शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्याचा विकासनिधी गेला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 00:21 IST

बुधवारी होणारी पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

- हितेन नाईकपालघर - ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा अस्तित्वात आल्याला पाच वर्षे उलटल्यानंतरही जिल्ह्याला विकासासाठी प्राप्त झालेला निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खर्च झाला नसल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे बुधवारी होणारी पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत २०१५-१६ व १६-१७ मध्ये अखर्चित राहिलेल्या व शासनाकडे परत गेलेल्या निधीसंदर्भात आवाज उठवला जाण्याची शक्यता आहे.जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या (बुधवारी) नवनिर्वाचित पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व नवनिर्वाचित आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, सुनील भुसारा, श्रीनिवास वणगा, विनोद निकोले यांच्यासह विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडणार आहे. या अर्थसंकल्पीय (१९-२०) वर्षात जिल्ह्याला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना असा एकूण २७४ कोटी ७१ लाख प्राप्त निधीमधून नियोजनमार्फत २० जानेवारी अखेर १४४ कोटी ३५ लाख निधी वितरित केला असल्याचे दाखविले असले तरी विविध यंत्रणांना वाटप केलेल्या वरील निधीमधून प्रत्यक्षात किती खर्च झाला याची आकडेवारी न दिल्याने यातील बहुतांश निधी या यंत्रणांनी खर्च केल्याचे दिसून येत नाही. शिवाय नियोजननेही त्यांच्याकडे असलेल्या निधीमधून २१ टक्के रक्कम खर्च केलेली नाही. यावरून एकंदर जिल्ह्याच्या विकासासाठी असलेल्या निधीचा खर्च या यंत्रणा करत नसल्याचे स्पष्ट दिसते.अर्थसंकल्पीय वर्ष १८-१९ जाऊन दुसरे वर्ष पूर्ण होण्यासाठी आले असताना त्यातील सुमारे २०६ कोटी इतका निधी अजूनही शिल्लक म्हणजेच अखर्चित आहे. या वर्षातील अखर्चित आणि गत अखर्चित निधी असा निधी शिल्लक असण्यावरून जिल्हा नियोजनच्या निधीचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. विविध यंत्रणांना दिलेला हा निधी अखर्चित राहत असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासकामांना खीळ बसणार आहे असेच एकंदरीत दिसत आहे. जिल्हा नियोजन आराखड्यात गतवर्षी म्हणजे २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला प्राप्त झालेल्या एकूण ६२१ कोटी ८४ लाख निधीपैकी ३३.१४ टक्के निधी अखर्चित राहिलेला आहे. म्हणजेच २० जानेवारीपर्यंत प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या निधीपैकी २०६ कोटी रुपयाचा निधी अजूनही खर्च न झाल्याने तो शिल्लक राहिलेला आहे. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील विविध यंत्रणांना सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १२६ कोटी ५७ लाख ६० हजार रुपये वितरित केले गेले.जानेवारी २०२० पर्यंत खर्च केली गेली फक्त ५४.८२ टक्के रक्कम२० जानेवारी २०२० पर्यंत प्रत्यक्षात मात्र एकूण ६९ कोटी ३८ लाख रुपये खर्च केले गेले. याची टक्केवारी फक्त ५४.८२ टक्के इतके आहे. म्हणजेच या योजनेतील विविध यंत्रणांना वितरित केलेल्या १२६.५७ कोटी निधीपैकी ५७ कोटी १९ लाखांचा निधी अखर्चित आहे.या अखर्चित निधीची टक्केवारी ४५.१८ टक्के इतकी आहे. तर आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गतच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत जिल्ह्याला १८-१९ वर्षात प्राप्त असलेल्या ४८४.२५ कोटी निधीपैकी २० जानेवारी २०२० अखेर ३४१ कोटी ५० लाख एवढा खर्च झालेला आहे.१८-१९ मध्ये अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत मिळालेल्या ११० कोटी निधीपैकी २० जानेवारीपर्यंत ६१ कोटी एवढी रक्कम अखर्चित राहिलेली आहे. प्रत्यक्षात फक्त ४८ कोटी रुपये खर्च केला गेला आहे. याची टक्केवारी फक्त ४४.२१ टक्के इतकी आहे.जिल्हा नियोजन समितीमध्ये खर्च झालेल्या निधीच्या विस्तृत माहितीचा पुरेसा अभ्यास करता येऊ नये म्हणून खर्च अहवाल पुस्तिका दोन दिवसांपूर्वी पाठविल्या गेल्याचा आरोप नियोजन सदस्यांनी केला आहे.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार