शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

पालघर जिल्ह्यात ‌भारत बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद; दुकाने, बाजारपेठा बंद तर बँका, कार्यालये सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:56 IST

जव्हार बंदचे आयोजन कम्युनिस्ट पक्षाच्या कॉ.रतन रावजी बुधर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सहकार्य करत ‘बंद’ला प्रतिसाद दिला. ‘

जव्हार : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. देशातील शेतकरी संघटना काही महिन्यांपासून शांततापूर्व आंदोलन करत आहेत. मात्र, तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवारी शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ पुकारला हाेता. जव्हार बाजरपेठेत या निमित्त काही तास दुकाने बंद करून व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला. 

जव्हार बंदचे आयोजन कम्युनिस्ट पक्षाच्या कॉ.रतन रावजी बुधर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सहकार्य करत ‘बंद’ला प्रतिसाद दिला. ‘भारत बंद’दरम्यान अन्य मागण्याही करण्यात आल्या. वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. कोरोना काळात लोकांना रोजगार नाही. त्यामुळे मजुरांना रोजगार द्या, गावागावांतील पाणीटंचाई दूर करा, पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करा, केंद्रातील शेतकारीविरोधी तीन कायदे रद्द करा, वीजबिल बिल रीडिंगनुसार घ्या, अशा मागण्या ‘भारत बंद’ आंदोलनादरम्यान करण्यात आल्या आहेत.

कॉ.बुधर, कॉ.विजय शिंदे, कॉ.लक्ष्मण जाधव, कॉ.अशोक काकवा, कॉ.शांताबाई जाधव, कॉ.सुरेश बुधर, गणपत केंजरा, जयराम पारधी, रामदास पागी यांच्या नेतृत्वाखाली बंद करण्यात आला. मनोर येथेही अखिल भारतीय किसान सभेचे सुनील सुर्वे यांच्या नेतृत्वात निदर्शने केली गेली.

कासा बाजारपेठ कडकडीत बंदडहाणू तालुक्यातील कासा व चारोटी बाजारपेठ शुक्रवारी कडकडीत बंद होती. कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या भारत बंदला प्रतिसाद देत कासा व चारोटी बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता येथील सर्व दुकाने दिवसभर बंद होती. भाजी मंडई, कपडा मार्केट सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे शुकशुकाट होता. रिक्षाही बंद होती. बँक, दवाखान्यात येणाऱ्या परिसरातील नागरिकांची काही ठिकाणी गैरसोय झाली.

डहाणूत भारत बंदचा फारसा परिणाम नाही

शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणि कामगार विरोधी चार काळे कायदे रद्द करा, प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्या, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, चार हेक्टरपर्यंतची वनजमीन खातेदाराच्या नावावर करा, वरकस, गायरान, महसूल, देवस्थान जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करा, अशा मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, सिटू, जनवादी महिला संघटना, डीवायएसएफ यांच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला होता. त्याला केवळ डहाणू रोड परिसरात अल्पसा प्रतिसाद मिळाला असून इतरत्र बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. सरकारी कार्यालये, बॅंका, शाळा, सुरळीत सुरू होत्या.

शुक्रवारी बंदच्या निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आमदार कॉ. विनोद निकोले, कॉ. बारक्या मांगात, कॉ. रडका कलंगडा, कॉ. चंद्रकांत घोरखना, कॉ. चंद्रकांत वरठा, कॉ. लहानी दौडा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. यावेळी लॉकडाऊनमध्ये पोलीस गरिबांना लुटत असल्याच्या घोषणा दिल्या जात होत्या, शिवाय पोलीस कामगारांवर करीत असलेल्या अन्यायाविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन