शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
2
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
3
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
4
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
5
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
6
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
7
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
8
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
9
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
10
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
11
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
12
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
13
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
14
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
15
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
16
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
17
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
18
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
20
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली

पाऊस अन् मजूरच ठरवणार टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:05 IST

जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून एकूण आठ तालुक्यात आतापर्यंत ६२ टक्के लागवड झाली असून अन्य सात ते आठ पिकांची लागवड झाली आहे. भात पिकाची पेरणीनंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून एकूण आठ तालुक्यात आतापर्यंत ६२ टक्के लागवड झाली असून अन्य सात ते आठ पिकांची लागवड झाली आहे. भात पिकाची पेरणीनंतर पुनलागवड केली जाते. त्यामुळे आगामी काळात पावसाचा वरदहस्त कायम राहिल्यास आणि मजुरांची उपलब्धता हे समीकरण जुळून आल्यास ही टक्केवारी वाढण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील एकुण क्षेत्रापैकी आतापर्यंत ४७७८१.०० प्रत्यक्ष लागवड झाली आहे. ही टक्केवारी ६२ इतकी आहे. या मध्ये मोखाडा तालुक्यात सर्वाधिक ८४.५२ टक्के लागवड झाली आहे. पालघर तालुक्यात १५५१४.०० हे (हेक्टर) पैकी ७७७३.०० लागवड करण्यात आली आहे. तर वसई १०६१३.०० हे. पैकी ५३३० हे., डहाणू १४११७.०० हे. पैकी १०१५२.०० हे., तलासरी ७४५७.०० हे. पैकी ५१४७.०० हे., वाडा १३४३८.०० हे. पैकी ८६८४.०० हे., विक्रमगड ७२५५.०० हे. पैकी ४६८४.०० हे., जव्हार ६०७६.०० हे. पैकी ४०९०.०० हे. आणि मोखाडा तालुक्यात १९१८.०० हे. पैकी १६२१.०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक भाताचे क्षेत्र हे वाडा तालुक्यात असून येथील वाडा कोलम हे वाण सर्वाधिक लोकप्रिय आहे. हे वाण हायब्रिड स्वरुपात उपलब्ध झाल्याने अन्य तालुक्यात त्याच्या लागवडीस पसंती दिली जात आहे. भाताच्या एकूण लागवडी पैकी १० टक्के ही पेरणीची लागवड असते. २२ दिवसांची रोपे ही लागवडी योग्य असतात. तथापी जून महिन्यात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्हात आतापर्यंत भाताच्या लावणीसाठी समाधानकारक पाऊस झाला आहे. आगामी काळात पावसाची साथ तसेच मजुराची उपलब्धता हे समीकरण जुळून आल्यास लागवडीचे अपेक्षित धेय्य साधले जाईल असे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, भात पिका प्रमाणेच नागली, वरई, बांधावरील तूर, उडीद, भुईमूग, मूग, तीळ, खुरासणी आणि अन्य कडधान्याची लागवड केली जाते. जिल्ह्यात नागली लागवडीचे क्षेत्र ११२०५.०० हे. असून ७०५२.५० हे. लागवड झाली आहे. तर वरई पिकाचे लागवडी क्षेत्र ९१२२.०० हे. असून ४९९९.२० हे. क्षेत्रात लागवड झाली आहे. बांधावरील तूर क्षेत्र २५४६.०० तर २१०३.५३ हे. लागवड, उडीद ३३८६.०० सरासरी क्षेत्रापैकी २५७१.८६ हे. झाली आहे. मूग ४३२.०० हे पैकी ६१.०० हे., भुईमूग ३०८.०० पैकी ९४.१० हे. , तीळ ६००.०० हे. पैकी ११०.३० हे. इतर कडधान्य १२१३.०० हे पैकी १३०.६० हे. लागवड, भुईमूग ३०८.०० पैकी ९४.१० हे., तीळ ६००.००११०.३० हे. क्षेत्रात आणि खुरासणी १७६६.०० हे. पैकी १४८२.५५ हे. करण्यात आली आहे. या सर्व पिकांचे जिल्ह्यातील एकूण क्षेत्र १०६९६६.०० हे. इतके असून आजतागायत ६६३८६.६४ हे. वर लागवड झाली असून हे प्रमाण ६२.०६ टक्के इतके आहे. दरम्यान, भात लागवडीनंतर खुरासणी हे पीक आठ पैकी वसई, पालघर, तलासरी वगळता अन्य तालुक्यात घेतले जाते. जव्हार तालुक्यात नागली, वरई, तूर, भुईमूग आणि उडीद या पिकाचे लागवड क्षेत्र सर्वाधिक आहे. तर विक्रमगडमध्ये मूग लागवड केली जात असून सरासरी ६३.०० पैकी ६१.०० हेक्टर लागवड पूर्ण झाली आहे. जव्हार आणि मोखाडा तालुक्यात भुईमूगाची लागवड अनुक्र मे ६० व २५ टक्के इतकी लागवड झाल्याची माहिती पालघर जिल्हा कृषी विभागाकडून प्राप्त आली आहे.