शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्हा विकास आघाडी जि. प. निवडणुकीच्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:45 IST

सर्व जागा लढवणार : इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन

पालघर : विक्रमगड तालुक्यावर असलेली भाजपची एकहाती सत्ता उलथून टाकण्यासाठी पालघर जिल्हा विकास आघाडी मैदानात उतरली आहे. नगरपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर विकास आघाडीच्या नीलेश सांबरे यांनी पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा लढविण्याचे जाहीर केले आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला पालघर जिल्हा आजही आरोग्य, कुपोषण, रोजगार, स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घेणे आदी अनेक गोष्टीपासून वंचित राहिला आहे. त्याचप्रमाणे चांगले शिक्षण, शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते यासारखे मूलभूत प्रश्नही आजपर्यंत सुटलेले नाहीत. चांगल्या आरोग्य व्यवस्थेची उभारणी केली जात नसल्याने रुग्णांना गुजरात व सिल्वासा येथे उपचारासाठी जावे लागत आहे. योग्य उपचारांच्या अभावामुळे आजही माणसे किड्या-मुंग्यांप्रमाणे मृत्युमुखी पडत आहेत.

कुपोषणामुळे बालके दगावत आहेत. पालघर जिल्ह्यात शेतीच्या सिंचनासाठी बांधलेल्या धरणातील पाणी मुंबई, वसई, मीरा-भार्इंदर येथे नेले जात आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अनेक विघातक प्रकल्प पालघर जिल्ह्यावर लादले जात असताना मूळ प्रकल्पग्रस्तांना मात्र योग्य मोबदला आणि त्यांचे योग्य पुनर्वसनही केले जात नाही. इच्छाशक्तीच्या अभावामुळे राजकीय पक्षांकडून जिल्ह्याचा विकास जिल्हा निर्मितीला सहा वर्षे उलटून गेल्यानंतर आजही साधता आलेला नाही.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण, क्र ीडा, ग्रामीण विकास अशा विविध विषयात जोमाने काम सुरू आहे. मात्र आता खºया अर्थाने जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सामाजिक जाणीव असलेले उच्चशिक्षित तरुण राजकारणात पाठवल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.म्हणूनच जिजाऊ संघटनेने ‘पालघर जिल्हा विकास आघाडी’ स्थापन करून येत्या पालघर जिल्हा परिषदेच्या आणि जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

तरुणांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले असून, उच्चशिक्षित, सामाजिक जाण व आवड असणाऱ्यांनी तरुण-तरुणी, महिला-पुरुषांनी १४ डिसेंबरपर्यंत आपल्या परिचय पत्रासह (बायोडाटा) झडपोली, विक्रमगड येथे संपर्कसाधण्याचे आवाहन केलेआहे.

‘स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पालघर जिल्ह्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती यासारख्या मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. कुठल्याही राजकीय पक्षाला या समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती नाही हे आता स्पष्ट झाले आहे. म्हणूनच जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आम्ही ही विकासासाठी निवडणूक लढवत आहोत. जनतेच्या या लढ्याला नक्कीच यश मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.’- नीलेश सांबरे, अध्यक्ष,पालघर जिल्हा विकास आघाडी, जिजाऊ संघटना, कोकण विकास मंच, सामाजिक कार्यकर्ते.

टॅग्स :Electionनिवडणूकpalgharपालघर