शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

भाताचे पीक दिले शेतकऱ्याने पेटवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:51 IST

वाडा : तालक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी यांची साडेतीन एकरातील भात पावसाअभावी करपून गेल्याने व शासनामार्फतही कोणत्याही प्रकारचे ...

वाडा : तालक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी यांची साडेतीन एकरातील भात पावसाअभावी करपून गेल्याने व शासनामार्फतही कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न केल्याच्या निषेधार्थ संतापून त्यांनी हे पीक पेटवून दिल्याची घटना घडली.

वाडा तालुक्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होता त्यामुळे पेरणी व भातलागवडीची कामे सुरळीत झाली होती. भातपिकेही चांगली बहरली होती. मात्र भातपिकांच्या दाणा भरणीच्या वेळी आवश्यक असणाऱ्या परतीचा पावसाने दडी मारल्याने दाणा परिपक्व झाला नाही. पिके लाल पडून करपून गेली. जमिनीलाही भेगा पडल्या. त्यामुळे भाताचे दाणे सोडा पेंढा सुद्धा हाताला लागला नाही त्यामुळे त्यांनी नैराश्यापायी आपले भातपीक कृषी साहाय्यक रंजना भोईर यांच्या समोरच पेटवून देऊन संताप व्यक्त केला. या गावातील वसंत गणपत मोकाशी, योगेश मोकाशी, विनायक मोकाशी, कृष्णा मोकाशी, तुकाराम मोकाशी, विजय मोकाशी, मंगूलाल मोकाशी, नारायण लहू मोकाशी,दीपक मोकाशी, गजानन मोकाशी, दत्तत्रेय मोकाशी, गणपत श्रीपाद मोकाशी, शंकर काळुराम मोकाशी या शेतकºयाच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावातीलच ५० ते ६० टक्क्यांच्या वर भातशेतीचे नुकसान झाले.

वाडा तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांश शेतकरी भातशेतीवर आवलंबुन आहेत.अद्याप दुष्काळ घोषित नाहीतालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून विविध गावांतील शेतकºयांनी महसूल व कृषी विभागाने शेतीचे पंचनामे करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा,अशी मागणीे केली आहे.नायब तहसिलदार गोसावींशी संपर्क साधला असता शासनाकडून आदेश नसल्याचे सांगितले.हे शेतकरी विविध सेवा सहकारी सोसायट्या, बँका यांचे तसेच सावकारी कर्ज घेऊन शेती करीत असतात. महागडी खते, बी-बियाणे, मजुरीचा खर्च, तसेच निसर्गाचा लहरीपणा या सर्व बाबींमुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यात सरकारचेही दुर्लक्ष होते आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआग