शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पालघर पोलिसांनी वाचवले २२ नागरिकांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 01:29 IST

संकटात सापडलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची सुटका करण्यासाठी आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रांत देशमुख यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कामाला लागले होते.

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यात तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वसामान्यांचे जीवन अस्तव्यस्त करून टाकले असताना अनेक सखल भागात साचलेल्या पाण्यातून, प्रवाहातून पालघर पोलिसांनी २२ नागरिकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी करून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस दल समर्थ असल्याचे दाखवून दिले.

संकटात सापडलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची सुटका करण्यासाठी आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रांत देशमुख यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कामाला लागले होते. केळवा पोलीस ठाणे हद्दीत माकूनसार या गावाच्या पुढे असलेल्या ब्रह्मदेव मंदिराच्या आसपास खारटनमध्ये पाण्याची पातळी वाढून सागर व सारिका चौधरी हे दांपत्य शेतावरील घरात अडकले होते. त्यांच्याबरोबरच अन्य दहा-बारा पुरुष व स्त्रिया समुद्राला भरती आल्याने त्यात सापडले असताना सपोनि मानसिंग पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी फायबर बोटीच्या साह्याने पाण्यात उतरून त्या सर्वांची सुटका करून त्यांना बाहेर काढले.सातपाटी सागरी पोलीस ठाणे हद्दीत पानेरी नदीजवळ हरिओम मिश्रा हा पाण्याची पातळी वाढल्याने झाडावर चढला होता. सुटका व्हावी म्हणून तो मदतीची याचना करीत असल्याची माहिती सपोनि जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या टीमला केल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन त्या इसमाची सुटका करून त्याच्यावर उपचार केले. सफाळा पोलीस ठाणे हद्दीत लालठाणे गावाच्या बाजूला आणि घोलवड पोलीस हद्दीत एका रस्त्यावर दरडसदृश्य माती सपोनि सुनील जाधव आणि प्रकाश सोनावणे यांच्या टीमने दूर केली. 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार