शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस अन् मजूरच ठरवणार टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:05 IST

जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून एकूण आठ तालुक्यात आतापर्यंत ६२ टक्के लागवड झाली असून अन्य सात ते आठ पिकांची लागवड झाली आहे. भात पिकाची पेरणीनंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून एकूण आठ तालुक्यात आतापर्यंत ६२ टक्के लागवड झाली असून अन्य सात ते आठ पिकांची लागवड झाली आहे. भात पिकाची पेरणीनंतर पुनलागवड केली जाते. त्यामुळे आगामी काळात पावसाचा वरदहस्त कायम राहिल्यास आणि मजुरांची उपलब्धता हे समीकरण जुळून आल्यास ही टक्केवारी वाढण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील एकुण क्षेत्रापैकी आतापर्यंत ४७७८१.०० प्रत्यक्ष लागवड झाली आहे. ही टक्केवारी ६२ इतकी आहे. या मध्ये मोखाडा तालुक्यात सर्वाधिक ८४.५२ टक्के लागवड झाली आहे. पालघर तालुक्यात १५५१४.०० हे (हेक्टर) पैकी ७७७३.०० लागवड करण्यात आली आहे. तर वसई १०६१३.०० हे. पैकी ५३३० हे., डहाणू १४११७.०० हे. पैकी १०१५२.०० हे., तलासरी ७४५७.०० हे. पैकी ५१४७.०० हे., वाडा १३४३८.०० हे. पैकी ८६८४.०० हे., विक्रमगड ७२५५.०० हे. पैकी ४६८४.०० हे., जव्हार ६०७६.०० हे. पैकी ४०९०.०० हे. आणि मोखाडा तालुक्यात १९१८.०० हे. पैकी १६२१.०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक भाताचे क्षेत्र हे वाडा तालुक्यात असून येथील वाडा कोलम हे वाण सर्वाधिक लोकप्रिय आहे. हे वाण हायब्रिड स्वरुपात उपलब्ध झाल्याने अन्य तालुक्यात त्याच्या लागवडीस पसंती दिली जात आहे. भाताच्या एकूण लागवडी पैकी १० टक्के ही पेरणीची लागवड असते. २२ दिवसांची रोपे ही लागवडी योग्य असतात. तथापी जून महिन्यात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्हात आतापर्यंत भाताच्या लावणीसाठी समाधानकारक पाऊस झाला आहे. आगामी काळात पावसाची साथ तसेच मजुराची उपलब्धता हे समीकरण जुळून आल्यास लागवडीचे अपेक्षित धेय्य साधले जाईल असे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, भात पिका प्रमाणेच नागली, वरई, बांधावरील तूर, उडीद, भुईमूग, मूग, तीळ, खुरासणी आणि अन्य कडधान्याची लागवड केली जाते. जिल्ह्यात नागली लागवडीचे क्षेत्र ११२०५.०० हे. असून ७०५२.५० हे. लागवड झाली आहे. तर वरई पिकाचे लागवडी क्षेत्र ९१२२.०० हे. असून ४९९९.२० हे. क्षेत्रात लागवड झाली आहे. बांधावरील तूर क्षेत्र २५४६.०० तर २१०३.५३ हे. लागवड, उडीद ३३८६.०० सरासरी क्षेत्रापैकी २५७१.८६ हे. झाली आहे. मूग ४३२.०० हे पैकी ६१.०० हे., भुईमूग ३०८.०० पैकी ९४.१० हे. , तीळ ६००.०० हे. पैकी ११०.३० हे. इतर कडधान्य १२१३.०० हे पैकी १३०.६० हे. लागवड, भुईमूग ३०८.०० पैकी ९४.१० हे., तीळ ६००.००११०.३० हे. क्षेत्रात आणि खुरासणी १७६६.०० हे. पैकी १४८२.५५ हे. करण्यात आली आहे. या सर्व पिकांचे जिल्ह्यातील एकूण क्षेत्र १०६९६६.०० हे. इतके असून आजतागायत ६६३८६.६४ हे. वर लागवड झाली असून हे प्रमाण ६२.०६ टक्के इतके आहे. दरम्यान, भात लागवडीनंतर खुरासणी हे पीक आठ पैकी वसई, पालघर, तलासरी वगळता अन्य तालुक्यात घेतले जाते. जव्हार तालुक्यात नागली, वरई, तूर, भुईमूग आणि उडीद या पिकाचे लागवड क्षेत्र सर्वाधिक आहे. तर विक्रमगडमध्ये मूग लागवड केली जात असून सरासरी ६३.०० पैकी ६१.०० हेक्टर लागवड पूर्ण झाली आहे. जव्हार आणि मोखाडा तालुक्यात भुईमूगाची लागवड अनुक्र मे ६० व २५ टक्के इतकी लागवड झाल्याची माहिती पालघर जिल्हा कृषी विभागाकडून प्राप्त आली आहे.