शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्याचा लोकांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 02:53 IST

जिल्ह्यात १५० घरांची पडझड, ११ जनावरे वाहून गेली : किनारपट्टीवर बसत होत्या वादळी वाऱ्याच्या धडका

पालघर : गुरुवारी मुसळधार पावसासह वादळी वारे वाहणार असल्याच्या कुलाबा वेधशाळेच्या इशाºयाला चकवा देत जिल्ह्यातील किनारपट्टी भागासह शहरी भागात पावसाने संध्याकाळपर्यंत विश्रांती घेतल्याने आपले उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्याचा प्रयत्न अनेक कुटुंबे करीत असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात १५० घरांची पडझड झाली असून कुठेही जीवितहानीची घटना घडलेली नाही.

जिल्ह्याला बुधवारी रात्री पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढल्यानंतर गुरुवारी सकाळपासून उसंत घेतल्याचे चित्र दिसत होते. मात्र, रात्री पडलेल्या पावसाने अनेक रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले. मंगळवारपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जीवन अस्ताव्यस्त केले असून सर्व गाव, पाडे शहरातील घरे, दुकाने यात पाणी शिरून नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. जिल्ह्यातील पालघर, सफाळे, केळवे रोड, बोईसर, वाणगाव, डहाणू आदी रेल्वे स्थानकांतील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत अत्यावश्यक प्रवाशांसाठी सुरू असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली होती, मात्र आज ती काही प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले.

पालघर शहरातील विष्णूनगर, लोकमान्य पाडा, भरवड पाडा, घोलवीरा आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने गरिबांच्या घरातील अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपाट आदी सामान भिजले होते. जिल्ह्यात बोईसर, पालघर, केळवे, डहाणू आदी अनेक भागात घरात पाणी शिरल्यानंतर आज पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक कुटुंबीय आपल्या घराची झालेली पडझड सावरण्यात आणि स्वच्छता करण्यात मग्न असल्याचे पाहावयास मिळाले.पालघर नगरपालिका क्षेत्रातील लोकमान्यनगर भरवाडपाडा तर पालघर ग्रामीण भागातील गणेश नगर, भीम नगर,आगवण, कुडण, मिठागर, एबूर, उमरोळी, दातिवरे, चिंचपाडा तर वसई तालुक्यातील कोल्ही आणि डहाणू तालुक्यातील वाणीपाडा येथील १७० कुटुंबेबाधित झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले असून जिल्ह्यात अंशत: पडझड झालेल्या कच्चा घरांची संख्या ११९ आहे, तर अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या १७ तर पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या १३ आहे. काल झालेल्या मुसळधार पावसात कुठलीही जीवितहानी झाली नसून डहाणू तालुक्यातील शेणसरी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेली ममता लिलका ही पाच वर्षीय मुलगी सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहे. तर या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे डहाणू तालुक्यातील दोन गाई, एक रेडा, आठ बकºया पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.वेधशाळेने दिलेल्या इशाºयाला चकवा देत पावसाची विश्रांतीजिल्ह्याला बुधवारी रात्री पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढल्यानंतर गुरुवारी सकाळपासून उसंत घेतल्याचे चित्र दिसत होते. मात्र, रात्री पडलेल्या पावसाने अनेक रस्ते पुन्हा पाण्याखाली गेल्याने पालघर-बोईसर, पालघर-मनोर या रस्त्यांवरील वाहतूक थोड्या वेळेसाठी विस्कळीत झाली होती.

टॅग्स :palgharपालघरRainपाऊस