स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्या कडून केली जाते . इतकेच काय तर प्लास्टिक पहिल्यांदा आढळल्यास ५ हजार रुपये दंड असताना स्वच्छता निरीक्षक हे केवळ १५० रुपये दंड आकारून प्लास्टिक विक्रेता वा वापरकर्त्याच्या भक्कम आर्थिक फायदा करून देत आले आहेत . 

त्यातूनच प्लास्टिक विक्रेते आणि वापरकर्ते यांच्याशी स्वच्छता निरीक्षक आदींचे अर्थपूर्ण लागेबांधे असल्याचे आरोप सातत्याने होऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे . कारण स्वच्छता निरीक्षक हे प्लास्टिक ची कारवाई असो किंवा माती व डेब्रिस भराव , अस्वच्छता आदी प्रकरणी देखील कारवाई करण्यास नेहमीच जबाबदारी झटकून टाळाटाळ करत आले आहेत . 

काही दिवसां पूर्वीच  बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई न करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई केली जाईल 

असे पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक द्वारे म्हटले होते . परंतु शहरात पहाटे पासून प्लास्टिक पिशव्या सर्रास वापरली जात असताना प्रशासनाने स्वच्छता निरीक्षकावर कारवाईच केली नाही. त्यांना संरक्षण देत उलट आता प्लास्टिक पिशव्यांवर कारवाईची जबाबदारी अतिक्रमण विभागा वर सुद्धा देण्यात आली आहे . 

आयुक्त दिलीप ढोले यांनी आयोजित केलेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत तसे निर्देश दिले आहेत .  तर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्या वर कारवाईच्या सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली आहे . 

अतिक्रमण विभागास जबाबदारी दिली त्याचे स्वागत करत ३ नंतर रात्री पर्यंत प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई होईल अशी आशा आहे . पण पहाटे पासून प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर उघडपणे होत असताना स्वच्छता निरीक्षक आणि मुकादमांना संरक्षण कशाला ? असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत . 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी