शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पालघर,वाडा, डहाणूला वायूचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:11 IST

मोठी हानी : वृक्ष, विजेचे खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडाले, अनेक शहरे अंधारात

पालघर : वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार होते मात्र या वादळाने आपली दिशा बदलली व ते पश्चिम दिशेला वळले असले तरी येत्या दोन दिवसात या वादळाने जिल्ह्यातील ११० किमीचा किनारपट्टीवरील भागाची मोठी वाताहत केली. अनेक घरांची पत्रे उडून विद्युत पोल कोसळून पडल्याने अनेक गावांना अंधारात रहावे लागले.

वायूच्या फटकाºयाने समुद्राची पातळी वाढली असून किनारपट्टीवरील अनेक गावांतील घरांना समुद्राच्या लाटांनी धडका द्यायला सुरुवात केली आहे. समुद्रात ६ मीटरच्या उंच लाटा उसळू लागल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारामध्ये एकच घबराट पसरली असून आपली घरे वाचविण्यासाठी वाळूची पोती आडोसा म्हणून घरांना लावण्यात मच्छीमारांची एकच धावपळ उडाली आहे. सातपाटी, वडराई, मुरबे, सफाळे, शिरगाव, माकूणसार आदी गावातील घरांची पत्रे उडून गेली ६० ते ७० कि.मी. प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असल्याने काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. सफाळे उपविभागांतर्गत माकूनसार खाडी परिसरात एक एचटी पोल व एक डीपी स्ट्रक्चर बुधवारी रात्री पडल्याने आजूबाजूची अनेक गावातील ३ हजार ८०० ग्राहक अंधारात सापडले होते. विद्युत वितरण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी समुद्राच्या भरती आणि ओहोटीच्या पाण्याचे नियोजन करीत हे काम गुरुवारी पूर्ण करीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले.

या चक्र ीवादळाचा फटका पश्चिम रेल्वेला बसून गुजरातकडे जाणाºया ७० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे वादळ प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूर असले तरी किनारपट्टी लगत असलेल्या भागातील गावात याचा धोका पाहता, खबरदारी म्हणून पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीलगत असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले असले तरी सध्या पावसाळी मासेमारी बंदी असल्याने सर्व बोटी किनाºयावर पडून आहेत. दुपारनंतर नुकसानीचा अंदाज घेतला जात होता.वसई पूर्व भागात पहिल्या पावसातच विजेचा खेळखंडोबाच्पारोळ : वसई ग्रामीण भागात पहिल्या तुरळक पावसातच बुधवार व गुरुवार या दोन दिवस वीज गायब झाल्याने नागरिक हैराण असून वीज मंडळाचा गलथन कारभार समोर आला असून मान्सून पूर्व तयारी का झाली नाही असा असा प्रश्न या भागातील नागरीक विचारत आहेत.च् पारोळ, शिरवली, आडणे, भाताणें, खानिवडे, कोपर, सायवन, वडघर, करजोन, देपिवली, उसगाव, चांदीप, मांडवी, शिरासाड, इ.गावातील वीजपुरवठा खंडित झाला. बुधवार, गुरु वार दोन दिवस वीज गायब झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.च् या भागातील कारखानदार, दुकानदार, रिसॉर्ट व इतर छोट्या मोठ्या व्यावसायीकांना मोठा फटका बसला मोठा आईस्क्रीमचा साठा व्यावसायिकांनी दुकानात ठेवला असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच विजेवर चालणारे पाण्याचे पंप बंद झाल्याने पाणीटंचाईला ही सामोरे जावे लागले.वादळीवाºयांनी झोडपलेबोर्डी : वायू चक्र ीवादळाचा परिणाम १२ व १३ जून या दोन दिवसात डहाणूत दिसला. वादळीवाºयाचा जोर वाढल्याने थोड्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. मात्र कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. बुधवारी दुपारी पाऊस आणि जोराच्या वाºयाला प्रारंभ झाला. मात्र सायंकाळनंतर पावसाने उसंत घेतली, तरी वादळी वाºयाचा वेग गुरु वारी सायंकाळपर्यंत वाढतच गेला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCyclone Vayuवायू चक्रीवादळ