शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
6
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
7
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
8
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
9
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
10
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
11
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
12
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
13
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
14
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
15
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
16
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
17
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
18
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
19
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
20
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   

पालघर लोकसभा पोटनिवडणूक : काँग्रेसच्या गावितांना भाजपाची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 06:13 IST

भाजपाने सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला. कालच रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली होती. तर आज काँग्रेसला धक्का दिला. मंगळवारी दुपारपर्यंत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असे सांगणारे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

- विशेष प्रतिनिधीमुंबई : भाजपाने सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला. कालच रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली होती. तर आज काँग्रेसला धक्का दिला. मंगळवारी दुपारपर्यंत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असे सांगणारे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन भाजपाला जोरदार धक्का दिला. तर काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना गळाला लावून भाजपाने चतुर खेळी केली. आपण काँग्रेस सोडणार नसून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या संपर्कात आहोत, असे दुपारपर्यंत सांगणाºया गावितांनी सायंकाळी भाजपात प्रवेश केला.आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास राज्यमंत्री राहिलेले राजेंद्र गावित यांना भाजपाने पालघरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मात्र पत्रकार परिषदेत जाहीर केले. ते बुधवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. माजी खासदार चिंतामण वनगांच्या मुलास (श्रीनिवास) उमेदवारी देताना शिवसेनेने जे काही केले तसे त्यांनी वागायला नको होते. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत गावितांना विजयी करणे हीच स्व. वनगा यांना उचित श्रद्धांजली ठरेल, असे फडणवीस या वेळी म्हणाले.गावित हे पूर्वी जनता दलात होते आणि त्यांनी नंदुरबारची लोकसभा निवडणूकही लढविली होती. पुढे आजचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पक्षात ते गेले व नंतर काँग्रेसमध्ये जाऊन आमदार व राज्यमंत्री बनले. मंगळवारी ते भाजपावासी झाले.सत्य लवकरच बाहेर येईलश्रीनिवास वनगा यांची कोणी दिशाभूल केली, त्यांना कोणी खोटी माहिती दिली याची सगळी माहिती आपल्याकडे आहे. निवडणुकीनंतर आपण त्यावर बोलू, असे मुख्यमंत्री म्हणाले. पालघरमध्ये शिवसेनेने जे काही केले त्याचा युतीवर काही परिणाम होईल का, या प्रश्नात ते म्हणाले, कशाकशावर परिणाम होतो ते पाहू.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018palgharपालघरBJPभाजपा