शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पालघर डायरी : महिलांच्या डोक्यावरचे हंडे कधी दूर होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 10:45 IST

...राज्य शासनाच्या या भूमिकेविरोधात स्थानिकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी मात्र एकाही लोकप्रतिनिधीचा आवाज उठताना दिसत नाही.

हितेन नाईक, पालघर समन्वयक

पालघर जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले असताना, वैतरणा नदीतील पाणी गोदावरी नदीवाटे मराठवाड्यात नेणार असल्याची घोषणा अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सध्या जिल्ह्यात वैतरणा नदी, तिच्या उपनद्या, धरणे यांच्या माध्यमातून मोठा जलसाठा असतानाही जिल्ह्यातल्या गरीब जनतेला मात्र तहानलेले ठेवून त्यांच्या हक्काचे पाणी पळविले जात आहे. राज्य शासनाच्या या भूमिकेविरोधात स्थानिकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी मात्र एकाही लोकप्रतिनिधीचा आवाज उठताना दिसत नाही.

पालघर जिल्ह्यातून वाहणारी वैतरणा ही मुख्य नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळील सह्याद्री पर्वतात उगम पावलेली आहे. पश्चिम वाहिनी असलेली ही नदी अरबी समुद्राला मिळते. तिच्या उपनद्या असलेल्या सूर्या, तानसा, पिंजाळ, सुसरी, देहर्जे या नद्याही पश्चिमेला वाहतात. सूर्या नदीवर धामणी हे एक महत्त्वपूर्ण धरण बांधण्यात आले आहे. जिल्ह्यात भातसा, पिंजाळ, देहर्जे, तानसा, बारवी यांसारख्या नद्यांवर कवडास उन्नयी बंधारा, वांद्री मध्यम प्रकल्प, मनोर लघुपाटबंधारे योजना, माहीम-केळवा लघुपाटबंधारे, देवखोप लघु पाटबंधारे, रायतळे लघु पाटबंधारे, खांड लघुपाटबंधारे, मोह-खुर्द लघुपाटबंधारे या योजनांद्वारे सुमारे ७८१.३२८ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा प्रचंड पाणीसाठा साठवला जातो.

या धरण क्षेत्रात या वर्षी चांगला पाऊस पडल्याने पालघरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे मनोरच्या लघु पाटबंधारे विभाग कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, धरण आणि लघुपाटबंधारे क्षेत्रात असलेले पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि मुंबई या शहरी भागांकडे मोठ्या प्रमाणात वळविले जात असल्याने या भागाला पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही. दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात धरणे आणि लघु पाटबंधारे निर्माण करण्यात आले आहेत, अशा मोखाडा, वाडा, जव्हार या तीन तालुक्यांतील नागरिकांना मात्र जानेवारीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तीन गावे आणि २० पाड्यांमध्ये टँकरच्या २६ फेऱ्यांद्वारे लोकांच्या घरात पाणी पोहोचविण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे. अनेक तालुक्यांतील दुर्गम भागात महिला आपल्या डोक्यावर हंडे घेऊन खाचखळग्याच्या वाटा तुडवीत कुटुंबीयांची तहान भागवत आहेत. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्यात सिंचनक्षमता वाढविण्याच्या नावाखाली १३२.४८ दशलक्ष घनफूट पाणी गोदावरीच्या उपखोऱ्यात वळविण्यात येणार आहे. अशा वेळी पालघर जिल्ह्यातील सिंचन क्षमता दिवसेंदिवस घटत असून ओसाड पडलेल्या या जमिनीला पाण्याची गरज उपलब्ध करून न देताजिल्ह्यातले पाणी इतरत्र वळविले जात असल्याने त्याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील सिंचन क्षमतेवर पडत आहे. 

टॅग्स :palgharपालघरwater shortageपाणीकपातWomenमहिला