शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

भाताचे पीक दिले शेतकऱ्याने पेटवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:51 IST

वाडा : तालक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी यांची साडेतीन एकरातील भात पावसाअभावी करपून गेल्याने व शासनामार्फतही कोणत्याही प्रकारचे ...

वाडा : तालक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी यांची साडेतीन एकरातील भात पावसाअभावी करपून गेल्याने व शासनामार्फतही कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न केल्याच्या निषेधार्थ संतापून त्यांनी हे पीक पेटवून दिल्याची घटना घडली.

वाडा तालुक्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होता त्यामुळे पेरणी व भातलागवडीची कामे सुरळीत झाली होती. भातपिकेही चांगली बहरली होती. मात्र भातपिकांच्या दाणा भरणीच्या वेळी आवश्यक असणाऱ्या परतीचा पावसाने दडी मारल्याने दाणा परिपक्व झाला नाही. पिके लाल पडून करपून गेली. जमिनीलाही भेगा पडल्या. त्यामुळे भाताचे दाणे सोडा पेंढा सुद्धा हाताला लागला नाही त्यामुळे त्यांनी नैराश्यापायी आपले भातपीक कृषी साहाय्यक रंजना भोईर यांच्या समोरच पेटवून देऊन संताप व्यक्त केला. या गावातील वसंत गणपत मोकाशी, योगेश मोकाशी, विनायक मोकाशी, कृष्णा मोकाशी, तुकाराम मोकाशी, विजय मोकाशी, मंगूलाल मोकाशी, नारायण लहू मोकाशी,दीपक मोकाशी, गजानन मोकाशी, दत्तत्रेय मोकाशी, गणपत श्रीपाद मोकाशी, शंकर काळुराम मोकाशी या शेतकºयाच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावातीलच ५० ते ६० टक्क्यांच्या वर भातशेतीचे नुकसान झाले.

वाडा तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांश शेतकरी भातशेतीवर आवलंबुन आहेत.अद्याप दुष्काळ घोषित नाहीतालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून विविध गावांतील शेतकºयांनी महसूल व कृषी विभागाने शेतीचे पंचनामे करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा,अशी मागणीे केली आहे.नायब तहसिलदार गोसावींशी संपर्क साधला असता शासनाकडून आदेश नसल्याचे सांगितले.हे शेतकरी विविध सेवा सहकारी सोसायट्या, बँका यांचे तसेच सावकारी कर्ज घेऊन शेती करीत असतात. महागडी खते, बी-बियाणे, मजुरीचा खर्च, तसेच निसर्गाचा लहरीपणा या सर्व बाबींमुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यात सरकारचेही दुर्लक्ष होते आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआग