शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्याचा लोकांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 02:53 IST

जिल्ह्यात १५० घरांची पडझड, ११ जनावरे वाहून गेली : किनारपट्टीवर बसत होत्या वादळी वाऱ्याच्या धडका

पालघर : गुरुवारी मुसळधार पावसासह वादळी वारे वाहणार असल्याच्या कुलाबा वेधशाळेच्या इशाºयाला चकवा देत जिल्ह्यातील किनारपट्टी भागासह शहरी भागात पावसाने संध्याकाळपर्यंत विश्रांती घेतल्याने आपले उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्याचा प्रयत्न अनेक कुटुंबे करीत असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात १५० घरांची पडझड झाली असून कुठेही जीवितहानीची घटना घडलेली नाही.

जिल्ह्याला बुधवारी रात्री पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढल्यानंतर गुरुवारी सकाळपासून उसंत घेतल्याचे चित्र दिसत होते. मात्र, रात्री पडलेल्या पावसाने अनेक रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले. मंगळवारपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जीवन अस्ताव्यस्त केले असून सर्व गाव, पाडे शहरातील घरे, दुकाने यात पाणी शिरून नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. जिल्ह्यातील पालघर, सफाळे, केळवे रोड, बोईसर, वाणगाव, डहाणू आदी रेल्वे स्थानकांतील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत अत्यावश्यक प्रवाशांसाठी सुरू असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली होती, मात्र आज ती काही प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले.

पालघर शहरातील विष्णूनगर, लोकमान्य पाडा, भरवड पाडा, घोलवीरा आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने गरिबांच्या घरातील अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपाट आदी सामान भिजले होते. जिल्ह्यात बोईसर, पालघर, केळवे, डहाणू आदी अनेक भागात घरात पाणी शिरल्यानंतर आज पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक कुटुंबीय आपल्या घराची झालेली पडझड सावरण्यात आणि स्वच्छता करण्यात मग्न असल्याचे पाहावयास मिळाले.पालघर नगरपालिका क्षेत्रातील लोकमान्यनगर भरवाडपाडा तर पालघर ग्रामीण भागातील गणेश नगर, भीम नगर,आगवण, कुडण, मिठागर, एबूर, उमरोळी, दातिवरे, चिंचपाडा तर वसई तालुक्यातील कोल्ही आणि डहाणू तालुक्यातील वाणीपाडा येथील १७० कुटुंबेबाधित झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले असून जिल्ह्यात अंशत: पडझड झालेल्या कच्चा घरांची संख्या ११९ आहे, तर अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या १७ तर पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या १३ आहे. काल झालेल्या मुसळधार पावसात कुठलीही जीवितहानी झाली नसून डहाणू तालुक्यातील शेणसरी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेली ममता लिलका ही पाच वर्षीय मुलगी सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहे. तर या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे डहाणू तालुक्यातील दोन गाई, एक रेडा, आठ बकºया पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.वेधशाळेने दिलेल्या इशाºयाला चकवा देत पावसाची विश्रांतीजिल्ह्याला बुधवारी रात्री पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढल्यानंतर गुरुवारी सकाळपासून उसंत घेतल्याचे चित्र दिसत होते. मात्र, रात्री पडलेल्या पावसाने अनेक रस्ते पुन्हा पाण्याखाली गेल्याने पालघर-बोईसर, पालघर-मनोर या रस्त्यांवरील वाहतूक थोड्या वेळेसाठी विस्कळीत झाली होती.

टॅग्स :palgharपालघरRainपाऊस