शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळ म्हणून निवड होऊनही पाणजूची शोकांतिकाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:56 IST

नीती आयोगाची निवड कागदावरच : हक्काचा रस्ता व पादचारी पूल नसल्याने ग्रामस्थांकडून व्यक्त होतेय नाराजी

आशिष राणे

वसई : पाणजू ग्रामस्थांचा खरोखरच विकास करावयाचा असेल तर सरकारची इच्छाशक्ती हवी, सोबत या शहरी भागाला जोडण्यासाठी मुख्य रस्ता अथवा पादचारी पूल नाही ही शोकांतिका असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

इंटरनेटने आज जग जवळ आले असले तरीही दुर्गम भाग असलेल्या जंगलपट्टीत सुद्धा रस्ते तयार होत असून नायगांव व भार्इंदर दरम्यान असलेल्या या पाणजू बेटावर राहणाऱ्या रहिवाशांच्या नशिबी मात्र आयुष्यभर बोटीने प्रवास करण्याचे कुठपर्यंत लिहिले आहे हे मात्र पाणजू वासीयांचे सध्या तरी दुर्दैव असल्याचे खाजगीत म्हणावे लागेल.

गावात ग्रामपंचातीचे उत्पन्न वाढावे म्हणून पालघर जिल्हा परिषेदेकडे २५ लाखाचे कर्ज फेरी बोटींच्या धंद्यासाठी मागितले आहे, ते मिळाल्यास ग्रामपंचायतीची स्वत:ची बोट होऊन ती वापरता येईल व त्यातून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीस लागेल. आम्ही नोव्हेंबरमध्ये गावाला नीती आयोगानं पर्यटन स्थळा म्हणून विकसित करण्यासाठी सरकार म्हणून जिल्हाधिकारी व केंद्रीय पथकाने भेट दिली होती तसे झाल्यास गावात प्रेक्षणीय स्थळं, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आदी सोयीसुविधा होतील व याचा फायदा गावातील भूमिपुत्र व ग्रामपंचायतीला नक्कीच होईल. केवळ हक्काचा रस्ता व पादचारी पूल झाल्यास आम्ही खºया अर्थी शहरी भागाला जोडले जाऊ हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे पाणजू चे सरपंच आशिष भोईर यांनी सांगितले.रखडलेल्या भार्इंदर-वसई खाडीला मुहूर्त कधी?वसई विरार प्रदेशाच्या विकासात पाणजू बेटाला ५ किमी असा ३०.६ रु ंदीचा सहा पदरी समांतर रस्ता मिळणार आहे, या पुलावर एम.एम.आर.डी.ए. प्राधिकरण रु पये १०८१ कोटी ६० लक्ष खर्च करणार आहे. त्यावेळी या पुलाच्या बांधकामात खारफुटी व मिठागर यांच्या सह पाणजूवासीयांचा अडथळा होता, मात्र, आता तो दूर झाला आहे. आता हा पूल पाणजूला जोडला जाणार आहे. त्यातच या पुलामुळे अ‍ॅक्सेस मिळाला आहे.बेट समग्र विकास अंतर्गत निधी मिळणार!च्पाणजू बेटाच्या विकासासाठीचा आरखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर व कोकण विभागीय आयुक्त यांनी पाणजू गावाला गतवर्षी नोव्हेंबर मध्ये भेट देऊन पाहणी केली होती.च्बेट समग्र विकास म्हणजेच (हॉलिस्टिक डेव्हलपमेंट आॅफ आयलँडस प्रोग्राम) या कार्यक्र मांतर्गत या बेटाचा पर्यटन विकास करण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेमधून निधी उपलब्ध केला जाणार आहे.कसा होणार विकासपर्यटनस्थळ नीती आयोगाने देशामधील बेटांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आणि देशात एकूण १ हजार३८२ बेटे आहेत. त्यापैकी अगदी पहिल्याच टप्प्यात २६ बेटांचा विकास केला जाणार असल्याने या २६ बेटांच्या यादीत पालघर जिल्हा आणि त्यात आपला वसई तालुक्यातील पाणजू बेटाची निवड करण्यात आलेली आहे.