शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

केंद्रीय राज्यमंत्र्यांसोबत ‘किसान गोष्टी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:27 AM

‘किसान गोष्टी’तून शेतकऱ्यांशी संवाद आणि वृक्षारोपण हा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (कृषी व किसान कल्याण विभाग) पुरुषोत्तम रुपाला यांनी कोसबाड हिल येथे केले.

डहाणू/बोर्डी : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील पहिल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात ‘किसान गोष्टी’तून शेतकऱ्यांशी संवाद आणि वृक्षारोपण हा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (कृषी व किसान कल्याण विभाग) पुरुषोत्तम रुपाला यांनी कोसबाड हिल येथे केले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या सहवासातील आठवणींना उजाळा आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.या कृषी विज्ञान केंद्रातील विविध उपक्रमाविषयी माहिती, प्रयोगशाळेची पाहणी, औषधी वनस्पतींचे रोपण तसेच सरस्वती पूजनानंतर कार्यक्र माला प्रारंभ झाला. यावेळी शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या सामूहिक शुभेच्छा दिल्या. ते या दिवशी पुष्पगुच्छही न स्वीकारता आईचा आशीर्वाद घेऊन थेट कामाला सुरुवात करतात, या त्यांच्या कार्यपद्धतीची त्यांनी माहिती दिली. आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव कथन करताना रुपाला म्हणाले की, त्यावेळी अन्नधान्य दुष्काळाचा सामना करावा लागला होता. सर्वांची ही गरज पूर्ण व्हावी म्हणून देशभर प्रत्येक सोमवारी उपवास केला पाहिजे, असे आवाहन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केले होते, आणि त्याला देशवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि वृक्षारोपण कार्यक्रमालाही संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. या जिल्ह्यात चिकू बागायती संकटात असल्याचे निवेदन उत्पादकांनी दिले असून हा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.प्रत्येकाने रोपे लागवड करताना ते टॅग करावे हे सांगताना वृक्षारोपणाचे महत्त्व त्यांनी विशद केले. केंद्र सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे ही खूपच मोठी गोष्ट असून महाराष्ट्र सरकारही हे काम उत्तमरीत्या करीत आहे. देशात २५ लक्ष ग्रामपंचायती असून त्यांना २ लाख करोडचा निधी केंद्र शासनाकडून दिला जातो. तर गावातील प्रति लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्षी ४८८ रु पये जमा होतात. वीज, पाणी, गॅस हे शेवटच्या घटकापर्यंत मिळाले पाहिजे, यासाठी मोदी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.दरम्यान प्रमुख शास्त्रज्ञ प्रा.विलास जाधव यांनी या कार्यक्र माच्या प्रास्ताविकात कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची माहिती दिली. पाड्यावरच्या आदिवासी बांधवांनी चितारलेली वारली पेंटिंग देऊन केंद्रीय राज्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. शेतकरी प्रतिनिधी नारायण पटलारी, उत्कृष्ट महिला शेळीपालक यांना सन्मानित करण्यासह उपस्थित शेतकºयांना विविध प्रकारची फळांची कलमे भेट देण्यात आली.