शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

पालघर जिल्ह्यात ‌भारत बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद; दुकाने, बाजारपेठा बंद तर बँका, कार्यालये सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:56 IST

जव्हार बंदचे आयोजन कम्युनिस्ट पक्षाच्या कॉ.रतन रावजी बुधर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सहकार्य करत ‘बंद’ला प्रतिसाद दिला. ‘

जव्हार : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. देशातील शेतकरी संघटना काही महिन्यांपासून शांततापूर्व आंदोलन करत आहेत. मात्र, तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवारी शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ पुकारला हाेता. जव्हार बाजरपेठेत या निमित्त काही तास दुकाने बंद करून व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला. 

जव्हार बंदचे आयोजन कम्युनिस्ट पक्षाच्या कॉ.रतन रावजी बुधर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सहकार्य करत ‘बंद’ला प्रतिसाद दिला. ‘भारत बंद’दरम्यान अन्य मागण्याही करण्यात आल्या. वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. कोरोना काळात लोकांना रोजगार नाही. त्यामुळे मजुरांना रोजगार द्या, गावागावांतील पाणीटंचाई दूर करा, पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करा, केंद्रातील शेतकारीविरोधी तीन कायदे रद्द करा, वीजबिल बिल रीडिंगनुसार घ्या, अशा मागण्या ‘भारत बंद’ आंदोलनादरम्यान करण्यात आल्या आहेत.

कॉ.बुधर, कॉ.विजय शिंदे, कॉ.लक्ष्मण जाधव, कॉ.अशोक काकवा, कॉ.शांताबाई जाधव, कॉ.सुरेश बुधर, गणपत केंजरा, जयराम पारधी, रामदास पागी यांच्या नेतृत्वाखाली बंद करण्यात आला. मनोर येथेही अखिल भारतीय किसान सभेचे सुनील सुर्वे यांच्या नेतृत्वात निदर्शने केली गेली.

कासा बाजारपेठ कडकडीत बंदडहाणू तालुक्यातील कासा व चारोटी बाजारपेठ शुक्रवारी कडकडीत बंद होती. कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या भारत बंदला प्रतिसाद देत कासा व चारोटी बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता येथील सर्व दुकाने दिवसभर बंद होती. भाजी मंडई, कपडा मार्केट सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे शुकशुकाट होता. रिक्षाही बंद होती. बँक, दवाखान्यात येणाऱ्या परिसरातील नागरिकांची काही ठिकाणी गैरसोय झाली.

डहाणूत भारत बंदचा फारसा परिणाम नाही

शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणि कामगार विरोधी चार काळे कायदे रद्द करा, प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्या, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, चार हेक्टरपर्यंतची वनजमीन खातेदाराच्या नावावर करा, वरकस, गायरान, महसूल, देवस्थान जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करा, अशा मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, सिटू, जनवादी महिला संघटना, डीवायएसएफ यांच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला होता. त्याला केवळ डहाणू रोड परिसरात अल्पसा प्रतिसाद मिळाला असून इतरत्र बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. सरकारी कार्यालये, बॅंका, शाळा, सुरळीत सुरू होत्या.

शुक्रवारी बंदच्या निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आमदार कॉ. विनोद निकोले, कॉ. बारक्या मांगात, कॉ. रडका कलंगडा, कॉ. चंद्रकांत घोरखना, कॉ. चंद्रकांत वरठा, कॉ. लहानी दौडा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. यावेळी लॉकडाऊनमध्ये पोलीस गरिबांना लुटत असल्याच्या घोषणा दिल्या जात होत्या, शिवाय पोलीस कामगारांवर करीत असलेल्या अन्यायाविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन