शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

विरोधही तितकाच मजबूत

By admin | Updated: April 15, 2017 03:14 IST

वाढवण बंदरासह वडोदरा एक्सप्रेस हायवे, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग आदी प्रकल्प स्थानिक मच्छीमार,आदिवासी,स्थानिक भूमिपुत्रांना

पालघर : वाढवण बंदरासह वडोदरा एक्सप्रेस हायवे, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग आदी प्रकल्प स्थानिक मच्छीमार,आदिवासी,स्थानिक भूमिपुत्रांना उध्वस्त करणारे असून हे प्रकल्प लादणाऱ्या सामर्थशाली सरकारविरु द्ध तितकेच मजबूत आंदोलन उभे करण्याचा निर्णय शुक्रवारी पालघर येथे मच्छीमार समाज हॉल येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. बैठकीत प्रामुख्याने वाढवणं बंदराविरु द्धचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्णय घेतानाच जेएनपीटी मार्फत खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या बैठकीत उत्तन ते झाइ पर्यंतच्या मच्छीमार संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर, भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, शेतकरी संघर्षसमिती तसेच महाराष्ट्र मच्छीमार कृतीसमिती व नॅशनल फिश वर्कर्स फोरम आणि ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सराकारच्या भूमिकेवर आसूड ओढण्यात आला.प्रारंभी संघर्षसमितीच्यावतीने वैभव वझे व नारायण पाटील यांनी वाढवण बंदरामुळे मच्छीमार, डायमेकिंग व्यावसायिक व बागायतदार यांच्यावर होणारे परिणाम तसेच या विरोधात आजवर दिलेल्या लढ्याची माहिती दिली. भूमिसेनेचे काळुराम धोदडे यांनी शेतकरी, आदिवासी, मच्छीमार यांना उध्वस्त करणाऱ्या या विविध प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरून सरकारला हे प्रकल्प रद्द करायला भाग पाडायला लागेल. सर्व मच्छिमारांनी विरोधाची मुठ मजबूत करावी. त्यासाठी भक्कम एकजुटीची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे रामकृष्ण तांडेल, सुभाष तामोरे, डॉ.सुनील पऱ्हाड, शशी सोनावणे, दि.के.राऊत व शेतकरी संघर्षसमितीचे संतोष पावडे आदींनीही हा लढा व्यापक करण्याची आवश्यकता बोलून दाखिवली. नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे नरेंद्र पाटील यांनी वाढवणं बंदराविरु द्ध सर्व मच्छीमार एकजुटीने उभा राहील अशी गवाही दिली. (प्रतिनिधी)मासेमारी व्यवसायावर फिरणार नांगर- बैठकीत ५ हजार एकर समुद्र हटवून समुद्रात भराव टाकण्याच्या प्रसिद्ध झालेल्या माहितीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या भरावामुळे या भागातील गावांवर मोठे संकट कोसळेल अशी भीती व्यक्त करण्यात आली. - या बंदरामुळे कोणीही विस्थापित होणार नाही असा दावा केला जात असताना १४० मीटर इतक्या रु ंदीच्या दोन रस्त्यांमुळे या भागातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनींवर नांगर फिरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. - या भरावामुळे माशांचे प्रजनन केंद्रच नष्ट होणार असून भविष्यात मासेमारी संपुष्ठात येईल. त्याचबरोबरीने बंदराकरिता उभारले जाणारे २८ फ्लॅट(प्लॅटफॉर्म) व बंदरात दाखल होण्यासाठी बंदराबाहेर थांबलेली मोठमोठी जहाजे यामुळे मच्छीमार बोटींना त्या भागात शिरनेही अशक्य बनेल अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आलीय.