शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्हा विकास आघाडी जि. प. निवडणुकीच्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:45 IST

सर्व जागा लढवणार : इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन

पालघर : विक्रमगड तालुक्यावर असलेली भाजपची एकहाती सत्ता उलथून टाकण्यासाठी पालघर जिल्हा विकास आघाडी मैदानात उतरली आहे. नगरपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर विकास आघाडीच्या नीलेश सांबरे यांनी पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा लढविण्याचे जाहीर केले आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला पालघर जिल्हा आजही आरोग्य, कुपोषण, रोजगार, स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घेणे आदी अनेक गोष्टीपासून वंचित राहिला आहे. त्याचप्रमाणे चांगले शिक्षण, शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते यासारखे मूलभूत प्रश्नही आजपर्यंत सुटलेले नाहीत. चांगल्या आरोग्य व्यवस्थेची उभारणी केली जात नसल्याने रुग्णांना गुजरात व सिल्वासा येथे उपचारासाठी जावे लागत आहे. योग्य उपचारांच्या अभावामुळे आजही माणसे किड्या-मुंग्यांप्रमाणे मृत्युमुखी पडत आहेत.

कुपोषणामुळे बालके दगावत आहेत. पालघर जिल्ह्यात शेतीच्या सिंचनासाठी बांधलेल्या धरणातील पाणी मुंबई, वसई, मीरा-भार्इंदर येथे नेले जात आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अनेक विघातक प्रकल्प पालघर जिल्ह्यावर लादले जात असताना मूळ प्रकल्पग्रस्तांना मात्र योग्य मोबदला आणि त्यांचे योग्य पुनर्वसनही केले जात नाही. इच्छाशक्तीच्या अभावामुळे राजकीय पक्षांकडून जिल्ह्याचा विकास जिल्हा निर्मितीला सहा वर्षे उलटून गेल्यानंतर आजही साधता आलेला नाही.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण, क्र ीडा, ग्रामीण विकास अशा विविध विषयात जोमाने काम सुरू आहे. मात्र आता खºया अर्थाने जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सामाजिक जाणीव असलेले उच्चशिक्षित तरुण राजकारणात पाठवल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.म्हणूनच जिजाऊ संघटनेने ‘पालघर जिल्हा विकास आघाडी’ स्थापन करून येत्या पालघर जिल्हा परिषदेच्या आणि जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

तरुणांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले असून, उच्चशिक्षित, सामाजिक जाण व आवड असणाऱ्यांनी तरुण-तरुणी, महिला-पुरुषांनी १४ डिसेंबरपर्यंत आपल्या परिचय पत्रासह (बायोडाटा) झडपोली, विक्रमगड येथे संपर्कसाधण्याचे आवाहन केलेआहे.

‘स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पालघर जिल्ह्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती यासारख्या मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. कुठल्याही राजकीय पक्षाला या समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती नाही हे आता स्पष्ट झाले आहे. म्हणूनच जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आम्ही ही विकासासाठी निवडणूक लढवत आहोत. जनतेच्या या लढ्याला नक्कीच यश मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.’- नीलेश सांबरे, अध्यक्ष,पालघर जिल्हा विकास आघाडी, जिजाऊ संघटना, कोकण विकास मंच, सामाजिक कार्यकर्ते.

टॅग्स :Electionनिवडणूकpalgharपालघर