शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 1:32 AM

रस्ता वाहतूक कोलमडली : अनेकांच्या घरांत शिरल्याने नुकसान

पालघर : संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने सलग दुसऱ्या दिवशी अक्षरश: झोडपले. यामुळे गाव-शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हाभरात अनेक मार्गांवरील रस्त्यावर पाणी आल्याने, तसेच दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तसेच जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक विद्युत जनित्रे बिघडल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. पालघर न्यायालयासह अनेक शासकीय कार्यालयात पाणी शिरले असून दोन दिवस घराबाहेर पडू नये असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्ह्यात सरासरी २६५.४४ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस डहाणू तालुक्यात ४६५.२८ मिमी, तर सर्वात कमी पाऊस मोखाडा तालुक्यात ८७.५५ मिमी इतका पडला. तलासरी तालुक्यात ४२३.८ मिमी, वसई १९६ मिमी, जव्हार १६२ मिमी, विक्र मगड १८७ मिमी, वाडा २२२ मिमी, तर पालघर ३७९.९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गाव, पाडे, शहरातील घरे, दुकानांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.जिल्ह्यातील पालघर, सफाळे, केलवेरोड, बोईसर, वाणगाव, डहाणू आदी रेल्वेस्थानकांतील रेल्वे रु ळावर पाणी साचल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ न अत्यावश्यक सेवेतील लोकल सेवा विस्कळीत झाली. पालघर शहरातील विष्णू नगर, लोकमान्य पाडा, घोलविरा आदी भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने गरिबांच्या घरातील अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपाट आदी सामान भिजले. काहींनी कमरे इतक्या पाण्यात रात्र काढली. शहरात वाढलेली नियोजनशून्य बांधकामे, भराव आणि नगर परिषदेने या वर्षी पुरेशी गटारे साफ न केल्यामुळे गटारी तुंबल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. पालघर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाºया तसेच आयकर कार्यालयाच्या भागात अनेक भागात पाणी साचले होते.पालघर न्यायालयात गुडघाभर पाणी साचले. या दरम्यान पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेला साप न्यायालयात शिरत एका बाकड्यावर वेटोळे करून बसल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. तसेच न्यायाधीशांच्या निवासस्थानातही पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले. याशिवाय नव्याने उभारण्यात येणाºया जिल्हा मुख्यालयासमोरील रस्त्यावर तीन फूट पाणी साचल्याने पालघर-बोईसर रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: बंद पडली. या मार्गावर मनोर गावाच्या पुढे हात नदीला पूर आल्याने मुंबईकडून आलेली वाहने रात्रीपासून अडकून पडली आहेत.५ आणि ६ आॅगस्ट या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे.तर १ आॅगस्टपासून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या उत्तन, वसई, डहाणू, सातपाटी, मुरबे येथील ३७ बोटी अजूनही समुद्रात नांगर टाकून मासेमारीला थांबल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी दिली.जिल्हा आपत्कालीन यंत्रणा नावापुरती1कुलाबा वेधशाळेने १ आॅगस्टपासून ६ आॅगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर ही आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना आखल्या गेल्या नसल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसल्याचे पाहावयास मिळाले.2अनेक ठिकाणी झाडे पडली होती. रस्ते वाहून गेले. अनेक गावांचा संपर्क तुटाला होता. काही जण पुराच्या पाण्यात अडकले होते. मात्र, तोकड्या आपत्कालीन यंत्रणेची यामध्ये प्रचंड दमछाक होत होती. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा आहे कुठे, असा प्रश्न पडला होता.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर