शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पालघर,वाडा, डहाणूला वायूचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:11 IST

मोठी हानी : वृक्ष, विजेचे खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडाले, अनेक शहरे अंधारात

पालघर : वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार होते मात्र या वादळाने आपली दिशा बदलली व ते पश्चिम दिशेला वळले असले तरी येत्या दोन दिवसात या वादळाने जिल्ह्यातील ११० किमीचा किनारपट्टीवरील भागाची मोठी वाताहत केली. अनेक घरांची पत्रे उडून विद्युत पोल कोसळून पडल्याने अनेक गावांना अंधारात रहावे लागले.

वायूच्या फटकाºयाने समुद्राची पातळी वाढली असून किनारपट्टीवरील अनेक गावांतील घरांना समुद्राच्या लाटांनी धडका द्यायला सुरुवात केली आहे. समुद्रात ६ मीटरच्या उंच लाटा उसळू लागल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारामध्ये एकच घबराट पसरली असून आपली घरे वाचविण्यासाठी वाळूची पोती आडोसा म्हणून घरांना लावण्यात मच्छीमारांची एकच धावपळ उडाली आहे. सातपाटी, वडराई, मुरबे, सफाळे, शिरगाव, माकूणसार आदी गावातील घरांची पत्रे उडून गेली ६० ते ७० कि.मी. प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असल्याने काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. सफाळे उपविभागांतर्गत माकूनसार खाडी परिसरात एक एचटी पोल व एक डीपी स्ट्रक्चर बुधवारी रात्री पडल्याने आजूबाजूची अनेक गावातील ३ हजार ८०० ग्राहक अंधारात सापडले होते. विद्युत वितरण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी समुद्राच्या भरती आणि ओहोटीच्या पाण्याचे नियोजन करीत हे काम गुरुवारी पूर्ण करीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले.

या चक्र ीवादळाचा फटका पश्चिम रेल्वेला बसून गुजरातकडे जाणाºया ७० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे वादळ प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूर असले तरी किनारपट्टी लगत असलेल्या भागातील गावात याचा धोका पाहता, खबरदारी म्हणून पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीलगत असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले असले तरी सध्या पावसाळी मासेमारी बंदी असल्याने सर्व बोटी किनाºयावर पडून आहेत. दुपारनंतर नुकसानीचा अंदाज घेतला जात होता.वसई पूर्व भागात पहिल्या पावसातच विजेचा खेळखंडोबाच्पारोळ : वसई ग्रामीण भागात पहिल्या तुरळक पावसातच बुधवार व गुरुवार या दोन दिवस वीज गायब झाल्याने नागरिक हैराण असून वीज मंडळाचा गलथन कारभार समोर आला असून मान्सून पूर्व तयारी का झाली नाही असा असा प्रश्न या भागातील नागरीक विचारत आहेत.च् पारोळ, शिरवली, आडणे, भाताणें, खानिवडे, कोपर, सायवन, वडघर, करजोन, देपिवली, उसगाव, चांदीप, मांडवी, शिरासाड, इ.गावातील वीजपुरवठा खंडित झाला. बुधवार, गुरु वार दोन दिवस वीज गायब झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.च् या भागातील कारखानदार, दुकानदार, रिसॉर्ट व इतर छोट्या मोठ्या व्यावसायीकांना मोठा फटका बसला मोठा आईस्क्रीमचा साठा व्यावसायिकांनी दुकानात ठेवला असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच विजेवर चालणारे पाण्याचे पंप बंद झाल्याने पाणीटंचाईला ही सामोरे जावे लागले.वादळीवाºयांनी झोडपलेबोर्डी : वायू चक्र ीवादळाचा परिणाम १२ व १३ जून या दोन दिवसात डहाणूत दिसला. वादळीवाºयाचा जोर वाढल्याने थोड्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. मात्र कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. बुधवारी दुपारी पाऊस आणि जोराच्या वाºयाला प्रारंभ झाला. मात्र सायंकाळनंतर पावसाने उसंत घेतली, तरी वादळी वाºयाचा वेग गुरु वारी सायंकाळपर्यंत वाढतच गेला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCyclone Vayuवायू चक्रीवादळ