शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पालघर पोलिसांनी वाचवले २२ नागरिकांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 01:29 IST

संकटात सापडलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची सुटका करण्यासाठी आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रांत देशमुख यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कामाला लागले होते.

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यात तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वसामान्यांचे जीवन अस्तव्यस्त करून टाकले असताना अनेक सखल भागात साचलेल्या पाण्यातून, प्रवाहातून पालघर पोलिसांनी २२ नागरिकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी करून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस दल समर्थ असल्याचे दाखवून दिले.

संकटात सापडलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची सुटका करण्यासाठी आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रांत देशमुख यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कामाला लागले होते. केळवा पोलीस ठाणे हद्दीत माकूनसार या गावाच्या पुढे असलेल्या ब्रह्मदेव मंदिराच्या आसपास खारटनमध्ये पाण्याची पातळी वाढून सागर व सारिका चौधरी हे दांपत्य शेतावरील घरात अडकले होते. त्यांच्याबरोबरच अन्य दहा-बारा पुरुष व स्त्रिया समुद्राला भरती आल्याने त्यात सापडले असताना सपोनि मानसिंग पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी फायबर बोटीच्या साह्याने पाण्यात उतरून त्या सर्वांची सुटका करून त्यांना बाहेर काढले.सातपाटी सागरी पोलीस ठाणे हद्दीत पानेरी नदीजवळ हरिओम मिश्रा हा पाण्याची पातळी वाढल्याने झाडावर चढला होता. सुटका व्हावी म्हणून तो मदतीची याचना करीत असल्याची माहिती सपोनि जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या टीमला केल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन त्या इसमाची सुटका करून त्याच्यावर उपचार केले. सफाळा पोलीस ठाणे हद्दीत लालठाणे गावाच्या बाजूला आणि घोलवड पोलीस हद्दीत एका रस्त्यावर दरडसदृश्य माती सपोनि सुनील जाधव आणि प्रकाश सोनावणे यांच्या टीमने दूर केली. 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार