शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनंतर सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:40 IST

जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी गावकरी घाबरले आहेत.

पालघर - जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी गावकरी घाबरले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत रहिवाशांशी संवाद साधला. सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत.कुर्झे धरण, अणुऊर्जा प्रकल्प यांना धोका नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. तंबू बसविलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी शनिवारी रहिवाशांशी संवाद साधला आणि प्रशासन त्यांच्यासोबत असल्याचा दिलासा दिला.नाशिक येथील धरण सुरक्षा मंडळाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला सविस्तर पाहणीसाठी बोलावण्यात आले आहे. तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाचे डिझाईन देखील भूकंपरोधक असल्याने त्या प्रकल्पाला देखील कोणताही धोका संभवत नसल्याचे त्यांनी सांगितले.एनडीआरएफची तुकडी शनिवारी या भागात दाखल झाली असून रहिवाशांच्या निवाºयासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून संबंधित गावांमध्ये २०० तंबू उभारण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७० ते ८० जण एकत्रित राहू शकतील, असे मोठे तंबू उभारण्यात आले आहेत. तीन रूग्णवाहिकांसह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून पोलीस रात्रीची गस्तही घालत आहे.सोय गावासाठी, क्षमता कुटुंबाचीडहाणू, तलासरी तालुक्यातील काही गावांना तीन महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने सुरक्षेची उपाययोजना म्हणून शासनाने धुंदलवाडी, दापचारी येथे प्रत्येक पाड्यात १० बाय १२ चे तंबू ठोकून जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.या तंबूत कुटुंबातील केवळ सात ते आठ सदस्य राहू शकत असल्याची प्रतिक्रि या धुंदलवाडीच्या ग्रामस्थांनी दिली आहे.भूकंप पीडित मदतीच्या प्रतीक्षेतशुक्रवारी दुपारी बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने मुंबई अहमदाबाद हायवे लगत असलेल्या हळद पाडा, खिवरपाडा येथे भयभीत होऊन पळत असताना वैभवी रमेश भूयाल या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पण दोन दिवसानंतरही आमच्या घराकडे शासकीय यंत्रणा फिरकलेली नाही तसेच कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे पीडित कुटुंबाने सांगतिले.

टॅग्स :palgharपालघर