शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पालघर जिल्हा विकास आघाडी जि. प. निवडणुकीच्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:45 IST

सर्व जागा लढवणार : इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन

पालघर : विक्रमगड तालुक्यावर असलेली भाजपची एकहाती सत्ता उलथून टाकण्यासाठी पालघर जिल्हा विकास आघाडी मैदानात उतरली आहे. नगरपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर विकास आघाडीच्या नीलेश सांबरे यांनी पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा लढविण्याचे जाहीर केले आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला पालघर जिल्हा आजही आरोग्य, कुपोषण, रोजगार, स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घेणे आदी अनेक गोष्टीपासून वंचित राहिला आहे. त्याचप्रमाणे चांगले शिक्षण, शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते यासारखे मूलभूत प्रश्नही आजपर्यंत सुटलेले नाहीत. चांगल्या आरोग्य व्यवस्थेची उभारणी केली जात नसल्याने रुग्णांना गुजरात व सिल्वासा येथे उपचारासाठी जावे लागत आहे. योग्य उपचारांच्या अभावामुळे आजही माणसे किड्या-मुंग्यांप्रमाणे मृत्युमुखी पडत आहेत.

कुपोषणामुळे बालके दगावत आहेत. पालघर जिल्ह्यात शेतीच्या सिंचनासाठी बांधलेल्या धरणातील पाणी मुंबई, वसई, मीरा-भार्इंदर येथे नेले जात आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अनेक विघातक प्रकल्प पालघर जिल्ह्यावर लादले जात असताना मूळ प्रकल्पग्रस्तांना मात्र योग्य मोबदला आणि त्यांचे योग्य पुनर्वसनही केले जात नाही. इच्छाशक्तीच्या अभावामुळे राजकीय पक्षांकडून जिल्ह्याचा विकास जिल्हा निर्मितीला सहा वर्षे उलटून गेल्यानंतर आजही साधता आलेला नाही.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण, क्र ीडा, ग्रामीण विकास अशा विविध विषयात जोमाने काम सुरू आहे. मात्र आता खºया अर्थाने जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सामाजिक जाणीव असलेले उच्चशिक्षित तरुण राजकारणात पाठवल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.म्हणूनच जिजाऊ संघटनेने ‘पालघर जिल्हा विकास आघाडी’ स्थापन करून येत्या पालघर जिल्हा परिषदेच्या आणि जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

तरुणांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले असून, उच्चशिक्षित, सामाजिक जाण व आवड असणाऱ्यांनी तरुण-तरुणी, महिला-पुरुषांनी १४ डिसेंबरपर्यंत आपल्या परिचय पत्रासह (बायोडाटा) झडपोली, विक्रमगड येथे संपर्कसाधण्याचे आवाहन केलेआहे.

‘स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पालघर जिल्ह्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती यासारख्या मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. कुठल्याही राजकीय पक्षाला या समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती नाही हे आता स्पष्ट झाले आहे. म्हणूनच जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आम्ही ही विकासासाठी निवडणूक लढवत आहोत. जनतेच्या या लढ्याला नक्कीच यश मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.’- नीलेश सांबरे, अध्यक्ष,पालघर जिल्हा विकास आघाडी, जिजाऊ संघटना, कोकण विकास मंच, सामाजिक कार्यकर्ते.

टॅग्स :Electionनिवडणूकpalgharपालघर