शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मेवाणींना रोखणाऱ्यांनाच ‘खो’, पोलिसांकडून हिंदुत्ववाद्यांना जमावबंदीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:25 IST

पर्यावरण संवर्धन समितीतर्फे शुक्र वारी वसईमध्ये पर्यावरण मेळावा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमूख वक्ते म्हणून गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना बोलावण्यात आले.

वसई - पर्यावरण संवर्धन समितीतर्फे शुक्र वारी वसईमध्ये पर्यावरण मेळावा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमूख वक्ते म्हणून गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना बोलावण्यात आले. मात्र मेवानी यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्य होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांना चार दिवसांपूर्वी निवेदन देणा-यांनाच पोलिसांनी जमावबंदीच्या नोटीसा काढल्या आहेत.एमएमआरडी आराखडा, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग, मुंबई-बडोदरा एक्सप्रेस वे, समुद्र किनारे व्यवस्थापन आराखडा, वाढवण बंदर आदि प्रकल्पांविरोधात पर्यावरण समितीतर्फे पर्यावरण संवर्धन मेळावा -२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. शुक्र वारी संध्याकाळी ४ वाजता वाय.एम .सी. ए. मैदान, माणिकपूर, वसई रोड येथे हा मेळावा घेतला गेला. या मेळाव्यात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी सह आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे, जेष्ठ साहित्यक व हरीत वसईचे प्रणेते फादर फ्रान्सिस दिब्रीटो, जेष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू आदी मान्यवरांनाही आमंत्रित करण्यात आले होते.मेवानी यांची भाषणशैली ही चिथावणीखोर असल्यामुळे तसेच पुणे एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. वसई येथील कार्यक्रमाप्रकरणी समज द्यावी, यासाठी निवेदन देऊन पोलिसांना सहकार्य करणाºया हिंदुत्विनष्ठांनाच पोलिसांनी जमावबंदीची नोटीस काढल्यामुळे वसईत संताप व्यक्त होत आहे.पुणे येथील एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा दंगल पेटली होती. या एल्गार परिषदेत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेले गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी वसईत पर्यावरण संवर्धन समितीच्या मेळाव्यात वादग्रस्त विधान करून वातावरण बिघडवू नये, यासाठी वसईतील काही संघटनांच्या वतीने २५ डिसेंबरला नवघर पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते. मात्र ते निवेदन देणाºयांनाच पोलिसांनी जमावबंदीची नोटीस बजावून गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी माणकिपूर पोलीस ठाण्याकडून ८ जणांना जमावबंदीची नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांनी मात्र आंम्ही आयोजकांनाही नोटीसा बजावल्याचे सांगितले.या प्रकरणी राष्ट्र प्रथम चे शिवकुमार पांडे, हिंदू गोवंश रक्षा समितीचे दीप्तेश पाटील, मातृभूमी प्रतिष्ठानचे जीतेंद्र हजारे, साईनाथ मित्रमंडळाचे योगेश सिंग, आपोळे गणेश मंदिराचे नीलेश खोकाणी, विश्व हिंदू परिषदेचे लक्ष्मण गिसंग, बजरंगदलाचे राजेश पल, जय महाकाल ट्रस्टचे चंद्रशेखर गुप्ता यांना ये नोटीस पाठवण्यात आली आहे. तर आयोजक म्हणून समीर वर्तक यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे.सदर नोटीसांमध्ये, अनुचित प्रकार करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्या संघटनेचे पदाधिकारी अथवा सदस्य यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. असे नमूद करण्यात आले आहे.पर्यावरण संवर्धनक्षेत्रात कोणतेच योगदान नसतांना जिग्नेश मेवाणी यांना निमंत्रण कशासाठी? असा प्रश्न या संघटनांनी उपस्थित केला आहे. वसई येथील पर्यावरणाची स्थिती पहाता, याठिकाणी पर्यावरण संवर्धन मेळावा होणे आवश्यकच आहे. मात्र, या मेळाव्याच्या प्रमुख वक्तेपदी जिग्नेश मेवाणी यांना बोलावण्याचे नेमके कारण काय? मेवाणी यांचा पूर्व इतिहास पहाता त्यांच्या बेलगाम वक्तव्यातून जातीय, धार्मिक आणि प्रांतीय तेढ निर्माण होऊ शकते. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी मेवाणी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांचे पर्यावरण संवर्धनक्षेत्रात कोणत्याही प्रकारे योगदान नसतांना त्यांना या कार्यक्र माला बोलवण्यामागे जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू तर नाही ना? याची कसून अन्वेषण करून तसे आढळल्यास जिग्नेश मेवाणी आणि आयोजक यांना योग्य ती समज देण्यात यावी असे निवेदनात सांगण्यात आले आहे.काय आहे नोटीस संघटनांकडून निषेधपोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये, कार्यक्रमात अनिधकृतपणे कोणताही अडथळा निर्माण केल्यास किंवा नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास, तसेच आपणाकडून अथवा आपल्या संघटनेचे पदाधिकारी अथवा सदस्यांकडून त्रास होऊ नये या बाबत दक्षतेची सूचना आहे.मात्र, असे कोणतेही कृत्य केल्यास, कायदा आणि सुव्यवस्था यांचाप्रश्न निर्माण झाल्यास आपल्या संघटनेचे पदाधिकारी अथवा सदस्य यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.या पर्यावरण संवर्धन मेळाव्यासाठी खबरदारी म्हणून निवेदन देणाºयांना व आयोजकांनाही फौजदारी दंड प्रक्र ीया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या आहेत. ५० पोलिस व १० अधिकारी बंदोबस्तासाठी आहेत.-दामोदर बांदेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माणिकपूर पोलिस ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार