शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात ‌भारत बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद; दुकाने, बाजारपेठा बंद तर बँका, कार्यालये सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:56 IST

जव्हार बंदचे आयोजन कम्युनिस्ट पक्षाच्या कॉ.रतन रावजी बुधर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सहकार्य करत ‘बंद’ला प्रतिसाद दिला. ‘

जव्हार : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. देशातील शेतकरी संघटना काही महिन्यांपासून शांततापूर्व आंदोलन करत आहेत. मात्र, तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवारी शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ पुकारला हाेता. जव्हार बाजरपेठेत या निमित्त काही तास दुकाने बंद करून व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला. 

जव्हार बंदचे आयोजन कम्युनिस्ट पक्षाच्या कॉ.रतन रावजी बुधर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सहकार्य करत ‘बंद’ला प्रतिसाद दिला. ‘भारत बंद’दरम्यान अन्य मागण्याही करण्यात आल्या. वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. कोरोना काळात लोकांना रोजगार नाही. त्यामुळे मजुरांना रोजगार द्या, गावागावांतील पाणीटंचाई दूर करा, पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करा, केंद्रातील शेतकारीविरोधी तीन कायदे रद्द करा, वीजबिल बिल रीडिंगनुसार घ्या, अशा मागण्या ‘भारत बंद’ आंदोलनादरम्यान करण्यात आल्या आहेत.

कॉ.बुधर, कॉ.विजय शिंदे, कॉ.लक्ष्मण जाधव, कॉ.अशोक काकवा, कॉ.शांताबाई जाधव, कॉ.सुरेश बुधर, गणपत केंजरा, जयराम पारधी, रामदास पागी यांच्या नेतृत्वाखाली बंद करण्यात आला. मनोर येथेही अखिल भारतीय किसान सभेचे सुनील सुर्वे यांच्या नेतृत्वात निदर्शने केली गेली.

कासा बाजारपेठ कडकडीत बंदडहाणू तालुक्यातील कासा व चारोटी बाजारपेठ शुक्रवारी कडकडीत बंद होती. कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या भारत बंदला प्रतिसाद देत कासा व चारोटी बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता येथील सर्व दुकाने दिवसभर बंद होती. भाजी मंडई, कपडा मार्केट सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे शुकशुकाट होता. रिक्षाही बंद होती. बँक, दवाखान्यात येणाऱ्या परिसरातील नागरिकांची काही ठिकाणी गैरसोय झाली.

डहाणूत भारत बंदचा फारसा परिणाम नाही

शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणि कामगार विरोधी चार काळे कायदे रद्द करा, प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्या, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, चार हेक्टरपर्यंतची वनजमीन खातेदाराच्या नावावर करा, वरकस, गायरान, महसूल, देवस्थान जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करा, अशा मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, सिटू, जनवादी महिला संघटना, डीवायएसएफ यांच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला होता. त्याला केवळ डहाणू रोड परिसरात अल्पसा प्रतिसाद मिळाला असून इतरत्र बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. सरकारी कार्यालये, बॅंका, शाळा, सुरळीत सुरू होत्या.

शुक्रवारी बंदच्या निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आमदार कॉ. विनोद निकोले, कॉ. बारक्या मांगात, कॉ. रडका कलंगडा, कॉ. चंद्रकांत घोरखना, कॉ. चंद्रकांत वरठा, कॉ. लहानी दौडा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. यावेळी लॉकडाऊनमध्ये पोलीस गरिबांना लुटत असल्याच्या घोषणा दिल्या जात होत्या, शिवाय पोलीस कामगारांवर करीत असलेल्या अन्यायाविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन